शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

तलावाच्या निकृष्ट कामामुळे जैतापूरवासीयांवर पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:28 IST

भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी व दिवसेंदिवस निर्माण होणारी पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोणातून जैतापूर येथे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी गाव तलावाच्या कामाचे भूमीपूजन केले. यातून जैतापूरवासीयांची पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न होता. परंतु अकार्यक्षम अभियंता व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षतेमुळे व निकृष्ट कामामुळे या तलावाचे काम पाच वर्षे लोटूनही अपूर्ण आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देपाच वर्षानंतरही काम अर्धवट : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी व दिवसेंदिवस निर्माण होणारी पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोणातून जैतापूर येथे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी गाव तलावाच्या कामाचे भूमीपूजन केले. यातून जैतापूरवासीयांची पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न होता. परंतु अकार्यक्षम अभियंता व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षतेमुळे व निकृष्ट कामामुळे या तलावाचे काम पाच वर्षे लोटूनही अपूर्ण आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.जिल्हा परिषद लघु सिंचन उपविभाग राजुरा अंतर्गत कोरपना-राजुरा तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथील तलावाच्या कामासाठी २० लाख ३९ हजार ६२ रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. या तलावाचे काम चंद्रपूर येथील कंत्राटदाराला देण्यात आले व नियमाप्रमाणे नोव्हेंबर २०१३ मध्ये या कामाचे भूमीपूजन करून कामाला सुरुवात झाली. मात्र, आज पाच वर्षाचा कालावधी लोटूनही गाव तलावाचे काम पूर्ण झाले नसल्याने जैतापूर येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.गावातील हातपंपाचे, विहिरीतील पाण्याची पातळी वाढेल व मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेल या दृष्टीकोणातून गावालगतच या तलावाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र सुरुवातीपासूनच अभियंत्याच्या आशिर्वादाने तलावाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने पहिल्याच पावसाळ्यात तलावाच्या पाळीला भगदाड पडले. परिणामी तलावातील पाणी वाहून गेले. त्यानंतर कंत्राटदार व तत्कालीन अभियंत्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतरही काम करण्यात आले. मात्र सध्यास्थितीत काम अपूर्ण आहे.प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्हशासन गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रभाविपणे योजना राबवित आहे. तर दुसरीकडे एका तलावाचे काम करण्यासाठी पाच वर्षे लागत आहे. गावातील बोअरवेलची व जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल, यासाठी गाव तलावाचे काम सुरू करण्यात आले. मात्र अकार्यक्षम अभियंत्याच्या आशिर्वादाने कंत्राटदाराने निकृष्ठ दर्जाचे काम केले. परिणामी डिसेंबर, जानेवारी महिन्यातच पाण्याने तळ गाठला. पाच वर्षे लोटूनही गाव तलावाचे काम होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी गावकºयांकडून होत आहे.यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे तलाव पाण्याने भरला नाही. त्यामुळे तलाव कामाची पाहणी करता आली नाही. यावर्षी तलाव पाण्याने भरल्यास पाणी लिकेज होत तर नाही ना, याची पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करण्यात येणार आहे. जे काम बाकी आहे, ते काम पूर्ण केल्याशिवाय कंत्राटदाराचे बिल अदा केले जाणार नाही.- बी. एस. भालेराव,उपविभागीय अधिकारीजिल्हा परिषद लघु सिंचाई उपविभाग राजुरा