शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

४५ अंशाचा पारा अंगावर झेलतोय बळीराजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:42 IST

चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर पोहोचला आहे. भरदुपारी उन्हात निघणे कठीण आहे. दुपारच्या सुमारास गजबजणारे रस्तेही निर्मनुष्य झाले आहे. मात्र शेतीची कामे केव्हाही आपल्यालाच करावी लागणार, म्हणून जगाचा पोशिंदा ४५ अंश तापमानाचे रखरखते उन्ह अंगावर झेलत शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हात शेतीची कामे : पोटासाठी आटापिटा

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर पोहोचला आहे. भरदुपारी उन्हात निघणे कठीण आहे. दुपारच्या सुमारास गजबजणारे रस्तेही निर्मनुष्य झाले आहे. मात्र शेतीची कामे केव्हाही आपल्यालाच करावी लागणार, म्हणून जगाचा पोशिंदा ४५ अंश तापमानाचे रखरखते उन्ह अंगावर झेलत शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.यावर्षी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला आले आहे. हवामानाचा अचुक वेध घेणाऱ्या संस्थांनी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५.९ अंश सेल्सीअसपर्यंत गेल्याची नोंद केली आहे. मे महिन्यात तापमानाचा उच्चांक वाढण्याची शक्यता आहे. अशा रखरखत्या उन्हात बळीराजा शेतीकामात व्यस्त आहे. यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकºयांचा आर्थिक बजेट बिघडला आहे. उत्पादन खर्च वाढला, त्या तुलनेत यावर्षी उत्पादन झाले नाही. सर्वच शेतमालाचे भाव पूर्णत: पडल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला आहे. उसनवारी व कर्ज काढून शेतकºयांनी कशीबशी शेती केली होती. मात्र यावर्षी शेतकºयांचा हाती काहीच लागले नाही.शेतकºयांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळत चालला आहे. यावर्षी शेती करायची की नाही, या द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. तर काही शेतकरी शेती ठेक्याने देऊन मोकळे झाले आहे. सध्या शेतातील सर्व शेतमाल निघाला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकºयांनी हंगामाला सुरुवात केली आहे.यावर्षी पावसाळा लवकर सुरु होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी ४५अंशाच्या रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करीत आहे.शेतीच्या कामांना वेगशेतकºयांनी शेतातील माल काढला आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी नागरणी, वखरणी व इतर शेतीची मशागतीची कामे शेतकरी करीत असून शेतकामांना आता चांगलाच वेग आला आहे.उन्हामुळे रस्ते झाले निर्मनुष्यजगात चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक असल्याची नोंद केली गेली आहे. एप्रिल महिन्यातच जिल्ह्याचे तापमान ४५ अंशापार गेल्याने शहरी भागातील रस्ते दुपारी ओस पडू लागले आहे. गावखेड्यातही हीच परिस्थिती आहे. मात्र शेतकरी मात्र शेतीत मशागत करताना दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी