शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात जलसंकट अधिक गडद होण्याची शक्यता ; १८० टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:42 IST

शहररात अमृत पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे : पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची पातळीही खोल गेली असून, चंद्रपूर शहरातील काही वार्डामध्ये पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विविध प्रभागांमध्ये महापालिकेच्या ८ आणि खासगी ४, अशा १२ टँकरद्वारे दिवस-रात्र १८० फेऱ्या केल्या जात आहे. मात्र, नागरिकांची पाण्याची मागणी वाढल्याने काही ठिकाणी नागरिकांना भटकावे लागत आहे. एप्रिल महिन्यामध्येच ही स्थिती असल्याने पुढील मे महिन्यात जलसंकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शहराला इरई धरण व इरई नदी या दोन ठिकाणांहून पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी मार्च महिन्यात उन्हाळ्याला सुरुवात होताच पाणीटंचाई निर्माण झाली. नळाला पाणी येत नसल्याने अनेक प्रभागातील लोक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. शहरातील विविध प्रभागांत मार्च महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आता परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून दररोज टँकरद्वारे १८० फेऱ्या मारल्या जात आहे. मात्र पाणी अपुरे पडत असल्याने टँकरची संख्या वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी ही स्थिती दरवर्षीसारखीच आहे. दरवर्षी ज्या भागात पाणीटंचाई असते. अशीच स्थिती यावर्षीही आहे. शहरात भीषण टंचाई नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या परिसरात पाणीटंचाईवडगाव, लक्ष्मीनगर, हवेली गार्डन परिसर, जगन्नाथ बाबा वार्ड, रमाईनगर, अष्टभूजा वार्ड, बाबूपेठ, नगिनाबाग, घुटकाळा, गुलमोहर, महाकाली कॉलरी, अंचलेश्वर गेट, राष्ट्रवादी नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा गेट, कृष्ण नगर, इंदिरा नगर यासह अन्य भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

९० ठिकाणी बसवल्या तात्पुरत्या टाक्याशहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध भागामध्ये २० ठिकाणी तात्पुरत्या पाण्याच्या टाकी बसविल्या आहे. या टाकीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, त्यानंतर नागरिक आपापल्या घरी पाणी नेत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईchandrapur-acचंद्रपूरwater transportजलवाहतूक