शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वेकोलिचे मातीचे ढिगारे गावकऱ्यांसाठी ठरले कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:55 IST

राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत वेकोलिच्या भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खननासाठी गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, धोपटाळा व साखरी परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी व नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकले. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला. पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका बसतो.

ठळक मुद्देनाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला । पावसाळ्यातील बँकवॉटरचा शेतीला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत वेकोलिच्या भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खननासाठी गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, धोपटाळा व साखरी परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी व नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकले. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला. पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका बसतो. मात्र वेकोलिने अजुनही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही.राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात दगडी कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने खुल्या खाणी निर्माण केल्या. परंतु, पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले, असा आरोप परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.मातीचे ढिगारे नदी नाल्याच्या काठावर टाकल्याने नैसर्गिक नाल्याचे पात्र बदलले. पावसाळ्यातील पाणी नाल्या न जाता शेतात शिरते. यातून दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. वेकोलिने ३० वर्षांपूर्वी गोवरी-सास्ती परिसरात कोळसा खाण सुरू केली. तेव्हापासून हा परिसर डेंजरझोन म्हणून गणल्या जात आहे.कोळशाचे उत्पादन घेत असताना जिल्हा प्रशासनाकडून वेकोलिला अनेकदा नोटीसा दिल्या. परंतु, शेतकºयांच्या हिताकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मातीचे ढिगारे कर्दनकाळ ठरले आहेत. पावसाळ्यात गोवरी, सास्ती, पोवनी परिसरातील बहुसंख्य गावांना बॅक वॉटरचा फटका बसतो. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येते.वेकोलिचे हे सारे दुष्परिणाम गावकऱ्यांना सहन करावे लागतात. जल, वायु प्रदूषण वाढले. परंतु वेकोलिने गावकºयांच्या समस्यांवर अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. यंदा पावसाळ्यात हीच स्थिती राहणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.दरवर्षी सात गावांचे सर्वाधिक नुकसानवेकोलिने कोळसा खनन करून टाकलेल्या मातीच्या ढिगाºयांमुळे दरवर्षी गोवरी, सास्ती, पोवनी, मानिली, बाबापूर, कढोली, कोलगाव परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसतो. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. पिकांची उत्पादकता घटते. पुराच्या पाण्यामुळे शेतीकडे जाणारे रस्ते बंद होतात. अनेक गावांचा संपर्क तुटतो. यंदाही हीच वेळ येऊ शकते.