लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे नियमित नवनवीन कपडे घेणारे दिसतात. तर दुसरीकडे अंगावर लावायलाही कपडे नाही,असा समाज दिसतो. पाच महिने, वर्षभर कपडे वापरले की, ते कपडे फेकायला काढणारा समाजही आहे. मात्र, आता हेच कपडे गरजू, गरिबांना वापरता येणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ नावाची संकल्पना मागील काही वर्षांपासून देशभरात राबविली जात आहे. हिच संकल्पना चंद्रपूर महानगरपालिकेने अंमलात आणली असून, तुकूम येथील दीनदयाल उपाध्याय शाळेत ही माणुसकीची भिंत उभारली आहे. यामुळे आता गरजुंना मदत मिळू शकणार आहे. तसेच जुन्या वस्तूंचा पुनर्वापर या संकल्पनेला वाव मिळणार आहे.वस्तूंचा वापर कमी करणे, त्याचा पुनर्वापर व चक्रीकरण या तत्वांचा वापर प्रत्येक शहरात केला जावा याकरिता शासन प्रयत्नशील आहे. या तीन तत्वांच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा कचरा कमी करण्यास मदत मिळणार आहे. मनपाच्या विविध उपक्रमांपैकीच हा एक नावीण्यपूर्ण उपक्रम आहे. ‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे’ या ब्रिदवाक्याला पूर्णपणे न्याय देणारी चंद्रपूर शहर महानगरपालिका ही संकल्पना राबवित आहे. याच धर्तीवर शहराच्या अन्य रहिवासी भागांमधेही या प्रकारच्या माणुसकीच्या भिंती उभारण्याचे प्रस्तावित असून लवकरच अंमलात आणली जाणार आहे.'माणुसकीची भिंत' ही संकल्पना आता सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. 'नको असेल ते द्या व हवे असेल ते घेऊन जा', यावर आधारलेली ही भिंत गरीब, मध्यमवर्गीय, सर्वांसाठीच आकर्षक ठरत आहे. तुकूम येथील ढोबर म्हणून ओळखली जाणारी शाळा मनपाने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्यात नावीण्यपूर्ण बदल केले आहे. आता ती दीनदयाल उपाध्याय शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेच्या भिंतीवर मनपाने नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे अनेक निराधारांना मायेची ऊब मिळणार आहे. एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा' असे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे एक वस्तू परत-परत वापरल्या जाऊ शकणार आहे, सर्व नागरिकांनी आपल्याकडील अनावश्यक पण इतरांना उपयोगी वस्तू जसे कपडे, चप्पल इत्यादी दान करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब तसेच दुर्लभ घटकांतील गरजवंतांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण देता यावे यासाठी केलेला हा छोटासा उपक्रम आहे. चंद्रपूरकरांनी आपल्या परीने या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा.- संजय काकडे, आयुक्त महानगरपालिका, चंद्रपूर
गरजुंसाठी उभी राहिली 'माणुसकीची भिंत'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST
एकीकडे नियमित नवनवीन कपडे घेणारे दिसतात. तर दुसरीकडे अंगावर लावायलाही कपडे नाही,असा समाज दिसतो. पाच महिने, वर्षभर कपडे वापरले की, ते कपडे फेकायला काढणारा समाजही आहे. मात्र, आता हेच कपडे गरजू, गरिबांना वापरता येणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ नावाची संकल्पना मागील काही वर्षांपासून देशभरात राबविली जात आहे.
गरजुंसाठी उभी राहिली 'माणुसकीची भिंत'
ठळक मुद्देचंद्रपूर मनपाचा उपक्रम : ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’