शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

स्थानिक स्तरावरच सोडविणार पीडितांचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

महिलांमध्ये जागृती नसल्यामुळे अत्याचार होतो.  मात्र, कुठे दाद मागावी याची जागृती नसल्याने अन्याय सहन करावा लागतो. यासाठी राज्य महिला आयोगाने राज्यभरात जनसुनावणी घेणार आहे, अशी माहिती अध्यक्ष चाकणकर यांनी दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटीदरम्यान चाकणकर यांनी बल्लारपुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिलेच्या तक्रारीची विचारणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्याने दुर्गम भागातील महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी तिथे शक्य होत नाही. त्यामुळे ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत राज्यातील पहिली जनसुनावणी चंद्रपुरात झाली. अशा जनसुनावणीतून महिलांचे प्रश्न स्थानिक स्तरावरच यापुढे सोडवू, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी नियोजन भवनात दिली.मंचावर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर उपस्थित होते.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर म्हणाल्या, अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम पोलीस महासंचालकांना शिफारस करून सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी निर्भया पथक, दामिनी पथक, भरोसा सेल सोबतच महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन  सुरू करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थिनी व कामासाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण  मोठे आहे. महिलांमध्ये जागृती नसल्यामुळे अत्याचार होतो.  मात्र, कुठे दाद मागावी याची जागृती नसल्याने अन्याय सहन करावा लागतो. यासाठी राज्य महिला आयोगाने राज्यभरात जनसुनावणी घेणार आहे, अशी माहिती अध्यक्ष चाकणकर यांनी दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटीदरम्यान चाकणकर यांनी बल्लारपुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिलेच्या तक्रारीची विचारणा केली.  या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले असून चार्जशीट तयार झाली. सरकारी वकिलासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केल्याचे पोलीस अधीक्षक साळवे यांनी सांगितले.  

गावात बालविवाह झाल्यास सरपंचांचे पद रद्द- कोरोना कालावधीत मुलींचे बालविवाह वाढले. ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह होईल तेथील सरपंच व विवाह नोंदणी अधिकाऱ्यावर कारवाई करून दोष सिद्ध झाल्यास पद रद्द करावे, अशी शिफारस आयोगाने राज्य सरकारकडे केल्याचे अध्यक्ष चाकणकर यांनी सांगितले.

टोल फ्री क्रमांकावर नोंदवा तक्रारकोरोनामुळे रोजगार बंद झाले. यातून नैराश्य व कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली. अशा घटना रोखण्यासाठी शहरी भागात १०९१ तर ग्रामीण भागासाठी ११२ हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू झाला आहे.

५० महिलांनी मांडल्या समस्यासुनावणीदरम्यान ५० महिलांनी आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासमोर समस्या मांडल्या. तीन प्रकरणात समझोता होऊन प्रश्न निकाली काढण्यात आयोगाला यश मिळाले. समझोता झालेल्या कुटुंबीयांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकर