शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

बारसागड येथे पाणी टंचाई

By admin | Updated: June 14, 2016 00:37 IST

तालुक्यातील बारसागड येथील तीन हातपंप मागील दीड महिन्यापासून बंद आहेत. या हातपंपाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून बारसागड येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दीड महिन्यापासून तीन हातपंप बंद सावली : तालुक्यातील बारसागड येथील तीन हातपंप मागील दीड महिन्यापासून बंद आहेत. या हातपंपाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून बारसागड येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर हातपंप दुरुस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.बारसागड येथील लोकसंख्या ३२५ च्या घरात आहे. येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाच्या योेजनेतून गावात हातपंप योजना राबविण्यात आली. मात्र येथील तीन हातपंप मागील दीड महिण्यापासून बंद स्थितीत आहेत. येथील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी १४ एप्रिल रोजी पंचायत समिती येथील नोंद रजिस्टरवर हातपंप दुरुस्तीची मागणी केली होती. सचिवांच्या उपस्थितीत बंद हातपंप दुरुस्तीबाबत ठराव पारित करण्यात आला. परंतु दीड महिण्याचा कालावधी लोटूनही हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली नाही. गावातील तीन हातपंप बंद असल्यामुळे नागरिक दोन विहिरीवरच आपली तहान भागवित आहेत.मात्र, यापैकी एक विहीर मागील आठवड्यात कोरडी पडल्याने महिलांना गावाबाहेरील विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. सध्या गावात एकाच विहिरीवरुन पाणीपुरवठा होत आहे.त्या विहिरीची पातळीसुद्धा खोलवर गेली आहे. त्यामुळे आता बारसागड येथे पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. येत्या आठ-दहा दिवसात पाऊस पडला नाही तर गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात येथील हातपंप दुरुस्त न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांच्या वतीने बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशाराही लोडे यांनी निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)