शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गरजुंसाठी उभी राहिली 'माणुसकीची भिंत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

एकीकडे नियमित नवनवीन कपडे घेणारे दिसतात. तर दुसरीकडे अंगावर लावायलाही कपडे नाही,असा समाज दिसतो. पाच महिने, वर्षभर कपडे वापरले की, ते कपडे फेकायला काढणारा समाजही आहे. मात्र, आता हेच कपडे गरजू, गरिबांना वापरता येणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ नावाची संकल्पना मागील काही वर्षांपासून देशभरात राबविली जात आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर मनपाचा उपक्रम : ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे नियमित नवनवीन कपडे घेणारे दिसतात. तर दुसरीकडे अंगावर लावायलाही कपडे नाही,असा समाज दिसतो. पाच महिने, वर्षभर कपडे वापरले की, ते कपडे फेकायला काढणारा समाजही आहे. मात्र, आता हेच कपडे गरजू, गरिबांना वापरता येणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ नावाची संकल्पना मागील काही वर्षांपासून देशभरात राबविली जात आहे. हिच संकल्पना चंद्रपूर महानगरपालिकेने अंमलात आणली असून, तुकूम येथील दीनदयाल उपाध्याय शाळेत ही माणुसकीची भिंत उभारली आहे. यामुळे आता गरजुंना मदत मिळू शकणार आहे. तसेच जुन्या वस्तूंचा पुनर्वापर या संकल्पनेला वाव मिळणार आहे.वस्तूंचा वापर कमी करणे, त्याचा पुनर्वापर व चक्रीकरण या तत्वांचा वापर प्रत्येक शहरात केला जावा याकरिता शासन प्रयत्नशील आहे. या तीन तत्वांच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा कचरा कमी करण्यास मदत मिळणार आहे. मनपाच्या विविध उपक्रमांपैकीच हा एक नावीण्यपूर्ण उपक्रम आहे. ‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे’ या ब्रिदवाक्याला पूर्णपणे न्याय देणारी चंद्रपूर शहर महानगरपालिका ही संकल्पना राबवित आहे. याच धर्तीवर शहराच्या अन्य रहिवासी भागांमधेही या प्रकारच्या माणुसकीच्या भिंती उभारण्याचे प्रस्तावित असून लवकरच अंमलात आणली जाणार आहे.'माणुसकीची भिंत' ही संकल्पना आता सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. 'नको असेल ते द्या व हवे असेल ते घेऊन जा', यावर आधारलेली ही भिंत गरीब, मध्यमवर्गीय, सर्वांसाठीच आकर्षक ठरत आहे. तुकूम येथील ढोबर म्हणून ओळखली जाणारी शाळा मनपाने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्यात नावीण्यपूर्ण बदल केले आहे. आता ती दीनदयाल उपाध्याय शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेच्या भिंतीवर मनपाने नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे अनेक निराधारांना मायेची ऊब मिळणार आहे. एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा' असे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे एक वस्तू परत-परत वापरल्या जाऊ शकणार आहे, सर्व नागरिकांनी आपल्याकडील अनावश्यक पण इतरांना उपयोगी वस्तू जसे कपडे, चप्पल इत्यादी दान करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब तसेच दुर्लभ घटकांतील गरजवंतांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण देता यावे यासाठी केलेला हा छोटासा उपक्रम आहे. चंद्रपूरकरांनी आपल्या परीने या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा.- संजय काकडे, आयुक्त महानगरपालिका, चंद्रपूर

टॅग्स :Socialसामाजिक