शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

आदिवासींना जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: March 14, 2015 01:06 IST

तालुक्यात आदिवासींच्या जमिनी हडप करुन आदिवासींना बेघर करणारे मात्र समाजात मिरवीत आहे.

राजुरा : तालुक्यात आदिवासींच्या जमिनी हडप करुन आदिवासींना बेघर करणारे मात्र समाजात मिरवीत आहे. यामुळे आदिवासीसमाजावर मोठा अन्याय होत आहे. काही जण त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहे. या आदिवासींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.सास्ती येथील बंडू कुळमेथे यांची सात एकर जागा बिना परवानगी हडपली. देवाडा येथील आदिवासी मानक मेश्राम हे वडीलोपार्जीत शेती करीत आहे. १८ फेब्रुवारी २०१५ ला या आदिवासीच्या शेतामधील उभे ज्वारीचे पीक उचलून नेले. हा प्रकार सातत्याने वाढत असल्याने यावर आळा घालणे गरजेचे आहे. मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील देवाडा, लक्कडकोट, येरगव्हाण येथील आदिवासींचा जमिनीवर ताबा आहे. परंतु या जमिनीच्या कागदपत्रावर पूर्वीच्या जमिनदारांचे नाव आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. मताच्या राजकारणासाठी राजकीय नेतेसुद्धा या आदिवासींना न्याय मिळवून देण्यात असमर्थ ठरत आहे. येरगव्हान येथील लता करमनकर या महिलेने सर्वे क्रमांक १४३ आराजी ४.०५ आर शेत ठेक्याने घेतली आहे. दोन वर्षापर्यंत ठेकेकरार नामा लिहून घेतो म्हणून चंद्रपूरच्या व्यक्तींनी त्या जागेची रजिस्ट्री करुन घेतली. लता करमनकर यांनी राजुरा पोलिसात तक्रार दिली आहे. मौजा सास्ती येथील सर्वे क्रमांक १०९/१ मधील १ हेक्टर ४७ आर जमीन मधूकर गिरटकर यांची होती. परंतु याचे वारसदार किंवा जावई यांना नोकरी मिळाली नाही. गरीब लाचार आदिवासी बांधव पोलिसात तक्रार करताना आणि जे धनाठ्य आहे ते पोलिसांना घुस देऊन प्रकरण दाबून टाकतात असा आरोप आता होत आहे.राजुरा शहरामधील सर्वे क्रमांक १४९ मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी ज्या शासकीय आहेत त्याची विक्री झाली असून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)