शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

ब्रह्मपुरीत अनेक घरांत पाणी शिरले

By admin | Updated: July 28, 2014 23:26 IST

ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. तब्बल दोन तास पाऊस कोसळत राहिल्याने ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बारई तलावाची बांध फूटली. त्यामुळे जवळच्या शेषनगरात

बारई तलाव फुटला : ब्रह्मपुरीत दोन तास मुसळधार पाऊसब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. तब्बल दोन तास पाऊस कोसळत राहिल्याने ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बारई तलावाची बांध फूटली. त्यामुळे जवळच्या शेषनगरात अनेकांच्या घरात पाणी शिरले. शेषनगर जलमय झाल्याने रस्त्यावरुन येणे-जाणे कठीण झाले होते. ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन तास सारखा मुसळधार पाऊस कोसळत राहिला. यापूर्वीही पावसाने परिसरात चांगलाच प्रतिसाद दिला होता. पण सकाळी पडलेला पाऊस मुसळधार होता. या पावसाने शेषनगरला लागून असलेल्या बारई तलावाने कमाल मर्यादा गाढली. तलाव तुडूंब भरले. दरम्यान, शेषनगरजवळील तलावाची बांध फूटली व पाण्याचा पूर शेषनगरमधून वाहू लागला. मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने याच ठिकाणावरुन बांध फूटला होता. प्रशासनाने त्यावेळी थातुरमातूर उपाययोजना केली होती. त्याचवेळी गांभीर्यान व अचुक बांध दुरुस्ती केली असती तर पुन्हा यावर्षी हा प्रकार उद्भवला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तलावाच्या सभोवताल घनदाट वस्ती उभी झाली आहे. परंतु तलावावरील बांध अनेक वर्षांपासून जसाच्या तसाच कायम आहे. त्यामुळे तलावाची बांध कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी शेषनगर व परिसरातील नागरिकांनी केली आहे.आज कोसळलेल्या मुसळधार पावसाने गणवीर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी साचल्याने नागरिकांना जाणे-येणे करणे कठीण झाले होते. अचानक नागरिकांच्या घरात पाणी शिरणे सुरू झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. घरातील साहित्य पाण्याखाली आले. दोन तास पडलेल्या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले. विशेष म्हणजे, शेषनगर, शांतीनगर, आनंदनगर, डॉ. आखरे हॉस्पिटल मागील परिसर, नवीन ले-आऊट भागात रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. आजच्या पावसाने पुन्हा या रस्त्यांची दैना झाली. नगरपालिकेने नवीन भागाचा विकास करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)