शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

जव्हारला पावसाची प्रतिक्षा

By admin | Updated: June 23, 2016 02:51 IST

तालुक्यात बहुतांश शेतकऱ्याना पाऊस नसल्यामुळे पेरण्या लांबवाव्या लागल्या आहेत. १०० % आदिवासी असलेल्या जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालन पोषण शेतीवर अवलंबून आहे

हुसेन मेमन,  जव्हारतालुक्यात बहुतांश शेतकऱ्याना पाऊस नसल्यामुळे पेरण्या लांबवाव्या लागल्या आहेत. १०० % आदिवासी असलेल्या जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालन पोषण शेतीवर अवलंबून आहे.दरवर्षा प्रमाणे जव्हार तालुक्यात ६ ते ७ जून च्या दरम्यान पावसाने आगमन होते. त्यामुळे शेतकरी यापूर्वीच जमीनीची नांगरणी, मशागत, खते, बी-बियाणे इत्यादीची खरेदी करून पूर्ण तयारीत असतो, मात्र निर्सगाच्या लहरीपणामुळे यंदा पाऊस जून संपत आला तरी पुरेसा पडलेला नाही त्यामुळे यंदा शेती होणार की नाही? असा प्रश्न पडला आहे. बहुतांश शेतकरी छोट्याखानी आपल्याला पुरेल इतकेच भात व नागली पिक घेत असतात आणि त्याच पिकात वर्षभर आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करीत असतात, परंतू पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातून भाताचे बियाणे खरेदी करावे लागत आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्हयातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांची पावसा अभावी चिंता वाढत चाललेली आहे. वेळीच पाऊस पडत पसल्यामुळे पेरण्या लाब्ांणीवर जाणार आणि याचा दुष्परीणाम पिक काढते वेळी पडणार आहे, म्हणून शेतीची लागवड करावयाची की नाही? असा गंभीर प्रश्न छोट्या शेतकऱ्यांना पडला आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदी करून ठेवलेले आहेत, परंतू पाऊस नसल्यामुळे बियाणे पडूनच आहे, महिन्या दोन महिन्यापूर्वीच भाव कमी असतांना खरेदी केलेले बियाणे इतक्या उशीरापर्यंत टिकेल की नाही अशीही शंका शेतकऱ्यांना सतावते आहे, त्यामुळे खरेदी केलेले बियाणे फुकट जाते की काय? आणि पुन्हा बियाणे खरेदी करतांना बाजारभाव चढलेला असेल तर तोही आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसणार आहे.