शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:59 IST

राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत धान्य वितरीत केले जाते. या धान्य वितरणामुळे ग्रामीण भागात शेतकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले असून अनेक ठिकाणी खरीप हंगामाच्या शेतकामावरही परिणाम पडला आहे.

ठळक मुद्देशेतकामावर परिणाम : ठेक्याने शेती देणाऱ्यांची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत धान्य वितरीत केले जाते. या धान्य वितरणामुळे ग्रामीण भागात शेतकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले असून अनेक ठिकाणी खरीप हंगामाच्या शेतकामावरही परिणाम पडला आहे. त्यामुळे शेतकरी शेतमजुरांच्या शोधात आहे.राज्य व केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु केली. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना तसेच अन्य घटकातील नागरिकांसाठी मोफत धान्य वितरण योजना सुरु करण्यात आली. दोन ते पाच रुपये किलोनेसुद्धा काही योजनांच्या माध्यमातून धान्य वितरण सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून केले जाते. धान्य सहजतेने उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची क्रयशक्ती आपोआपच कमी झाली आहे. पूर्वी गावातच मजूर शेतकामासाठी उपलब्ध होत होते. परंतु आता अतिरिक्त पैसे देऊनही शेती कामासाठी मजूर येण्यास तयार होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत चालली आहे.रोजगार हमी योजनेच्या कामावर नोंदणी केलेल्यांना शासनाकडून मजुरी दिली जात आहे. त्यामुळेही शेती कामासाठी महिला व पुरुष मजूर मिळत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात पाहिजे तशी सिंचनाची सोय नसल्याने एक पिकाची शेती बहुतांशी भागात केली जाते.अनेक सधन शेतकरी मजुरांच्या भरवशावर शेती करतात. परंतु आता शेतीसाठी मजूरच मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना आंतर मशागतीची कामे ट्रॅक्टरने करावी लागतात. काही ठिकाणी पुरुष मजुरांना दोनते ते तीनशे रुपयांपर्यंत रोजी द्यावी लागते. त्याही स्थितीत शेतकामासाठी मजूर येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच शेतीची कामे होतात. परंतु याही कामासाठी मजूर शेतकºयांना मिळणे कठीण झाले आहे.शेतीचा हंगामात काही शेतकºयांना ट्रॅक्टरने बाहेर गावावरुन मजूर कामासाठी आणावे लागतात. त्यामुळे दुर्गम भागातील व शहरात राहून गावात शेती करणारे अनेक शेतकरी आपल्या शेतजमिनी ठेक्याने देण्याच्या मागे लागले आहेत. काही शेतकरी भागीदारीत शेती करीत असून काही शेतकरी नगदी पैसे घेऊन आपली शेती एका हंगामाकरिता करण्यासाठी देत आहेत. जिल्ह्यात दारू बंदी झाल्यानंतर ग्रामीण भागात अवैध दारुविक्रीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसभर शेतात राबण्याऐवजी दारु विकून अर्ध्या तासात दिवसभराची मजुरी हाती येते. याचाही परिणाम शेती व्यवसायावर झालेला आहे. शासनाने मोफत व स्वस्त रकमेत धान्य वितरणाच्या या योजनांचा फेर आढावा घ्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत.पूर्वी मजूर उपलब्ध होत असल्याने पशुपालनाचा जोडधंदा शेतकरी करायचे परंतु आता पशुधन राखण्यासाठी कुणीही तयार होत नाही. त्यामुळे पशुधन व्यवसायसुद्धा मोडीत निघाले आहेत. कसायाचा धंदा मात्र वाढला आहे. एकूणच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी