शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

अल्ट्राटेकने सिमेंटची उत्पादकता वाढविली; मात्र कामगारांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 15:24 IST

कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत.

ठळक मुद्देसिमेंटच्या धुळीमुळे कामाच्या ठिकाणी गुदमरतोय कामगारांचा श्वास

राजेश भोजेकर/आशिष देरकर

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी माणिकगड युनिटमधील कामगारांना प्रशिक्षित करून उत्पादन क्षमतेत वाढ घडवून आणण्यात यशस्वी झाली; मात्र प्रचंड धुळीमुळे कामाच्या ठिकाणी कामगारांचा श्वास गुदमरत असल्याने कामगारांच्या आरोग्याचे काय, हा प्रश्न कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.

कामगारांना कामाचा मोबदला आर्थिक स्वरूपात मिळत असला तरी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी सिमेंट कंपनीची आहे; मात्र शासनाने ठरवून दिलेल्या प्रदूषणविषयक कोणत्याही अटी- शर्तींचे पालन कंपनीच्या माणिकगड युनिटकडून होताना दिसत नाही. आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याची जाणीव कामगारांना असूनही त्यांच्यात कंपनीविरोधात आवाज उठविण्याची क्षमता नाही. कामगार संघटनाही याबाबत ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत.

कामगारांच्या आरोग्याचे सर्वेक्षणच नाही?

कारखाने अधिनियम १९४८, महाराष्ट्र कारखाने अधिनियम १९६३ नुसार धोकादायक धुळीच्या कणांमुळे कामगारांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांचे सर्वेक्षण करणे आवश्यक असते. कर्कश आवाजामुळे कामगारांना कर्णबधिरतेचा त्रास आहे की काय? याबाबत सुद्धा सर्वेक्षण करणे आवश्यक असते; मात्र ते केले जात नाही. अशा आवाजाची तीव्रता मोजून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असते; मात्र उपाययोजना न करता सतत वायू व ध्वनिप्रदूषण सुरूच असते.

धूळ नियंत्रण यंत्र लावण्यात अडचण काय?

अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर व अंबुजा सिमेंट उपरवाही या शेजारच्या कंपन्यांमध्ये अत्याधुनिक धूळ नियंत्रण संयंत्र बसविण्यात आल्याने वायू प्रदूषणाबाबतच्या तक्रारी कमी आहेत; मात्र अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माणिकगड युनिटबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. प्रदूषण नियंत्रित करण्याचा उपाय कंपनीजवळ असताना धूळ नियंत्रण संयंत्र बसविण्यात अडचण काय, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

कामगार व नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात घट

सिमेंटची धूळ गडचांदूर व परिसरातील वस्तीत पसरल्यामुळे गडचांदूरमध्ये अनेक नागरिक व कामगारांमध्ये श्वसन विकार, फुफ्फुसाचा कर्करोग, फुफ्फुस निकामी होणे, ब्राँकाइटिस, एलर्जी, ॲलर्जिक खोकला, त्वचेचे रोग व केसांवर विपरित परिणाम होऊन केस गळतीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेळीच या प्रदूषणाची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. नाही तर भविष्यात आरोग्याची स्थिती भयावह असेल.

डॉ. कुलभूषण मोरे, संचालक, अर्थ फाउंडेशन, गडचांदूर.

टॅग्स :pollutionप्रदूषणchandrapur-acचंद्रपूर