शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

वाघाच्या भीतीने लोकं दहशतीत, आणखी दोघांचा घेतला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 11:37 IST

सावली व मूल तालुक्यातील घटना

सावली, मूल (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात वाघ जणू ग्रामीण नागरिकांचा कर्दनकाळ बनल्याचे दिसत आहे. वाघाने आतापर्यंत अनेक निरपराधांच्या नरडीचा घोट घेत यमसदनी पाठविले. अशातच बुधवारी आणखी दोघांचा वाघाने बळी घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

एका घटनेत शौचास गेलेल्या एका इसमाला वाघाने ठार करून ८०० मीटरपर्यंत फरफटत नेले व ठार केले. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चकपिरंजी बिट क्रमांक ३९७ अंतर्गत येत असलेल्या रुद्रापूर येथे घडली. बाबूराव बुधाजी कांबळे (६०) असे मृतकाचे नाव असून तो रुद्रापूर येथील रहिवासी होता. वाघाने ठार केलेली एकाच आठवड्यातील दुसरी घटना असल्याने तालुक्यातील नागरिक भयभीत झालेले आहेत.

सावली तालुका हा जंगलव्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील अनेक गावे ही जंगलालगत असल्याने हिंस्र पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुद्रापूर येथील बाबूराव हा गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळील उसेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर शौचाकरिता गेला होता. त्याच्याच पाठीमागे शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. घटनास्थळापासून जवळपास ८०० मीटरपर्यंत फरफटत नेले. ही घटना गावाला लागूनच असल्याने गावकऱ्यांनी आरडाओरड करीत वाघाच्या मागे धाव घेतली. गावकऱ्यांच्या आवाजाने वाघाने बोरकुटे यांच्या शेतातच मृतदेह सोडून पळ काढला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविला.

मूल तालुक्यात गुराख्याला केले ठार

मूल तालुक्यातील कांतापेठ येथील रेल्वेलाइन परिसरात बकऱ्या चारायला गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले व मृतदेहाला जवळपास दीड किमीपर्यंत फरफटत नेले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान चिरोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२० मध्ये घडली. देवराव लहानू सोपणकार (५५) रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या गुराख्याचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी कांतापेठ येथील शेतात काम करायला गेलेल्या महिलेवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली होती. वारंवार घटना घडत असताना वनविभाग मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता योग्य पावले उचलत नसल्याने नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर