शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

शेतकऱ्यांच्या परिश्रमावर निसर्गाने फेरले पाणी

By admin | Updated: November 3, 2014 23:23 IST

पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशिरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धानपिकाला प्रचंड झळ बसली आहे. आता धानपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी जमिनीला

देवाडा (खुर्द) : पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशिरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धानपिकाला प्रचंड झळ बसली आहे. आता धानपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या. दरम्यान, धानपीक सुकायला लागले असल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. यावर्षी दोन महिने उशिरा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हलक्या प्रतिच्या धानाची रोवणी फार कमी प्रमाणात करण्यात आली. परंतु मध्यम व जड प्रतिच्या धानपिकांची भरपूर प्रमाणात रोवणी झाली. महागडे बियाणे, भरमसाठ वाढलेली मजुरी, गगनाला भिडलेले रासायनिक खतांचे भाव याचा विचार न करता शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धानपिकाची रोवणी केली. अधून-मधून कमी जास्त पाऊस आल्याने धानपीक डोलू लागले. त्यानंतर मात्र पावसाने कायमची दडी मारल्याने जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या व धान पिकाच्या लोंब्या निघण्याच्या अगोदरच धानपीक सुकायला लागले. त्यामुळे धानपिकांचे रुपांतर तणसामध्ये होत असून शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.पोंभूर्णा तालुका निर्मितीला १५ वर्षांचा काळ लोटूनसुद्धा या तालुक्यात सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना केवळ परंपरागत मामा तलाव, बोडी, नाले व विहीरीच्या पाण्यावरच अवलंबून राहून शेती उत्पादन करावे लागत आहे. यावर्षी अत्यल्प पावसाचे प्रमाण झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात तलाव व बोड्या भरल्या नाहीत. त्यामुळे धानपिकाला एक ते दोनदाच पाणी मिळाले. परंतु अगदी शेवटच्या क्षणात धानपिक गर्भामध्ये असताना पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट झाले. पर्यायाने शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीला मिळाले. परिणामी यावर्षी पोंभूर्णा तालुक्यातील धानपिकाच्या उत्पन्नात प्रचंड घट निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.दरवर्षी होणाऱ्या सततच्या नापिकीमुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला असून बँकांचे शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, आरोग्याचा खर्च कुठून करायचा, या विंवचनेत सापडला आहे. दरवर्षीच्या उत्पन्नात घट होत असल्याने त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे.तालुक्यात अंधारी, वैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. या नद्यांवर सिंचन प्रकल्प उभारुन स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून दिल्यास तालुक्यात धान उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कमी होईल. पर्यायाने शेतकरी सुखी होईल, यादृष्टीने तालुक्यातील लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना होणारी पाणी विषयक समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी नदीवर सिंचन प्रकल्प उभारावे, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)