शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

गरजुंसाठी उभी राहिली 'माणुसकीची भिंत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

एकीकडे नियमित नवनवीन कपडे घेणारे दिसतात. तर दुसरीकडे अंगावर लावायलाही कपडे नाही,असा समाज दिसतो. पाच महिने, वर्षभर कपडे वापरले की, ते कपडे फेकायला काढणारा समाजही आहे. मात्र, आता हेच कपडे गरजू, गरिबांना वापरता येणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ नावाची संकल्पना मागील काही वर्षांपासून देशभरात राबविली जात आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर मनपाचा उपक्रम : ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे नियमित नवनवीन कपडे घेणारे दिसतात. तर दुसरीकडे अंगावर लावायलाही कपडे नाही,असा समाज दिसतो. पाच महिने, वर्षभर कपडे वापरले की, ते कपडे फेकायला काढणारा समाजही आहे. मात्र, आता हेच कपडे गरजू, गरिबांना वापरता येणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ नावाची संकल्पना मागील काही वर्षांपासून देशभरात राबविली जात आहे. हिच संकल्पना चंद्रपूर महानगरपालिकेने अंमलात आणली असून, तुकूम येथील दीनदयाल उपाध्याय शाळेत ही माणुसकीची भिंत उभारली आहे. यामुळे आता गरजुंना मदत मिळू शकणार आहे. तसेच जुन्या वस्तूंचा पुनर्वापर या संकल्पनेला वाव मिळणार आहे.वस्तूंचा वापर कमी करणे, त्याचा पुनर्वापर व चक्रीकरण या तत्वांचा वापर प्रत्येक शहरात केला जावा याकरिता शासन प्रयत्नशील आहे. या तीन तत्वांच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा कचरा कमी करण्यास मदत मिळणार आहे. मनपाच्या विविध उपक्रमांपैकीच हा एक नावीण्यपूर्ण उपक्रम आहे. ‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे’ या ब्रिदवाक्याला पूर्णपणे न्याय देणारी चंद्रपूर शहर महानगरपालिका ही संकल्पना राबवित आहे. याच धर्तीवर शहराच्या अन्य रहिवासी भागांमधेही या प्रकारच्या माणुसकीच्या भिंती उभारण्याचे प्रस्तावित असून लवकरच अंमलात आणली जाणार आहे.'माणुसकीची भिंत' ही संकल्पना आता सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. 'नको असेल ते द्या व हवे असेल ते घेऊन जा', यावर आधारलेली ही भिंत गरीब, मध्यमवर्गीय, सर्वांसाठीच आकर्षक ठरत आहे. तुकूम येथील ढोबर म्हणून ओळखली जाणारी शाळा मनपाने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्यात नावीण्यपूर्ण बदल केले आहे. आता ती दीनदयाल उपाध्याय शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेच्या भिंतीवर मनपाने नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे अनेक निराधारांना मायेची ऊब मिळणार आहे. एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा' असे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे एक वस्तू परत-परत वापरल्या जाऊ शकणार आहे, सर्व नागरिकांनी आपल्याकडील अनावश्यक पण इतरांना उपयोगी वस्तू जसे कपडे, चप्पल इत्यादी दान करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब तसेच दुर्लभ घटकांतील गरजवंतांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण देता यावे यासाठी केलेला हा छोटासा उपक्रम आहे. चंद्रपूरकरांनी आपल्या परीने या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा.- संजय काकडे, आयुक्त महानगरपालिका, चंद्रपूर

टॅग्स :Socialसामाजिक