शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

मिळेल त्या भांड्यात साठवावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:50 IST

गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष सुरू झाला. पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांनी मिळेल तिथून पाणी आणणे सुरू केले आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता वेकोलि प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

ठळक मुद्देचार्ली येथील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष : वेकोलिद्वारा टँकरने पाणी पुरवठा; मात्र प्रशासनाने लक्ष नाही

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष सुरू झाला. पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांनी मिळेल तिथून पाणी आणणे सुरू केले आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता वेकोलि प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप हालचालही केलेली नाही.राजुरा तालुक्यातील चार्लीवासीयांची पाणी मिळविण्यासाठी चाललेली धडपड प्रशासनाच्या नियोजनाला लाजविणारी आहे. राजुरा तालुक्यातील चार्ली - निर्ली परिसरात पाण्याचे मुबलक साठे नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात याठिकाणी दरवर्षी नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. चार्ली या एक हजार १४० लोकसंख्येच्या गावातील बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्याने भर उन्हाळ्यात गावकºयांचा पाण्यासाठी केविलवाना संघर्ष सुरू झाला आहे.येथील नागरिकांना गुंडभर पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली असताना तालुका प्रशासनाने गावकºयांना पाण्याची कुठलीही व्यवस्था करून दिलेली नाही. गावात पाण्याचा एवढा दुष्काळ सुरू असतानाही कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या गावाला भेट दिली नाही. चार्ली गावात नागरिकांना थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना तालुका प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, हे गावकºयांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. चार्लीवासीयांचा पाण्यासाठी होणारा हाल लक्षात घेता गावकºयांनी अनेकदा वेकोलि प्रशासनाला पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर वेकोलिच्या पोवनी ओपनकास्टमधून गावकऱ्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात पाण्याचे टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. महिलांसह लहान मुले, आबाळवृद्धही गुंडभर पाण्यासाठी धडपड करीत असतात. घरातील मिळेल त्या भांड्यात टँकरमधून पाणी घेतात व साठवून ठेवतात. यासाठी वेकोलि प्रशासनाने गावकºयांना टँकरची तात्पुरती व्यवस्था करून दिली असली तरी एका टँकरवर नागरिकांची तहाण भागणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने वा जिल्हा परिषद प्रशासनाने पाणी टंचाई निवारण आराखड्यानुसार उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्षभर उन्हाळ्यात चार्लीवासीयांचा पाण्यासाठी चाललेला संघर्ष प्रशासनाला दिसून येत नाही, हे दुर्दैव आहे. नागरिकांच्या नशिबी दिवसरात्र पाण्यासाठी पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ आल्यानंतरही तालुका प्रशासनाचे अधिकारी एवढे अनभिज्ञ कसे ? एकीकडे पाण्यासाठी गावकºयांचे हाल होत असताना गावाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अंधारल्या रात्रीही नागरिकांना मिळेल तिथून पाणी आणावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई