शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

सिवरेज टाकी साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 5:39 PM

एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती-धोपटाळा टाऊनशिप येथील घटना

चंद्रपूर : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती - धोपटाळा टाऊनशिप येथे आज(दि. २२) सकाळी ९ वाजता सांडपाणी व भूमिगत सिवरेज टाकी, गटर साफ करण्यासाठी आत गेलेले कंत्राटी कामगार व वेकोलि कामगार गॅसमुळे बेशुद्ध झाले. ही माहिती बाहेर असलेल्या कामगारांना मिळताच त्यांना तातडीने बल्लारपूर क्षेत्रीय दवाखान्यात नेण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती - धोपटाळा टाऊनशिपमध्ये सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कंत्राटी कामगार दहा फूट खोल असलेली टँक साफ करण्यासाठी उतरले होते. बराच वेळ होऊनही ते न आल्याने आणि आवाज दिल्यानंतर कोणताही प्रतिसाद न दिल्याने कंपनीचा एक कर्मचारी टँकमध्ये उतरला. तोही वर न आल्याने व आवाजाला प्रतिसाद न दिल्याने वर असलेले कामगार घाबरले आणि त्यांनी शेजारच्या लोकांना माहिती दिली.

यानंतर तातडीने टँकवरील स्लॅप जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी तीन कंत्राटी कामगार व एक वेकोलि कामगार बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांना बाहेर काढण्यासाठी रामपूर ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी शंकर आंदगुला खाली उतरले आणि उपस्थितांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढले. जखमी मजुरांना रुग्णालयात नेले असता ५-७ मिनिटांनी शंकर आंदगुला हेही बेशुद्ध पडले. त्यांना वेकोलिच्या रुग्णालयातही नेण्यात आले.

एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी उपचारांना दाद न देता कंत्राटी राजू जंजर्ला व सुभाष खंडाळकर या दोघांचा मृत्यू झाला. वेकोलिचे कामगार सुशील कोरडे यांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. वेकोलि कर्मचारी प्रमोद वाभिटकर, रामपूर गावातील कंत्राटी सफाई कामगार शंकर आंदगुला यांचेवर उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साखरे यांनी बंदोबस्त ठेवला असुन तपास सुरू आहे. 

वेकोलीची सुरक्षितता चव्हाट्यावर 

वेकोलीच्या कामात नेहमीच अपघात होत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत दुर्लक्ष केले जाते. कामगारांना यांचा नेहमीच त्रास सोसावा लागत असल्याची खंत कामगारांनी बोलून दाखवली. विशेष म्हणजे एवढी मोठी दुर्घटना घडूनही बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांचे कार्यालय काही मीटरच्या अंतरावर असतांना दुर्घटना स्थळावर अथवा दवाखान्यात एकाही वरीष्ठ अधिकाऱ्याने भेट दिली नाही. मात्र वेकोलिच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी आले आणि मदत कार्यात सहभाग घेतला. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथे दवाखान्यात भेट देऊन जखमीची माहिती घेतली.

 दुर्घटनेतील पिडीतांना आर्थिक मदतीची मागणी

 घटनेची माहिती मिळताच येथील शिवसेनेचे राजुरा विधानसभा समन्वयक बबन ऊरकुडे यांनी वेकोलीच्या रुग्णालयात भेट देऊन दुर्घटनेतील पिडीतांना आर्थिक मदतीची मागणी करीत वेकोलीच्या क्षेत्रीय रूग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने वेकोलिच्या कार्यप्रणाली वर आरोप करीत दोशिंवर कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :Deathमृत्यूLabourकामगारballarpur-acबल्लारपूर