शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

वर्धा नदी पट्ट्यातील शेती सिंचनापासून वंचित

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्टयात येणाऱ्या गावांत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.

कमी दाबाचा वीज पुरवठा : विद्युत उपकेंद्राला मंजुरीची प्रतीक्षाचंद्रपूर : राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्टयात येणाऱ्या गावांत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी मोटारपंप चालत नसुन विहीरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असुनही शेती सिंचनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यात तीव्र असंतोष पसरला आहे.वर्धा नदी पट्टयातील कोलगाव, कढोली बु., मानोली, बाबापूर, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, मार्डा, कुर्ली, किनबोडी, वरोडा, नांदगाव सुर्याचा, साखरी वाघोबा, पोवनी, माथरा, गोवरी, कोराडी, निमनी, चिंचोली, कवठाळा, जैतापूर, अंतरगाव, गोयगाव आदी गावातील शेतजमीन सुपीक आहे. कापूस, मिरची, सोयाबीन, गहू, चणा आदी या भागातील प्रमुख पीक आहेत. येथील कास्तकारांनी आपल्या शेतात मोठी गुंतवणूक करून बोअरवेल आणि विहीरीचे बांधकाम केले. मात्र मुबलक पाणी असतानादेखील कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे मोटारपंप जळत आहेत. पिकांना पाण्याची गरज असतांनाही ते देता येत नसल्यामुळे पीक डोळ्यादेखत करपत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.या परिसराला विरूर स्टेशन येथील सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा होतो. गोवरी येथे याचे फिडर आहे. मात्र लोड वाढल्यामुळे कमी व्होल्टेजचा वीज पुरवठा होतो अथवा वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे नव्या सबस्टेशनचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र जागा उपलब्ध न झाल्यामुळे मंजुरी मिळाली नसल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. वास्तविक वरोडा, निर्ली आणि साखरी येथे शासकीय जमीन उपलब्ध असुन वीज वितरण कंपनीने हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या परिसरातील कास्तकारांच्या अडचणींचा विचार करून संवेदनशिलता दाखवित हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अशी मागणी उमाकांत धांडे, लक्ष्मणराव एकरे, विनोद झाडे, रामदास पाटील उपरे, रमेश पाटील झाडे, बळीराम वैद्य, रतन वैद्य, मंगेश भोयर, किशोर ढुमणे, सुरेश पोडे, दौलतराव घटे, उत्तम बोबडे, अरूण उरकुडे, नत्थू पाटील बोबडे, लहु पाटील भोयर, एकनाथ कौरासे, कवडू पाटील कौरासे, कवडू गोरे, रवींद्र चटके, सुरेश वराटे, सुभाष गानफाडे, पुंडलीक ताजणे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, गणपतराव हिंगाणे, दीपक पाचभाई, श्रावण मालेकर, नीळकंठ दुबे, प्रदीप दुबे, संजय उमरे, प्रमोद धांडे, विजय धांडे, रामदास पंधरे, नंदकिशोर कौरासे, मारोती क्षीरसागर, संजय गोरे, अनिल बहिरे, विजय निवलकर, अनिल आस्वले, सुरेश ढुमणे आणि परिसरातील कास्तकारांनी केली आहे. (प्रतिनिधी)