शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

तीन हजारावर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 28, 2015 01:19 IST

२०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.

चिमूर : २०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. आज ना उद्या मदत मिळेल या आशेवर चिमूर तालुक्यातील शेतकरी जगत आहे. मात्र त्यांना केवळ आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. यावर्षी दुष्काळीस्थिती आहे, अशावेळी शेतकऱ्यांना जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आतातरी शासनाने मदत द्यावी, अशी मागणी आहे.चिमूर तालुक्यात २०१३ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील २७ हजार २४३ शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी मदत जाहीर केली. मात्र यातील ३ हजार २७८ लाभार्थ्यांना अद्यापही नकसान भरपाई मिळाली नाही. विशेष म्हणजे, २३ हजार हजार शेतकऱ्यांना १३ कोटी साठ लाख रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले. मग उर्वरित शेतकऱ्यांवर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज घेऊन हंगाम केला. मात्र यावर्षीही निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्यात आहे. यावर्षी उत्पन्न कमी झाले त्यातच भावही कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पुढील हंगामासाठी बँक, सोसायट्या कर्ज देणार नसल्याने शेती करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. जुलै २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये चिमूर तालुक्यातील २३ हजार २४३ तर आॅगस्ट २०१३ मधील पुरामुळे ४ हजार ५१४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. शासनाकडून आलेल्या आर्थिक मदतीत आॅगस्ट २०१३ चे अनुदान वाटप सुरु आहे. काही जुलै महिन्यांतील वाटप करीत उर्वरित रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली. परंतु याच महिन्यातील ३ हजार २७८ लाभार्थी अनुदानाची वाट बघत आहे. आॅगस्ट महिन्यात ४ हजार ५१४ लाभार्थ्यांपैकी १ कोटी ६७ लाख ७८ हजार ६७५ रुपये अनुदान ३ हजार ९७५ लाभार्थ्यांना देण्यात आले. तर उर्वरित लाभार्थ्यांना वाटप सुरु असल्याचे केवळ सांगितल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)विहिरींचा बांधकाम निधी बेपत्ताचिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील शेतकरी काशिनाथ गजभिये यांना शासनाकडून सिंचन विहिर मंजूर झाली. विहिरीचे बांधकाम सुद्धा सुरु करण्यात आले. परंतु मागील दहा महिन्यांपासून निधी मिळाला नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहे. निधी उपलब्ध करून न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.पीक विमा मिळालाच नाहीसन २०१४-१५ या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला मात्र शेतकऱ्यांना पिक विमा मिळालाच नसल्याचा आरोप होत आहे. नागभीड तालुक्यातील शेतकरी ईश्वर अमृतकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी संबंधितांना निवेदन देऊन पिक विमा देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, पिक विम्याचा पहिला हप्ता २६ जानेवारीच्या आत देण्याचे शासनाचे आदेश आहे. तर दुसरा हप्ता १० मार्चपूर्वी देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमान मिळालाच नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.