शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

बेरोजगारांचा असंतोष रस्त्यावर

By admin | Updated: March 14, 2015 01:07 IST

न्याय व विधी विभागातील गट क, व गट ड पदाची भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. इतर विभागातील पदेही याच पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

चंद्रपूर : न्याय व विधी विभागातील गट क, व गट ड पदाची भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. इतर विभागातील पदेही याच पद्धतीने भरण्यात येणार आहेत. शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून या निर्णयाच्या विरोधात जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांचा असंतोष शुक्रवारी रस्त्यावर उतरला. सुशिक्षीत बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली.महाराष्ट्र शासनाच्या कामगार व आयुक्त कार्यालयार्तंगत विविध कार्यालये येतात. तसेच या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली विविध मंडळे आणि क्षेत्रीय कार्यालये येतात. मात्र, येथील गट क व गट ड ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय तातडीने रद्द करून भरती प्रक्रिया पुर्ववत शासकीय पद्धतीने घेण्यात यावी, महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांचे परीक्षा केंद्र हे जिल्ह्याच्या ठिकाणी देण्यात यावे आदी मागण्या बेरोजगारांनी निवेदनात केल्या. शासकीय ग्रंथालयापासून मोर्चाची सुरूवात करण्यात आली. गांधी चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात श्रीकांत साव, सतीश खोब्रागडे, सतीश काकडे, अविनाश सारोकर, पराग जिझिवार, शुद्धोधन रायपुरे, महेश सोयाम, शितल वाकडे, सविता उंदिरवाडे, रोमा बिश्वास, साजिद शेख यांच्यासह हजारो बेरोजगारांचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)