शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

गावकऱ्यांनो, लय भारी व्हा !

By admin | Updated: December 31, 2015 01:07 IST

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारावयाची आहे.

सीईओंंचे आवाहन : स्वच्छता कार्ड लावण्याचा शुभारंभबल्लारपूर : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारावयाची आहे. यासाठी गावागावांत स्वच्छतेची व्यापक लोक चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. स्वच्छतेचे ध्येय गाठण्यासाठी गावकऱ्यांनो वैयक्तिक शौचालये बांधा. त्याचा वापर करा आणि लय भारी व्हा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मंगळवारी स्वच्छता कार्ड लावण्याचा शुभारंभादरम्यान गावकऱ्यांना केले.बल्लारपूर पंचायत समितीच्या वतीने विदर्भात पहिल्यांदा तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ग्रामपंचायत विसापूरच्या हद्दीतील चुनाभट्टी गावात स्वच्छता कार्ड लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे, उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरीष गेडाम, पं.स. सदस्या सुमन लोहे, संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, जिल्हा परिषद स्वच्छता मिशनचे व्यवस्थापक संजय धोटे, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, अभियंता तृषांत शेंडे, बंडू हिरवे, प्रवीण खंडारे, विसापूरचे उपसरपंच सुनिल रोंगे, ग्रामपंचायत सदस्य अशोक थेरे, बुद्धीवामन कांबळे, विजय वैद्य, गट समन्वयक सुवर्णा जोशी, सुनिल नुत्तलवार यांची उपस्थिती होती.दरम्यान, चुनाभट्टी येथे ७६ कुटुंबाच्या घराच्या दर्शनीभागात हिरव्या रंगाचे लय भारी स्वच्छता कार्ड लावून घरामध्ये शौचालय आहे, त्याचा वापर सर्वजण करतात तर ४ कुटुंबाच्या घरी शौचालय नसल्याने लाल रंगाचे धोका दर्शविणारे स्वच्छता कार्ड डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी लावले. (शहर प्रतिनिधी)बल्लारपूर तालुक्याची हागणदारीमुक्तीकडे वाटचालबल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत १७ ग्रामपंचायती आहेत. यात ९ हजार ९०६ कुटुंबांपैकी केवळ ५५० कुटुंबाकडे शौचालय नाहीत. येत्या मार्च अखेर संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी पंचायत समितीने नियोजन केलेले आहे. त्यानुसार मंगळवारी कोठरी, इटोली, नांदगाव (पो) व हडस्ती, बुधवारी गिलबिली, किन्ही, लावारी व कळमना, गुरुवारी पळसगाव, आमडी व कोर्टीमक्ता तर शुक्रवारी काटवली (बा), बामणी (दु), मानोरा, कवडजी व विसापूर येथील गावकऱ्यांत जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पथकात सभापती, उपसभापती, सदस्य, संवर्ग विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक यांचा समावेश राहणार असून तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला.असे लावले जाते स्वच्छता कार्डस्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ज्या घरामध्ये शौचालय आहे व घरातील सर्व सदस्य त्याचा वापर करतात, त्यासाठी हिरव्या रंगाचे ‘लय भारी’. घरामध्ये शौचालय आहे. परंतु घरातील काही सदस्य शौचालयाचा वापर न करता उघड्यावर जातात. त्यासाठी पिवळ्या रंगाचे ‘फिफ्टी-फिफ्टी’, घरामध्ये शौचालय आहे. परंतु नादुरूस्त असल्यामुळे सर्व सदस्य उघड्यावर शौचास जातात. अशांच्या घरावर केसरी रंगाचे ‘जरा जपून’ तर घरामध्ये शौचालय नाही. त्या घरातील सर्व सदस्यांना उघड्यावर शौचास जावे लागते अशांच्या घरांच्या दर्शनी भागात लाल रंगाचे धोका दर्शविणारे स्वच्छता कार्ड लावण्याचा शुभारंभ बल्लारपूर तालुक्यात करण्यात आला.