शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

तीन हजारावर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 28, 2015 01:19 IST

२०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.

चिमूर : २०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. आज ना उद्या मदत मिळेल या आशेवर चिमूर तालुक्यातील शेतकरी जगत आहे. मात्र त्यांना केवळ आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. यावर्षी दुष्काळीस्थिती आहे, अशावेळी शेतकऱ्यांना जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आतातरी शासनाने मदत द्यावी, अशी मागणी आहे.चिमूर तालुक्यात २०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील २७ हजार २४३ शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी मदत जाहीर केली. मात्र यातील ३ हजार २७८ लाभार्थ्यांना अद्यापही नकसान भरपाई मिळाली नाही. विशेष म्हणजे, २३ हजार हजार शेतकऱ्यांना १३ कोटी साठ लाख रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले. मग उर्वरित शेतकऱ्यांवर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज घेऊन हंगाम केला. मात्र यावर्षीही निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्यात आहे. यावर्षी उत्पन्न कमी झाले त्यातच भावही कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पुढील हंगामासाठी बँक, सोसायट्या कर्ज देणार नसल्याने शेती करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. जुलै २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये चिमूर तालुक्यातील २३ हजार २४३ तर आॅगस्ट २०१३ मधील पुरामुळे ४ हजार ५१४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. शासनाकडून आलेल्या आर्थिक मदतीत आॅगस्ट २०१३ चे अनुदान वाटप सुरु आहे. काही जुलै महिन्यांतील वाटप करीत उर्वरित रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली. परंतु याच महिन्यातील ३ हजार २७८ लाभार्थी अनुदानाची वाट बघत आहे. आॅगस्ट महिन्यात ४ हजार ५१४ लाभार्थ्यांपैकी १ कोटी ६७ लाख ७८ हजार ६७५ रुपये अनुदान ३ हजार ९७५ लाभार्थ्यांना देण्यात आले. तर उर्वरित लाभार्थ्यांना वाटप सुरु असल्याचे केवळ सांगितल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)विहिरींचा बांधकाम निधी बेपत्ताचिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील शेतकरी काशिनाथ गजभिये यांना शासनाकडून सिंचन विहिर मंजूर झाली. विहिरीचे बांधकाम सुद्धा सुरु करण्यात आले. परंतु मागील दहा महिन्यांपासून निधी मिळाला नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहे. निधी उपलब्ध करून न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.पीक विमा मिळालाच नाहीसन २०१४-१५ या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला मात्र शेतकऱ्यांना पिक विमा मिळालाच नसल्याचा आरोप होत आहे. नागभीड तालुक्यातील शेतकरी ईश्वर अमृतकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी संबंधितांना निवेदन देऊन पिक विमा देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, पिक विम्याचा पहिला हप्ता २६ जानेवारीच्या आत देण्याचे शासनाचे आदेश आहे. तर दुसरा हप्ता १० मार्चपूर्वी देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमान मिळालाच नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.