शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
2
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
3
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
4
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
5
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
6
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
7
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 
8
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
9
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
10
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
11
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
12
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
13
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
14
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
15
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
16
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
17
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
18
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
19
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
20
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

बोरमाडा ते वैनगंगा नदी घाट रस्त्याची दैनावस्था

By admin | Updated: March 13, 2015 01:04 IST

मग्रारोहयो अंतर्गत बोरमाळा पासून वैनगंगा नदीघाटापर्यंत अंदाजे अडीच किलो मीटरचा रस्ता सन २०१०-११ या वर्षीपासून योग्य बांधकामाअभावी रखडून पडला आहे.

गेवरा: मग्रारोहयो अंतर्गत बोरमाळा पासून वैनगंगा नदीघाटापर्यंत अंदाजे अडीच किलो मीटरचा रस्ता सन २०१०-११ या वर्षीपासून योग्य बांधकामाअभावी रखडून पडला आहे. सदर रस्त्याच्या कडेला तीन ते चार वर्षापासून गिट्टी, मुरुमाचे ढग टाकून ठेवलेले आहेत. पहिला कोट बोल्डर टाकून थातूर-मातूर मुरमाचा मुलामा देण्यात आला. तेव्हापासून ग्रामपंचायतीने रस्त्याचे पुढील काम केले नाही. ग्रामपंचायतीने या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामपंचायतीने सदर कामासाठी पुरवठा धारक कंत्राटदाराला साहित्य पुरवठ्याच्या नावाखाली संपूर्ण काम पूर्ण करण्याचे कंत्राट दिले. परंतु स्थानिक मजुरांना या ठिकाणी अल्प मजुरी दिली जात आहे. लागूनच असलेल्या गडचिरोली शहरात यापेक्षा अधिक मजुरी मिळत असल्याने मजूर या कामावर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. मग्रारोहयोच्या कामातील मजुरी मध्ये बरीच तफावत असल्याने कंत्राटदार व ग्रामपंचायतीस मजुरांचा अभाव जाणवू लागला. त्यामुळे सदर रस्त्याचे पुढील बांधकाम होण्यास अडथळा निर्माण झाल्याचे सरपंच व कंत्राटदाराने यांनी सांगितले. मग्रारोहयो कायद्यातील नियमाप्रमाणे कामाच्या ठिकाणी मजुरांची उपलब्धता नसल्यास पाच किलोमीटरच्या परिसरातील मजुरांना कामावर ठेवून उचित दस्ताऐवजांमध्ये योग्य नोंदी घेवून काम पूर्णत्वास आणता येणे शक्य होते.परंतु तशा प्रकारचा कोणताही प्रयत्न बोरमाळ ग्रामपंचायतीने केला नाही. परिसरात अनेक रस्त्यांच्या कामावर परिसरातील मजुरांव्यतिरिक्त बोहरुन मजूर आयात करुन सर्रास मग्रारोहयोचे नियम धाब्यावर बसविल्या जात आहे. याला बोरमाळा ते नदीघाट रस्ता अपवाद ठरत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर रस्ता हा पंचक्रोशितील अत्यंत महत्वाचा रस्ता असून येथून गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. याच रस्त्याने मोठ्या संख्येने मजूर, शेतकरी, भाजी विक्रेते, दुधविक्रेते, तूप, दही, आदी विक्रीसाठी वैनगंगा नदी पार करून जातात. यातील काही लोक पायदळ तर काही सायकलीने जातात. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने त्याचा मोठा त्रास सहन नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.(वार्ताहर)