शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मतदारांनो सावधान! खोटी तक्रार केल्यास होणार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:29 IST

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून विविध राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी जय्यर तयारी सुरू केली आहे. मात्र देशातील मागील काही निवडणुकींचा इतिहास आणि इव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत विरोधी पक्षांची भूमिका लक्षात घेता यावेळी निवडणूक आयोग इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचाही उपयोग करणार आहे.

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून विविध राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी जय्यर तयारी सुरू केली आहे. मात्र देशातील मागील काही निवडणुकींचा इतिहास आणि इव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत विरोधी पक्षांची भूमिका लक्षात घेता यावेळी निवडणूक आयोग इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचाही उपयोग करणार आहे. या माध्यमातून मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे, त्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनवर पाच ते सहा सेंकदपर्यंत बघता येणार आहे. मात्र एखाद्या मतदाराने इव्हीएमच्या पारदर्शकतेवर तक्रार केल्यास आणि त्यात तो दोषी आढळल्यास त्याला सहा महिन्यांचा कारावास, एक हजार रुपये दंड अशी शिक्षा होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून काही पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. यामुळे मतदारांंची उत्सुकता शिगेला पोहोेचली आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. मागील काही निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने इव्हीएमचा वापर केला होता. मात्र यात फेरबदल होत असल्याचा विविध राजकीय पक्षांचा आरोप होता. या आरोपांमुळे निवडणूक आयोगाची मोठ्या प्रमाणात देशपातळीवर बदनामाही झाली. त्यानंतर फेरबदल होत असल्याचे सिद्ध करून दाखविण्याचे खुले आव्हाण आयोगाने केले होते. या प्रकारामुळे उमेदवार आणि मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. तर काही राजकीय पक्षांनी बॅलेट पेपरद्वारे जुन्याच पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी केली. या मागणीला निवडणूक आयोगाने धुडकावून लावत कोणत्याही परीस्थितीत बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेतली जाणार नसल्याचे बजावले. यानंतर आयोगाने इव्हीएन मशीनला व्हीव्हीपॅट जोडण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट राहणार असून मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे, त्या मतदाराला व्हीव्हीपॅटद्वारे पाच ते सात सेंकदपर्यंत उमेदवाराचे चिन्ह दिसणार आहे. असे असले तरी, काही खोळसाळ नागरिकांनी जर आपले मतदान दुसऱ्या उमेदवाराला गेल्याची तक्रार केली, तर केंद्रअधिकारी तत्काळ त्याच्याकडून एक अर्ज भरून घेणार आहे. त्या अर्जामध्ये खोटी तक्रार केल्यास ‘मी शिक्षेस पात्र राहणार’ असे लिहून घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिसात प्रकरण जाणार आहे. जर चौकशीमध्ये तक्रार खोटी किंवा दिशाभूल करणारी असेल तर त्याला भारतीय दंड संहितेनुसार १७७ कलमान्वये शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. ही शिक्षा सहा महिने कैद किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्हीही देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मतदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.अशी आहे व्हीव्हीपॅटची क्षमतामतदानानंतर व्हीव्हीपॅटद्वारे ज्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्या उमेदवाराचे चिन्ह पाच ते सात सेंकदपर्यंत मतदारांना दिसणार आहे. त्यानंतर या पॅटद्वारे चिठ्ठी निघणार असून ती पेटीमध्ये बंद होणार आहे. या व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्यांची क्षमता १ हजार ५०० आहे. म्हणजेच, एका मतदान केंद्रावर जर १ हजार १५०० पेक्षा जास्त मतदार असतील, तर त्या केंद्रावर दोनपेक्षा जास्त व्हीव्हीपॅट ठेवण्यात येणार आहे.