शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी सोसायटी हमी भावाने करणार धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने धान खरेदी केंद्र चिमूर येथे सुरू केले. परंतु चिमूर येथे धान विक्रीस जाणे त्रासदायक होते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी हमी भावाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत होते. शासनाने हमी भाव उच्च धान प्रती क्विंटल १ हजार ८३५ व १ हजार ८१५ असा जाहीर केला आहे. तर प्रती क्विंटल ७०० रुपये अनुदान जाहीर केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : धान उत्पादकांना चिमूरला जाण्याची अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी धानाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले. परंतु बाजारामध्ये धानाचे भाव गडगडल्याने हमी भावाने धान खरेदी करावी, अशी मागणी केली जात होती. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ आदिवासी सेवा सहकारी सोसायटींना हमी भावाने धान खरेदी करण्याचे अधिकार दिल्याने या केंद्रावर धान विकल्यास हमी भाव व धानाकरिता शासनाने जाहीर केलेले अनुदानही धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने धान खरेदी केंद्र चिमूर येथे सुरू केले. परंतु चिमूर येथे धान विक्रीस जाणे त्रासदायक होते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी हमी भावाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत होते. शासनाने हमी भाव उच्च धान प्रती क्विंटल १ हजार ८३५ व १ हजार ८१५ असा जाहीर केला आहे. तर प्रती क्विंटल ७०० रुपये अनुदान जाहीर केले आहे.शेतकऱ्यांना धान विक्रीकरिता जाताना धानाची नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक असने गरजेचे आहे. धान खरेदी एका शेतकऱ्यांकडून प्रती हेक्टर ३५ क्विंटल तर अनुदान ५० क्विंटलपर्यंत दिले जाणार आहे. धान विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. या नविन निर्णयामुळे काही प्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सोयाबीनची आवक वाढताच दर घसरलेचंद्रपूर : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट सहन करीत शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक फटका सहन करावा लागतो. परतीच्या पावसात अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. काढणीला आलेले काही शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेले तर काही ठिकाणी पाणी लागल्याने सोयाबीनला डाग लागला. हाच डाग व्यापाऱ्यांची चांदी करणारा ठरला असून शेतकऱ्यांना मात्र याचा फटका सहन करावा लागत आहे. सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनला सर्वसाधारण दर तीन हजार ६०० रुपये प्रती क्विंटल होता मात्र, शेतकऱ्यांचा माल बाजारात विक्रीसाठी येताच सोयाबीनचा काळा डाग शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरला. ९० टक्के शेतकऱ्यांना कधीच उच्चांकी दर मिळाला नाही. मागील वर्षी साठवणूक करून ठेवणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांना दरवाढीचा अधिक फायदा झाला आहे. काळ्या डागाने प्रति क्विंटल किमान ८०० ते एक हजार रुपये शेतकऱ्यांना कमी मिळाले. त्यात पुन्हा ओलावा आल्याने शेतकरी पुरते हतबल झाले. रबी पेरणीच्या मशागतीसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी मिळेल तो दर घेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केले. मात्र महिना भरातच दर वाढत गेल्याने अनेक शेतकऱ्यांना पश्चातपही झाला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड