शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

राजोलीतील बेरोजगाराचे स्थानांतरण

By admin | Updated: May 18, 2014 23:27 IST

शेतीचा हंगाम संपल्यानंतर हाताला काम नसल्यामुळे बेरोजगार युवकांचे जत्थेच्या जत्थे कामाच्या शोधात स्थानांतरित होत असून या परिसरातील गावखेडे ओस पडू लागल्याचे चित्र आहे.

 राजोली : शेतीचा हंगाम संपल्यानंतर हाताला काम नसल्यामुळे बेरोजगार युवकांचे जत्थेच्या जत्थे कामाच्या शोधात स्थानांतरित होत असून या परिसरातील गावखेडे ओस पडू लागल्याचे चित्र आहे. या परिसरातील मुख्य व्यवसाय शेती असून वर्षभराची उलाढाल शेतीच्या उत्पादनावरच केली जाते. वर्षभराच्या अन्नधान्याची बेगमी व मुलाबाळाच्या भविष्याची तरतूद करून आर्थिक बजेट याच रोजगारातून बसवावा लागतो. मात्र शेती निसर्गावर अवलंबून असल्याने या व्यवसायात फायद्या निश्चित राहत नाही. कधी अतिवृष्टी, अवर्षण, गारपिट, रोगराई आदीच्या दृष्टचक्राने उत्पादनात आलेली घट आणि सोबतच व्यापार्‍याच्या धोरणाने हंगामाच्या काळात शेतमालाचे घटविलेले बाजारमूल्य या अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेती व्यवसाय हा विनभरवशाचा झाला आहे. परिणामी शेतकर्‍याचे आर्थिक बजेट कोलमडून त्यांचे कंबरडे मोडले आहे. परंतु हा व्यवसाय पारंपरिक असून दुसरा पर्याय नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या हंगामाकरिता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून शेतात राबावे लागते. यासाठी येथील शेतीचा हंगाम संपल्यानंतर कुटुंबाच्या भविष्यातील तरतुदीसाठी या परिसरातील शेतमजुर, शेतकरी, बेरोजगार कामाच्या शोधात स्थानांतरीत होत असतो. सध्या तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाला असून ह्यापासून कुटुंबाचे कोसळलेले आर्थिक बजेट सावरण्यास खुपच महत्व होते. यासाठी या परिसरातील गाव खेड्यातल्या मजुराचे जत्थेच्या जत्थे परप्रांतात स्थानांतरित होत आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानक, बसस्थानकावर बेरोजगारांचे जत्थे गँग गंतव्याच्या प्रतीक्षेत दिसत असून तेथे यात्रेचे रूप आले आहे. त्यामुळे गावखेडे ओस पडत आहेत. (वार्ताहर)