शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

बोरमाडा ते वैनगंगा नदी घाट रस्त्याची दैनावस्था

By admin | Updated: March 13, 2015 01:04 IST

मग्रारोहयो अंतर्गत बोरमाळा पासून वैनगंगा नदीघाटापर्यंत अंदाजे अडीच किलो मीटरचा रस्ता सन २०१०-११ या वर्षीपासून योग्य बांधकामाअभावी रखडून पडला आहे.

गेवरा: मग्रारोहयो अंतर्गत बोरमाळा पासून वैनगंगा नदीघाटापर्यंत अंदाजे अडीच किलो मीटरचा रस्ता सन २०१०-११ या वर्षीपासून योग्य बांधकामाअभावी रखडून पडला आहे. सदर रस्त्याच्या कडेला तीन ते चार वर्षापासून गिट्टी, मुरुमाचे ढग टाकून ठेवलेले आहेत. पहिला कोट बोल्डर टाकून थातूर-मातूर मुरमाचा मुलामा देण्यात आला. तेव्हापासून ग्रामपंचायतीने रस्त्याचे पुढील काम केले नाही. ग्रामपंचायतीने या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामपंचायतीने सदर कामासाठी पुरवठा धारक कंत्राटदाराला साहित्य पुरवठ्याच्या नावाखाली संपूर्ण काम पूर्ण करण्याचे कंत्राट दिले. परंतु स्थानिक मजुरांना या ठिकाणी अल्प मजुरी दिली जात आहे. लागूनच असलेल्या गडचिरोली शहरात यापेक्षा अधिक मजुरी मिळत असल्याने मजूर या कामावर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. मग्रारोहयोच्या कामातील मजुरी मध्ये बरीच तफावत असल्याने कंत्राटदार व ग्रामपंचायतीस मजुरांचा अभाव जाणवू लागला. त्यामुळे सदर रस्त्याचे पुढील बांधकाम होण्यास अडथळा निर्माण झाल्याचे सरपंच व कंत्राटदाराने यांनी सांगितले. मग्रारोहयो कायद्यातील नियमाप्रमाणे कामाच्या ठिकाणी मजुरांची उपलब्धता नसल्यास पाच किलोमीटरच्या परिसरातील मजुरांना कामावर ठेवून उचित दस्ताऐवजांमध्ये योग्य नोंदी घेवून काम पूर्णत्वास आणता येणे शक्य होते.परंतु तशा प्रकारचा कोणताही प्रयत्न बोरमाळ ग्रामपंचायतीने केला नाही. परिसरात अनेक रस्त्यांच्या कामावर परिसरातील मजुरांव्यतिरिक्त बोहरुन मजूर आयात करुन सर्रास मग्रारोहयोचे नियम धाब्यावर बसविल्या जात आहे. याला बोरमाळा ते नदीघाट रस्ता अपवाद ठरत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर रस्ता हा पंचक्रोशितील अत्यंत महत्वाचा रस्ता असून येथून गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. याच रस्त्याने मोठ्या संख्येने मजूर, शेतकरी, भाजी विक्रेते, दुधविक्रेते, तूप, दही, आदी विक्रीसाठी वैनगंगा नदी पार करून जातात. यातील काही लोक पायदळ तर काही सायकलीने जातात. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने त्याचा मोठा त्रास सहन नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.(वार्ताहर)