शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जिवलग मित्रांच्या मृत्यूने पाणावले गावकऱ्यांचे डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

गोवरी येथील संतोष रामकिसन लांडे (२७) व प्रीतम श्रीहरी परसुटकर (२५) या दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. सकाळी हसत-खेळत आनंदी असणारे दोन्ही चेहरे अचानक कायमचे निघून गेले. गावात निधनाची वार्ता धडकताच स्मशान शांतता पसरली. दुसºया दिवशी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एकाच रूग्णवाहिकेतून दोघांचेही शव गावात आणल्यानंतर अनेकांनी एकच हंबरडा फोडला.

ठळक मुद्देगोवरीत शोककळा । गावात पेटल्या नाही चुली

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मृत्यू हे आयुष्यातले अंतिम सत्य आहे. मृत्युला कुणालाही नाकारता येत नाही. मात्र, अकाली नको, ही मानवाची इच्छा असते. येथील दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातात अकाली बळी गेल्याने चितेकडे पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले. शुक्रवारी गावात कुणाचीही चूल पेटली नाही.गोवरी येथील संतोष रामकिसन लांडे (२७) व प्रीतम श्रीहरी परसुटकर (२५) या दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातातमृत्यू झाला. सकाळी हसत-खेळत आनंदी असणारे दोन्ही चेहरे अचानक कायमचे निघून गेले. गावात निधनाची वार्ता धडकताच स्मशान शांतता पसरली. दुसºया दिवशी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एकाच रूग्णवाहिकेतून दोघांचेही शव गावात आणल्यानंतर अनेकांनी एकच हंबरडा फोडला. वृद्धापकाळात आपल्या भावासोबत आईवडिलांचा आधार ठरणारे दोन युवक जीव कायम नजरेआड झाल्याने गावकºयांनी अन्नालाही शिवले नाही. संतोष लांडे या युवकाचा १२ एप्रिल २०२० रोजी विवाह ठरला होता. त्यामुळे संतोषच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू होती. भावी जोडीदारासोबत आयुष्याची स्वप्ने रंगवित संतोषही आनंदाने घराची कामे करीत होता. घरात सर्वत्र आनंदी वातावरण होते. प्रीतम परसुटकर नुकताच मार्केटिंगचे काम करणाºया एका खासगी कंपनीत कामाला लागला होता. घरी आईवडिलांना आधार व्हावा म्हणून तोही मोठ्या जिद्दीने कामे करायचा. लहानपणी एकाच अंगणात खेळणाºया या दोन जिवलग मित्रांना आपण एकाच वेळेस दोघेही जगाचा निरोप घेणार असा विचारही कधी शिवला नसावा? मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.संतोष हा स्वत:च्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटप करून घराकडे परतत असताना आणि प्रीतम गावाकडून राजुरा येथे काही कामानिमित्त जात असताना अचानक नियतीने डाव साधला.दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाल्याने दोनही जिवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता गावात पसरताच येथे शोककळा पसरली. गावात काही घरी चूली पेटल्या नाही. नियतीने एवढा जबरदस्त आघात कुटुंबियांवर केला की त्यांच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. दोन मित्रांचे अकाली जाणे मनाला कायमचे चटका लावून गेले. शांत व मनमिळावू स्वभावाच्या दोन्ही मित्राने कायमचा जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पेटलेल्या चितेकडे गावकºयांना हुंदके आवरता आले नाही.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू