शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

४५ अंशाचा पारा अंगावर झेलतोय बळीराजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:42 IST

चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर पोहोचला आहे. भरदुपारी उन्हात निघणे कठीण आहे. दुपारच्या सुमारास गजबजणारे रस्तेही निर्मनुष्य झाले आहे. मात्र शेतीची कामे केव्हाही आपल्यालाच करावी लागणार, म्हणून जगाचा पोशिंदा ४५ अंश तापमानाचे रखरखते उन्ह अंगावर झेलत शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हात शेतीची कामे : पोटासाठी आटापिटा

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर पोहोचला आहे. भरदुपारी उन्हात निघणे कठीण आहे. दुपारच्या सुमारास गजबजणारे रस्तेही निर्मनुष्य झाले आहे. मात्र शेतीची कामे केव्हाही आपल्यालाच करावी लागणार, म्हणून जगाचा पोशिंदा ४५ अंश तापमानाचे रखरखते उन्ह अंगावर झेलत शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.यावर्षी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला आले आहे. हवामानाचा अचुक वेध घेणाऱ्या संस्थांनी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५.९ अंश सेल्सीअसपर्यंत गेल्याची नोंद केली आहे. मे महिन्यात तापमानाचा उच्चांक वाढण्याची शक्यता आहे. अशा रखरखत्या उन्हात बळीराजा शेतीकामात व्यस्त आहे. यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकºयांचा आर्थिक बजेट बिघडला आहे. उत्पादन खर्च वाढला, त्या तुलनेत यावर्षी उत्पादन झाले नाही. सर्वच शेतमालाचे भाव पूर्णत: पडल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला आहे. उसनवारी व कर्ज काढून शेतकºयांनी कशीबशी शेती केली होती. मात्र यावर्षी शेतकºयांचा हाती काहीच लागले नाही.शेतकºयांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळत चालला आहे. यावर्षी शेती करायची की नाही, या द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. तर काही शेतकरी शेती ठेक्याने देऊन मोकळे झाले आहे. सध्या शेतातील सर्व शेतमाल निघाला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकºयांनी हंगामाला सुरुवात केली आहे.यावर्षी पावसाळा लवकर सुरु होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी ४५अंशाच्या रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करीत आहे.शेतीच्या कामांना वेगशेतकºयांनी शेतातील माल काढला आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी नागरणी, वखरणी व इतर शेतीची मशागतीची कामे शेतकरी करीत असून शेतकामांना आता चांगलाच वेग आला आहे.उन्हामुळे रस्ते झाले निर्मनुष्यजगात चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक असल्याची नोंद केली गेली आहे. एप्रिल महिन्यातच जिल्ह्याचे तापमान ४५ अंशापार गेल्याने शहरी भागातील रस्ते दुपारी ओस पडू लागले आहे. गावखेड्यातही हीच परिस्थिती आहे. मात्र शेतकरी मात्र शेतीत मशागत करताना दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी