शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या परिश्रमावर निसर्गाने फेरले पाणी

By admin | Updated: November 3, 2014 23:23 IST

पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशिरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धानपिकाला प्रचंड झळ बसली आहे. आता धानपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी जमिनीला

देवाडा (खुर्द) : पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशिरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धानपिकाला प्रचंड झळ बसली आहे. आता धानपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या. दरम्यान, धानपीक सुकायला लागले असल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. यावर्षी दोन महिने उशिरा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हलक्या प्रतिच्या धानाची रोवणी फार कमी प्रमाणात करण्यात आली. परंतु मध्यम व जड प्रतिच्या धानपिकांची भरपूर प्रमाणात रोवणी झाली. महागडे बियाणे, भरमसाठ वाढलेली मजुरी, गगनाला भिडलेले रासायनिक खतांचे भाव याचा विचार न करता शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धानपिकाची रोवणी केली. अधून-मधून कमी जास्त पाऊस आल्याने धानपीक डोलू लागले. त्यानंतर मात्र पावसाने कायमची दडी मारल्याने जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या व धान पिकाच्या लोंब्या निघण्याच्या अगोदरच धानपीक सुकायला लागले. त्यामुळे धानपिकांचे रुपांतर तणसामध्ये होत असून शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.पोंभूर्णा तालुका निर्मितीला १५ वर्षांचा काळ लोटूनसुद्धा या तालुक्यात सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना केवळ परंपरागत मामा तलाव, बोडी, नाले व विहीरीच्या पाण्यावरच अवलंबून राहून शेती उत्पादन करावे लागत आहे. यावर्षी अत्यल्प पावसाचे प्रमाण झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात तलाव व बोड्या भरल्या नाहीत. त्यामुळे धानपिकाला एक ते दोनदाच पाणी मिळाले. परंतु अगदी शेवटच्या क्षणात धानपिक गर्भामध्ये असताना पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट झाले. पर्यायाने शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीला मिळाले. परिणामी यावर्षी पोंभूर्णा तालुक्यातील धानपिकाच्या उत्पन्नात प्रचंड घट निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.दरवर्षी होणाऱ्या सततच्या नापिकीमुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला असून बँकांचे शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, आरोग्याचा खर्च कुठून करायचा, या विंवचनेत सापडला आहे. दरवर्षीच्या उत्पन्नात घट होत असल्याने त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे.तालुक्यात अंधारी, वैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. या नद्यांवर सिंचन प्रकल्प उभारुन स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून दिल्यास तालुक्यात धान उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कमी होईल. पर्यायाने शेतकरी सुखी होईल, यादृष्टीने तालुक्यातील लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना होणारी पाणी विषयक समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी नदीवर सिंचन प्रकल्प उभारावे, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)