शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मतदारांनो सावधान! खोटी तक्रार केल्यास होणार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:29 IST

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून विविध राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी जय्यर तयारी सुरू केली आहे. मात्र देशातील मागील काही निवडणुकींचा इतिहास आणि इव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत विरोधी पक्षांची भूमिका लक्षात घेता यावेळी निवडणूक आयोग इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचाही उपयोग करणार आहे.

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून विविध राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी जय्यर तयारी सुरू केली आहे. मात्र देशातील मागील काही निवडणुकींचा इतिहास आणि इव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत विरोधी पक्षांची भूमिका लक्षात घेता यावेळी निवडणूक आयोग इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचाही उपयोग करणार आहे. या माध्यमातून मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे, त्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनवर पाच ते सहा सेंकदपर्यंत बघता येणार आहे. मात्र एखाद्या मतदाराने इव्हीएमच्या पारदर्शकतेवर तक्रार केल्यास आणि त्यात तो दोषी आढळल्यास त्याला सहा महिन्यांचा कारावास, एक हजार रुपये दंड अशी शिक्षा होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून काही पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. यामुळे मतदारांंची उत्सुकता शिगेला पोहोेचली आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. मागील काही निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने इव्हीएमचा वापर केला होता. मात्र यात फेरबदल होत असल्याचा विविध राजकीय पक्षांचा आरोप होता. या आरोपांमुळे निवडणूक आयोगाची मोठ्या प्रमाणात देशपातळीवर बदनामाही झाली. त्यानंतर फेरबदल होत असल्याचे सिद्ध करून दाखविण्याचे खुले आव्हाण आयोगाने केले होते. या प्रकारामुळे उमेदवार आणि मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. तर काही राजकीय पक्षांनी बॅलेट पेपरद्वारे जुन्याच पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी केली. या मागणीला निवडणूक आयोगाने धुडकावून लावत कोणत्याही परीस्थितीत बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेतली जाणार नसल्याचे बजावले. यानंतर आयोगाने इव्हीएन मशीनला व्हीव्हीपॅट जोडण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट राहणार असून मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे, त्या मतदाराला व्हीव्हीपॅटद्वारे पाच ते सात सेंकदपर्यंत उमेदवाराचे चिन्ह दिसणार आहे. असे असले तरी, काही खोळसाळ नागरिकांनी जर आपले मतदान दुसऱ्या उमेदवाराला गेल्याची तक्रार केली, तर केंद्रअधिकारी तत्काळ त्याच्याकडून एक अर्ज भरून घेणार आहे. त्या अर्जामध्ये खोटी तक्रार केल्यास ‘मी शिक्षेस पात्र राहणार’ असे लिहून घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिसात प्रकरण जाणार आहे. जर चौकशीमध्ये तक्रार खोटी किंवा दिशाभूल करणारी असेल तर त्याला भारतीय दंड संहितेनुसार १७७ कलमान्वये शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. ही शिक्षा सहा महिने कैद किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्हीही देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मतदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.अशी आहे व्हीव्हीपॅटची क्षमतामतदानानंतर व्हीव्हीपॅटद्वारे ज्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्या उमेदवाराचे चिन्ह पाच ते सात सेंकदपर्यंत मतदारांना दिसणार आहे. त्यानंतर या पॅटद्वारे चिठ्ठी निघणार असून ती पेटीमध्ये बंद होणार आहे. या व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्यांची क्षमता १ हजार ५०० आहे. म्हणजेच, एका मतदान केंद्रावर जर १ हजार १५०० पेक्षा जास्त मतदार असतील, तर त्या केंद्रावर दोनपेक्षा जास्त व्हीव्हीपॅट ठेवण्यात येणार आहे.