शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

वर्धा नदी पट्ट्यातील शेती सिंचनापासून वंचित

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्टयात येणाऱ्या गावांत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.

कमी दाबाचा वीज पुरवठा : विद्युत उपकेंद्राला मंजुरीची प्रतीक्षाचंद्रपूर : राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्टयात येणाऱ्या गावांत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी मोटारपंप चालत नसुन विहीरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असुनही शेती सिंचनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यात तीव्र असंतोष पसरला आहे.वर्धा नदी पट्टयातील कोलगाव, कढोली बु., मानोली, बाबापूर, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, मार्डा, कुर्ली, किनबोडी, वरोडा, नांदगाव सुर्याचा, साखरी वाघोबा, पोवनी, माथरा, गोवरी, कोराडी, निमनी, चिंचोली, कवठाळा, जैतापूर, अंतरगाव, गोयगाव आदी गावातील शेतजमीन सुपीक आहे. कापूस, मिरची, सोयाबीन, गहू, चणा आदी या भागातील प्रमुख पीक आहेत. येथील कास्तकारांनी आपल्या शेतात मोठी गुंतवणूक करून बोअरवेल आणि विहीरीचे बांधकाम केले. मात्र मुबलक पाणी असतानादेखील कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे मोटारपंप जळत आहेत. पिकांना पाण्याची गरज असतांनाही ते देता येत नसल्यामुळे पीक डोळ्यादेखत करपत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.या परिसराला विरूर स्टेशन येथील सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा होतो. गोवरी येथे याचे फिडर आहे. मात्र लोड वाढल्यामुळे कमी व्होल्टेजचा वीज पुरवठा होतो अथवा वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे नव्या सबस्टेशनचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र जागा उपलब्ध न झाल्यामुळे मंजुरी मिळाली नसल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. वास्तविक वरोडा, निर्ली आणि साखरी येथे शासकीय जमीन उपलब्ध असुन वीज वितरण कंपनीने हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या परिसरातील कास्तकारांच्या अडचणींचा विचार करून संवेदनशिलता दाखवित हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अशी मागणी उमाकांत धांडे, लक्ष्मणराव एकरे, विनोद झाडे, रामदास पाटील उपरे, रमेश पाटील झाडे, बळीराम वैद्य, रतन वैद्य, मंगेश भोयर, किशोर ढुमणे, सुरेश पोडे, दौलतराव घटे, उत्तम बोबडे, अरूण उरकुडे, नत्थू पाटील बोबडे, लहु पाटील भोयर, एकनाथ कौरासे, कवडू पाटील कौरासे, कवडू गोरे, रवींद्र चटके, सुरेश वराटे, सुभाष गानफाडे, पुंडलीक ताजणे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, गणपतराव हिंगाणे, दीपक पाचभाई, श्रावण मालेकर, नीळकंठ दुबे, प्रदीप दुबे, संजय उमरे, प्रमोद धांडे, विजय धांडे, रामदास पंधरे, नंदकिशोर कौरासे, मारोती क्षीरसागर, संजय गोरे, अनिल बहिरे, विजय निवलकर, अनिल आस्वले, सुरेश ढुमणे आणि परिसरातील कास्तकारांनी केली आहे. (प्रतिनिधी)