शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदी पट्ट्यातील शेती सिंचनापासून वंचित

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्टयात येणाऱ्या गावांत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.

कमी दाबाचा वीज पुरवठा : विद्युत उपकेंद्राला मंजुरीची प्रतीक्षाचंद्रपूर : राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्टयात येणाऱ्या गावांत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी मोटारपंप चालत नसुन विहीरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असुनही शेती सिंचनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यात तीव्र असंतोष पसरला आहे.वर्धा नदी पट्टयातील कोलगाव, कढोली बु., मानोली, बाबापूर, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, मार्डा, कुर्ली, किनबोडी, वरोडा, नांदगाव सुर्याचा, साखरी वाघोबा, पोवनी, माथरा, गोवरी, कोराडी, निमनी, चिंचोली, कवठाळा, जैतापूर, अंतरगाव, गोयगाव आदी गावातील शेतजमीन सुपीक आहे. कापूस, मिरची, सोयाबीन, गहू, चणा आदी या भागातील प्रमुख पीक आहेत. येथील कास्तकारांनी आपल्या शेतात मोठी गुंतवणूक करून बोअरवेल आणि विहीरीचे बांधकाम केले. मात्र मुबलक पाणी असतानादेखील कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे मोटारपंप जळत आहेत. पिकांना पाण्याची गरज असतांनाही ते देता येत नसल्यामुळे पीक डोळ्यादेखत करपत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.या परिसराला विरूर स्टेशन येथील सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा होतो. गोवरी येथे याचे फिडर आहे. मात्र लोड वाढल्यामुळे कमी व्होल्टेजचा वीज पुरवठा होतो अथवा वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे नव्या सबस्टेशनचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र जागा उपलब्ध न झाल्यामुळे मंजुरी मिळाली नसल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. वास्तविक वरोडा, निर्ली आणि साखरी येथे शासकीय जमीन उपलब्ध असुन वीज वितरण कंपनीने हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या परिसरातील कास्तकारांच्या अडचणींचा विचार करून संवेदनशिलता दाखवित हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अशी मागणी उमाकांत धांडे, लक्ष्मणराव एकरे, विनोद झाडे, रामदास पाटील उपरे, रमेश पाटील झाडे, बळीराम वैद्य, रतन वैद्य, मंगेश भोयर, किशोर ढुमणे, सुरेश पोडे, दौलतराव घटे, उत्तम बोबडे, अरूण उरकुडे, नत्थू पाटील बोबडे, लहु पाटील भोयर, एकनाथ कौरासे, कवडू पाटील कौरासे, कवडू गोरे, रवींद्र चटके, सुरेश वराटे, सुभाष गानफाडे, पुंडलीक ताजणे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, गणपतराव हिंगाणे, दीपक पाचभाई, श्रावण मालेकर, नीळकंठ दुबे, प्रदीप दुबे, संजय उमरे, प्रमोद धांडे, विजय धांडे, रामदास पंधरे, नंदकिशोर कौरासे, मारोती क्षीरसागर, संजय गोरे, अनिल बहिरे, विजय निवलकर, अनिल आस्वले, सुरेश ढुमणे आणि परिसरातील कास्तकारांनी केली आहे. (प्रतिनिधी)