शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

वेकोलिचे मातीचे ढिगारे गावकऱ्यांसाठी ठरले कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:55 IST

राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत वेकोलिच्या भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खननासाठी गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, धोपटाळा व साखरी परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी व नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकले. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला. पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका बसतो.

ठळक मुद्देनाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला । पावसाळ्यातील बँकवॉटरचा शेतीला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत वेकोलिच्या भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खननासाठी गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, धोपटाळा व साखरी परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी व नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकले. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला. पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका बसतो. मात्र वेकोलिने अजुनही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही.राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात दगडी कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने खुल्या खाणी निर्माण केल्या. परंतु, पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले, असा आरोप परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.मातीचे ढिगारे नदी नाल्याच्या काठावर टाकल्याने नैसर्गिक नाल्याचे पात्र बदलले. पावसाळ्यातील पाणी नाल्या न जाता शेतात शिरते. यातून दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. वेकोलिने ३० वर्षांपूर्वी गोवरी-सास्ती परिसरात कोळसा खाण सुरू केली. तेव्हापासून हा परिसर डेंजरझोन म्हणून गणल्या जात आहे.कोळशाचे उत्पादन घेत असताना जिल्हा प्रशासनाकडून वेकोलिला अनेकदा नोटीसा दिल्या. परंतु, शेतकºयांच्या हिताकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मातीचे ढिगारे कर्दनकाळ ठरले आहेत. पावसाळ्यात गोवरी, सास्ती, पोवनी परिसरातील बहुसंख्य गावांना बॅक वॉटरचा फटका बसतो. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येते.वेकोलिचे हे सारे दुष्परिणाम गावकऱ्यांना सहन करावे लागतात. जल, वायु प्रदूषण वाढले. परंतु वेकोलिने गावकºयांच्या समस्यांवर अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. यंदा पावसाळ्यात हीच स्थिती राहणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.दरवर्षी सात गावांचे सर्वाधिक नुकसानवेकोलिने कोळसा खनन करून टाकलेल्या मातीच्या ढिगाºयांमुळे दरवर्षी गोवरी, सास्ती, पोवनी, मानिली, बाबापूर, कढोली, कोलगाव परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसतो. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. पिकांची उत्पादकता घटते. पुराच्या पाण्यामुळे शेतीकडे जाणारे रस्ते बंद होतात. अनेक गावांचा संपर्क तुटतो. यंदाही हीच वेळ येऊ शकते.