शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अल्ट्राटेकने सिमेंटची उत्पादकता वाढविली; मात्र कामगारांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 15:24 IST

कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत.

ठळक मुद्देसिमेंटच्या धुळीमुळे कामाच्या ठिकाणी गुदमरतोय कामगारांचा श्वास

राजेश भोजेकर/आशिष देरकर

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी माणिकगड युनिटमधील कामगारांना प्रशिक्षित करून उत्पादन क्षमतेत वाढ घडवून आणण्यात यशस्वी झाली; मात्र प्रचंड धुळीमुळे कामाच्या ठिकाणी कामगारांचा श्वास गुदमरत असल्याने कामगारांच्या आरोग्याचे काय, हा प्रश्न कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.

कामगारांना कामाचा मोबदला आर्थिक स्वरूपात मिळत असला तरी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी सिमेंट कंपनीची आहे; मात्र शासनाने ठरवून दिलेल्या प्रदूषणविषयक कोणत्याही अटी- शर्तींचे पालन कंपनीच्या माणिकगड युनिटकडून होताना दिसत नाही. आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याची जाणीव कामगारांना असूनही त्यांच्यात कंपनीविरोधात आवाज उठविण्याची क्षमता नाही. कामगार संघटनाही याबाबत ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत.

कामगारांच्या आरोग्याचे सर्वेक्षणच नाही?

कारखाने अधिनियम १९४८, महाराष्ट्र कारखाने अधिनियम १९६३ नुसार धोकादायक धुळीच्या कणांमुळे कामगारांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांचे सर्वेक्षण करणे आवश्यक असते. कर्कश आवाजामुळे कामगारांना कर्णबधिरतेचा त्रास आहे की काय? याबाबत सुद्धा सर्वेक्षण करणे आवश्यक असते; मात्र ते केले जात नाही. अशा आवाजाची तीव्रता मोजून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असते; मात्र उपाययोजना न करता सतत वायू व ध्वनिप्रदूषण सुरूच असते.

धूळ नियंत्रण यंत्र लावण्यात अडचण काय?

अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर व अंबुजा सिमेंट उपरवाही या शेजारच्या कंपन्यांमध्ये अत्याधुनिक धूळ नियंत्रण संयंत्र बसविण्यात आल्याने वायू प्रदूषणाबाबतच्या तक्रारी कमी आहेत; मात्र अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माणिकगड युनिटबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. प्रदूषण नियंत्रित करण्याचा उपाय कंपनीजवळ असताना धूळ नियंत्रण संयंत्र बसविण्यात अडचण काय, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

कामगार व नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात घट

सिमेंटची धूळ गडचांदूर व परिसरातील वस्तीत पसरल्यामुळे गडचांदूरमध्ये अनेक नागरिक व कामगारांमध्ये श्वसन विकार, फुफ्फुसाचा कर्करोग, फुफ्फुस निकामी होणे, ब्राँकाइटिस, एलर्जी, ॲलर्जिक खोकला, त्वचेचे रोग व केसांवर विपरित परिणाम होऊन केस गळतीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेळीच या प्रदूषणाची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. नाही तर भविष्यात आरोग्याची स्थिती भयावह असेल.

डॉ. कुलभूषण मोरे, संचालक, अर्थ फाउंडेशन, गडचांदूर.

टॅग्स :pollutionप्रदूषणchandrapur-acचंद्रपूर