शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बारसागड येथे पाणी टंचाई

By admin | Updated: June 14, 2016 00:37 IST

तालुक्यातील बारसागड येथील तीन हातपंप मागील दीड महिन्यापासून बंद आहेत. या हातपंपाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून बारसागड येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दीड महिन्यापासून तीन हातपंप बंद सावली : तालुक्यातील बारसागड येथील तीन हातपंप मागील दीड महिन्यापासून बंद आहेत. या हातपंपाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून बारसागड येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर हातपंप दुरुस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.बारसागड येथील लोकसंख्या ३२५ च्या घरात आहे. येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाच्या योेजनेतून गावात हातपंप योजना राबविण्यात आली. मात्र येथील तीन हातपंप मागील दीड महिण्यापासून बंद स्थितीत आहेत. येथील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी १४ एप्रिल रोजी पंचायत समिती येथील नोंद रजिस्टरवर हातपंप दुरुस्तीची मागणी केली होती. सचिवांच्या उपस्थितीत बंद हातपंप दुरुस्तीबाबत ठराव पारित करण्यात आला. परंतु दीड महिण्याचा कालावधी लोटूनही हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली नाही. गावातील तीन हातपंप बंद असल्यामुळे नागरिक दोन विहिरीवरच आपली तहान भागवित आहेत.मात्र, यापैकी एक विहीर मागील आठवड्यात कोरडी पडल्याने महिलांना गावाबाहेरील विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. सध्या गावात एकाच विहिरीवरुन पाणीपुरवठा होत आहे.त्या विहिरीची पातळीसुद्धा खोलवर गेली आहे. त्यामुळे आता बारसागड येथे पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. येत्या आठ-दहा दिवसात पाऊस पडला नाही तर गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात येथील हातपंप दुरुस्त न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांच्या वतीने बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशाराही लोडे यांनी निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)