शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर गावाला टाकले शहरात

By admin | Updated: August 13, 2014 23:45 IST

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गाव सर्वात मोठा ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथील लोकसंख्या १५ हजारावर आहे. चार स्वस्त धान्य दुकानदारांकडे एकूण दोन हजारावर शिधापत्रिका धारकांची नोंद आहे.

शिधापत्रिका धारकांवर अन्याय : अन्न सुरक्षा योजनेतील वास्तवअनेकश्वर मेश्राम - बल्लारपूरबल्लारपूर तालुक्यातील विसापूर गाव सर्वात मोठा ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथील लोकसंख्या १५ हजारावर आहे. चार स्वस्त धान्य दुकानदारांकडे एकूण दोन हजारावर शिधापत्रिका धारकांची नोंद आहे. परंतु जिल्हा अन्न सुरक्षा पुरवठा विभागाने विसापूर गावाला शहरात टाकले आहे. परिणामी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून अर्ध्यापेक्षा अधिक शिधापत्रिकाधारक वंचित आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ साली अस्तित्वात आला. केंद्र सरकारने महत्वकांक्षी योजना म्हणून रुजू केली. कोणीही शिधापत्रिका धारक उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारने याची अंमलबजावणी फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू केली. त्यानुसार ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के व शहरी भागातील ४५.३४ टक्के शिधापत्रिका धारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.सदर योजनेचा लाभ अंत्योदय, बीपीएल व केशरी शिधापत्रिका धारकांना देण्याचे योजिले आहे. त्यानुसार बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामीण भागात असताना अन्न नागरी पुरवठा विभागाने जावई शोध करून अन्न सुरक्षा योजनेत शहराला जोडले आहे. परिणामी येथील केसरी शिधापत्रिका धारकांवर अन्याय करुन सूड उगवला आहे. यामुळे शिधापत्रिका धारकांना स्वस्त दरात मिळणाऱ्या अन्न धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.विसापूर येथील चार स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून प्राधान्य कुटुंबातील २१९ व अंत्योदय योजनेखाली ५२२ असे एकूण ७४१ शिधापत्रिका धारकांना आजघडीला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ दिला जात आहे. यामुळे ग्रामीण भागात गाव असूनही जाणिवपूर्वक शहरी भागाात विसापूरचा समावेश केल्यामुळे तब्बल ७६७ शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान अन्न नागरी पुरवठा विभागाने केले आहे.विसापूर येथे प्राधान्य कुटुंबातील २१९, अंत्योदय योजनेतील ५२२ व एपीएल केशरी एक हजार २७० असे एकूण दोन हजार ११ शिधापत्रिका धारकांची संख्या आहे. अन्न सुरक्षा योजनेत ग्रामीण भागानुसार यातील एक हजार ५०८ शिधापत्रिका धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे क्रमप्राप्त असताना केवळ शहरी भागाच्या ४५.३४ टक्के लोकसंख्या गणनेला अनुसरुन ७४१ शिधापत्रिका धारकांचा समावेश करण्यात आला. आजही येथील ७४१ शिधापत्रिका धारक रास्त भाव दुकानातील तीन रुपये दराचे गहू व एक रुपया किलो दराच्या भरड धान्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अन्न सुरक्षा योजनेत अन्न नागरी पुररवठा विभागाने विसापूरकरांवर अन्याय केला आहे.