शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

उसगाववासीयांनी तब्बल तीन तास रोखली कोळसा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 5:00 AM

रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व तत्काळ एसीसी सुरक्षा व्यवस्थापक जोगेंद्रसिंग यांच्या व सरपंचाचे पती धनंजय ठाकरे व उपस्थितांसोबत चर्चा करून या रस्त्यावर एसीसीने बॅरिकेड्स लावून कोळसा वाहतूक थांबविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : गेल्या अनेक दिवसांपासून उसगाव-एसीसी रस्त्याने होत असलेली कोळसा वाहतूक थांबवा, अशी मागणी उसगाव ग्रामपंचायतकडून वारंवार केल्यानंतरही कोळसा वाहतूक बंद झाली नसल्याने रविवारी उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले.  दरम्यान, उपविभागीय अधिकारी नांदेडकर घटनास्थळी दाखल झाले व सरपंच, एसीसीचे सुरक्षा अधिकारी जोगेंद्रसिंग यांच्याशी चर्चा करून रस्त्यावर तत्काळ  बॅरिकेड लावून कोळसा व जड वाहनांना बंद करण्याचा निर्णय झाल्याने तीन तासांनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व तत्काळ एसीसी सुरक्षा व्यवस्थापक जोगेंद्रसिंग यांच्या व सरपंचाचे पती धनंजय ठाकरे व उपस्थितांसोबत चर्चा करून या रस्त्यावर एसीसीने बॅरिकेड्स लावून कोळसा वाहतूक थांबविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तोपर्यंत  दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

मनाई असतानाही वाहतूक सुरूचउसगाव ते एसीसी हद्दीपर्यंत ग्रामपंचायतने सीएसआर फंडातून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविला. मात्र या रस्त्यावरून पैनगंगा, मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा वाहतूकदाराकडून कोळसा वाहतुकीसाठी वापर केला जात असल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. विशेषतः कोळसा वाहतूक तारपोलीन न बांधता होत असल्याने वाहनातून कोळसा खाली पडून रस्त्याने दुचाकी, सायकल, पायदळ चालणाऱ्या लोकांच्या अंगावर पडून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसा वाहतूक एसीसी-घुग्घुस सिमेंट मार्गाने करण्यास मनाई असली तरी कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठ्या कंपन्या या रस्त्याचा उपयोग करीत असल्याने घुग्घुस गावातील लोकांना वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत होता. या संदर्भात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस विभागाला निवेदन देऊन लक्ष वेधले. मात्र काहीही झाले नाही. प्रश्न सुटत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून प्रश्न सोडविण्याची वेळ आली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliceपोलिस