शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
4
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
5
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
6
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
7
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
8
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
9
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
10
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
11
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
12
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
13
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
14
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
15
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
16
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
17
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
18
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
19
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
20
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात

By admin | Updated: August 19, 2014 23:37 IST

सर्वत्र दुष्काळाचे सावट दिसत असल्याने पाण्याचा मुख्य स्रोत समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात सिमेंट कंपन्याकडून उपसा सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना

रत्नाकर चटप - लखमापूरसर्वत्र दुष्काळाचे सावट दिसत असल्याने पाण्याचा मुख्य स्रोत समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात सिमेंट कंपन्याकडून उपसा सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसून उपलब्ध पाणी कंपन्यांच्या घशात जात आहे. दुष्काळात वरदान ठरणाऱ्या अंमलनाला आणि पकडीगुड्डम धरणाचे पाणी फक्त कंपन्यासाठी का, असा सवाल आता निर्माण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेत. आॅगस्ट महिना संपत असतानादेखील पाऊस नाही. त्यामुळे येणाऱ्या पुढील दिवसात शेती आणि पिण्याचे पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न कोरपना तालुक्यातील जनतेला पडला आहे. या तालुक्यात वर्धा नदी, अंमलनाला व पकडीगुड्डम धरण हे प्रमुख पाण्याचे स्रोत असून इतर छोटे बारमाही नाले आहेत. मात्र पाऊस नसल्याने यामधील पाण्याची पातळी घसरली आहे. याचा परिणाम शेती, उद्योग व नागरिकांना भोगावा लागणार आहे. त्यासाठी नदी, धरणे व बारमाही नाल्यांमधील पाण्याचा उपसा थांबविण्याची गरज आहे. परंतु तालुक्यातील सिमेंट कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गप्प का, अशीही चर्चा आता सुरु झाली आहे. कोरपना तालुक्यात १९८५ साली अंमलनाला व १९९१ साली पकडीगुड्डम धरणाचे बांधकाम करण्यात आले. अंमलनाला धरणाअंतर्गत खरीप हंगामात २३४६ हेक्टर तर रब्बी हंगामात १२०२ हेक्टर जमीनीला या जलाशयाचा फायदा होऊ शकतो. या धरणाअंतर्गत तालुक्यातील बैलम, हिरापूर, इसापूर, सोनापूर, गडचांदूर, धामनगाव, पिंपळगाव, नांदा,बिबी, उपरवाही, भेंडवी, मंगी, चंदनवाही, पांढरपवनी, विहीरगाव, वांगी, भुरकूंडा, पाचगाव व लाईनगुडा या २२ गावांना पाणीपुरवठा होतो. पकडीगुड्डम धरणाचे पाणी एका सिंमेट कंपनीला २५.७२ टक्के देण्याचा करार झाल्याने केवड ५७ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. याऊलट सिंचन विभागाने प्रयत्न करुनही १६५ हेक्टर लाभक्षेत्रातील जमीन सिंचनापासून वंचित राहिली आहे. त्यामुळे पिपर्डा, वनसडी, पिपरी, धानोली, लोणी, सोनुर्ली, माथा, वडगाव, इंजापूर, खिरडी, बेलगाव, धनकदेवी या गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन करताच १२ गावांनी ग्रामसभेत ठराव पारित केला. त्यानंतर सुमारे ९५५ हेक्टर या करारामुळे वंचित राहिली तर प्रादेशिक नळ योजनेला ३.५६ दशलक्ष घनमीटर पाणी देण्याच्या कराराने एकूण ११३१ हेक्टर जमीन आज सिंचनाला मुकली आहे. त्यामुळे येणाऱ्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी सदर धरणाचे पाणी वाचविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वर्धा नदीमधूनही सिमेंट कंपन्यांना पाणी दिले जात आहे. त्यामुळे सदर पाण्याचा उपसा थांबवून नागरिकांसाठी व शेतीला सिंचनासाठी पाणी देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. तालुक्यातील ११३ गावांपैकी जवळपास २५ गावांना केवळ उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही तीव्र पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. यात अनेक घरगुती बोअरवेल, विहिरींची पाण्याची पातळी खालावत असून नळ योजनेचेही बारा वाजले आहे.