शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मिळेल त्या भांड्यात साठवावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:50 IST

गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष सुरू झाला. पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांनी मिळेल तिथून पाणी आणणे सुरू केले आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता वेकोलि प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

ठळक मुद्देचार्ली येथील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष : वेकोलिद्वारा टँकरने पाणी पुरवठा; मात्र प्रशासनाने लक्ष नाही

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष सुरू झाला. पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांनी मिळेल तिथून पाणी आणणे सुरू केले आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता वेकोलि प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप हालचालही केलेली नाही.राजुरा तालुक्यातील चार्लीवासीयांची पाणी मिळविण्यासाठी चाललेली धडपड प्रशासनाच्या नियोजनाला लाजविणारी आहे. राजुरा तालुक्यातील चार्ली - निर्ली परिसरात पाण्याचे मुबलक साठे नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात याठिकाणी दरवर्षी नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. चार्ली या एक हजार १४० लोकसंख्येच्या गावातील बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्याने भर उन्हाळ्यात गावकºयांचा पाण्यासाठी केविलवाना संघर्ष सुरू झाला आहे.येथील नागरिकांना गुंडभर पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली असताना तालुका प्रशासनाने गावकºयांना पाण्याची कुठलीही व्यवस्था करून दिलेली नाही. गावात पाण्याचा एवढा दुष्काळ सुरू असतानाही कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या गावाला भेट दिली नाही. चार्ली गावात नागरिकांना थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना तालुका प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, हे गावकºयांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. चार्लीवासीयांचा पाण्यासाठी होणारा हाल लक्षात घेता गावकºयांनी अनेकदा वेकोलि प्रशासनाला पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर वेकोलिच्या पोवनी ओपनकास्टमधून गावकऱ्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात पाण्याचे टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. महिलांसह लहान मुले, आबाळवृद्धही गुंडभर पाण्यासाठी धडपड करीत असतात. घरातील मिळेल त्या भांड्यात टँकरमधून पाणी घेतात व साठवून ठेवतात. यासाठी वेकोलि प्रशासनाने गावकºयांना टँकरची तात्पुरती व्यवस्था करून दिली असली तरी एका टँकरवर नागरिकांची तहाण भागणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने वा जिल्हा परिषद प्रशासनाने पाणी टंचाई निवारण आराखड्यानुसार उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्षभर उन्हाळ्यात चार्लीवासीयांचा पाण्यासाठी चाललेला संघर्ष प्रशासनाला दिसून येत नाही, हे दुर्दैव आहे. नागरिकांच्या नशिबी दिवसरात्र पाण्यासाठी पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ आल्यानंतरही तालुका प्रशासनाचे अधिकारी एवढे अनभिज्ञ कसे ? एकीकडे पाण्यासाठी गावकºयांचे हाल होत असताना गावाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अंधारल्या रात्रीही नागरिकांना मिळेल तिथून पाणी आणावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई