शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

वेकोलि पवनी-२ व ३ परियोजनेचे लोकार्पण

By admin | Updated: December 29, 2015 20:15 IST

ज्या शेतकऱ्यांनी स्वप्नं डोळ्यासमोर ठेवून आपल्या मौल्यवान जमिनी राष्ट्राच्या विकासाकरिता दिल्या, त्या शेतकऱ्यांवर मोबदल्याच्या बाबतीत अन्याय होवू न देण्याची दक्षता आपण घेतली आहे.

राजुरा : ज्या शेतकऱ्यांनी स्वप्नं डोळ्यासमोर ठेवून आपल्या मौल्यवान जमिनी राष्ट्राच्या विकासाकरिता दिल्या, त्या शेतकऱ्यांवर मोबदल्याच्या बाबतीत अन्याय होवू न देण्याची दक्षता आपण घेतली आहे. त्यामुळे १.३० कोटी रुपयांच्या मोबदल्या ऐवजी ५५ कोटी रुपयांचा मोबदला व २३६ नोकऱ्या मिळवून देण्यात आपण यशस्वी ठरलो. एवढेच नाही तर येथील प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के नोकऱ्या मिळवून देण्यात यश आले, ही खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांची सेवा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील पवनी २ व ३ परियोजना या खुल्या कोळसा खाणीचे भूमिपूजन करताना उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आ. अ‍ॅड. संजय धोटे, वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक आर. आर. मिश्रा, तांत्रिक निदेशक एस. एस. मल्ली, बल्लारपूरचे क्षेत्रीय महाप्रबंधक एस. के. बक्षियार, कार्मिक निदेशक डॉ. संजीवकुमार भाजपाचे महानगर जिल्हा अध्यक्ष विजय राऊत, भाजपा नेते चंदनसिंह चंदेल, जिल्हा सचिव राहूल सराफ, राजू घरोटे, साखरीच्या सरपंच बेबीनंदा कोडापे, पवनीच्या सरपंचा सरला फुलझेले, वरोडाचे सरपंच साईनाथ देठे आदी मान्यवरांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रारंभी ना. हंसराज अहीर व अन्य अतिथींनी गोमातेचे पूजन करून खाणीचे उद्घाटन करण्यात आले. ना. अहीर पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमिनीला पुरेसा मोबदला मिळेपर्यंत ही परियोजना सुरू होवू न देण्याचा संकल्प होता व मोबदला घेवूनच या परियोजनेचे काम सुरू करण्यात आले. हा सामुहिक संघर्षाचा परिणाम आहे. याच ठिकाणी गत महिन्यात प्रकल्पग्रस्तांना धनादेश बहाल करण्यात आले. आज वेकोलिने प्राथमिक धर्तीवर २५ प्रकल्पग्रस्तांना टोकन स्वरूपात नोकऱ्यांचे आदेश दिले. यथावकाश इतरांनाही लवकरच नोकऱ्या देण्याचा प्रयत्न वेकोलि प्रबंधन करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना खुल्या खाणीतच नोकरी देण्याची शिफारस वेकोलिकडे करू, अशी ग्वाही त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)