शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

विसापूर गावाला टाकले शहरात

By admin | Updated: August 13, 2014 23:45 IST

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गाव सर्वात मोठा ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथील लोकसंख्या १५ हजारावर आहे. चार स्वस्त धान्य दुकानदारांकडे एकूण दोन हजारावर शिधापत्रिका धारकांची नोंद आहे.

शिधापत्रिका धारकांवर अन्याय : अन्न सुरक्षा योजनेतील वास्तवअनेकश्वर मेश्राम - बल्लारपूरबल्लारपूर तालुक्यातील विसापूर गाव सर्वात मोठा ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथील लोकसंख्या १५ हजारावर आहे. चार स्वस्त धान्य दुकानदारांकडे एकूण दोन हजारावर शिधापत्रिका धारकांची नोंद आहे. परंतु जिल्हा अन्न सुरक्षा पुरवठा विभागाने विसापूर गावाला शहरात टाकले आहे. परिणामी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून अर्ध्यापेक्षा अधिक शिधापत्रिकाधारक वंचित आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ साली अस्तित्वात आला. केंद्र सरकारने महत्वकांक्षी योजना म्हणून रुजू केली. कोणीही शिधापत्रिका धारक उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारने याची अंमलबजावणी फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू केली. त्यानुसार ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के व शहरी भागातील ४५.३४ टक्के शिधापत्रिका धारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.सदर योजनेचा लाभ अंत्योदय, बीपीएल व केशरी शिधापत्रिका धारकांना देण्याचे योजिले आहे. त्यानुसार बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामीण भागात असताना अन्न नागरी पुरवठा विभागाने जावई शोध करून अन्न सुरक्षा योजनेत शहराला जोडले आहे. परिणामी येथील केसरी शिधापत्रिका धारकांवर अन्याय करुन सूड उगवला आहे. यामुळे शिधापत्रिका धारकांना स्वस्त दरात मिळणाऱ्या अन्न धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.विसापूर येथील चार स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून प्राधान्य कुटुंबातील २१९ व अंत्योदय योजनेखाली ५२२ असे एकूण ७४१ शिधापत्रिका धारकांना आजघडीला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ दिला जात आहे. यामुळे ग्रामीण भागात गाव असूनही जाणिवपूर्वक शहरी भागाात विसापूरचा समावेश केल्यामुळे तब्बल ७६७ शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान अन्न नागरी पुरवठा विभागाने केले आहे.विसापूर येथे प्राधान्य कुटुंबातील २१९, अंत्योदय योजनेतील ५२२ व एपीएल केशरी एक हजार २७० असे एकूण दोन हजार ११ शिधापत्रिका धारकांची संख्या आहे. अन्न सुरक्षा योजनेत ग्रामीण भागानुसार यातील एक हजार ५०८ शिधापत्रिका धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे क्रमप्राप्त असताना केवळ शहरी भागाच्या ४५.३४ टक्के लोकसंख्या गणनेला अनुसरुन ७४१ शिधापत्रिका धारकांचा समावेश करण्यात आला. आजही येथील ७४१ शिधापत्रिका धारक रास्त भाव दुकानातील तीन रुपये दराचे गहू व एक रुपया किलो दराच्या भरड धान्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अन्न सुरक्षा योजनेत अन्न नागरी पुररवठा विभागाने विसापूरकरांवर अन्याय केला आहे.