शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सिवरेज टाकी साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 18:05 IST

एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती-धोपटाळा टाऊनशिप येथील घटना

चंद्रपूर : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती - धोपटाळा टाऊनशिप येथे आज(दि. २२) सकाळी ९ वाजता सांडपाणी व भूमिगत सिवरेज टाकी, गटर साफ करण्यासाठी आत गेलेले कंत्राटी कामगार व वेकोलि कामगार गॅसमुळे बेशुद्ध झाले. ही माहिती बाहेर असलेल्या कामगारांना मिळताच त्यांना तातडीने बल्लारपूर क्षेत्रीय दवाखान्यात नेण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती - धोपटाळा टाऊनशिपमध्ये सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कंत्राटी कामगार दहा फूट खोल असलेली टँक साफ करण्यासाठी उतरले होते. बराच वेळ होऊनही ते न आल्याने आणि आवाज दिल्यानंतर कोणताही प्रतिसाद न दिल्याने कंपनीचा एक कर्मचारी टँकमध्ये उतरला. तोही वर न आल्याने व आवाजाला प्रतिसाद न दिल्याने वर असलेले कामगार घाबरले आणि त्यांनी शेजारच्या लोकांना माहिती दिली.

यानंतर तातडीने टँकवरील स्लॅप जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी तीन कंत्राटी कामगार व एक वेकोलि कामगार बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांना बाहेर काढण्यासाठी रामपूर ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी शंकर आंदगुला खाली उतरले आणि उपस्थितांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढले. जखमी मजुरांना रुग्णालयात नेले असता ५-७ मिनिटांनी शंकर आंदगुला हेही बेशुद्ध पडले. त्यांना वेकोलिच्या रुग्णालयातही नेण्यात आले.

एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी उपचारांना दाद न देता कंत्राटी राजू जंजर्ला व सुभाष खंडाळकर या दोघांचा मृत्यू झाला. वेकोलिचे कामगार सुशील कोरडे यांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. वेकोलि कर्मचारी प्रमोद वाभिटकर, रामपूर गावातील कंत्राटी सफाई कामगार शंकर आंदगुला यांचेवर उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साखरे यांनी बंदोबस्त ठेवला असुन तपास सुरू आहे. 

वेकोलीची सुरक्षितता चव्हाट्यावर 

वेकोलीच्या कामात नेहमीच अपघात होत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत दुर्लक्ष केले जाते. कामगारांना यांचा नेहमीच त्रास सोसावा लागत असल्याची खंत कामगारांनी बोलून दाखवली. विशेष म्हणजे एवढी मोठी दुर्घटना घडूनही बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांचे कार्यालय काही मीटरच्या अंतरावर असतांना दुर्घटना स्थळावर अथवा दवाखान्यात एकाही वरीष्ठ अधिकाऱ्याने भेट दिली नाही. मात्र वेकोलिच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी आले आणि मदत कार्यात सहभाग घेतला. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथे दवाखान्यात भेट देऊन जखमीची माहिती घेतली.

 दुर्घटनेतील पिडीतांना आर्थिक मदतीची मागणी

 घटनेची माहिती मिळताच येथील शिवसेनेचे राजुरा विधानसभा समन्वयक बबन ऊरकुडे यांनी वेकोलीच्या रुग्णालयात भेट देऊन दुर्घटनेतील पिडीतांना आर्थिक मदतीची मागणी करीत वेकोलीच्या क्षेत्रीय रूग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने वेकोलिच्या कार्यप्रणाली वर आरोप करीत दोशिंवर कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :Deathमृत्यूLabourकामगारballarpur-acबल्लारपूर