शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजोलीतील बेरोजगाराचे स्थानांतरण

By admin | Updated: May 18, 2014 23:27 IST

शेतीचा हंगाम संपल्यानंतर हाताला काम नसल्यामुळे बेरोजगार युवकांचे जत्थेच्या जत्थे कामाच्या शोधात स्थानांतरित होत असून या परिसरातील गावखेडे ओस पडू लागल्याचे चित्र आहे.

 राजोली : शेतीचा हंगाम संपल्यानंतर हाताला काम नसल्यामुळे बेरोजगार युवकांचे जत्थेच्या जत्थे कामाच्या शोधात स्थानांतरित होत असून या परिसरातील गावखेडे ओस पडू लागल्याचे चित्र आहे. या परिसरातील मुख्य व्यवसाय शेती असून वर्षभराची उलाढाल शेतीच्या उत्पादनावरच केली जाते. वर्षभराच्या अन्नधान्याची बेगमी व मुलाबाळाच्या भविष्याची तरतूद करून आर्थिक बजेट याच रोजगारातून बसवावा लागतो. मात्र शेती निसर्गावर अवलंबून असल्याने या व्यवसायात फायद्या निश्चित राहत नाही. कधी अतिवृष्टी, अवर्षण, गारपिट, रोगराई आदीच्या दृष्टचक्राने उत्पादनात आलेली घट आणि सोबतच व्यापार्‍याच्या धोरणाने हंगामाच्या काळात शेतमालाचे घटविलेले बाजारमूल्य या अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेती व्यवसाय हा विनभरवशाचा झाला आहे. परिणामी शेतकर्‍याचे आर्थिक बजेट कोलमडून त्यांचे कंबरडे मोडले आहे. परंतु हा व्यवसाय पारंपरिक असून दुसरा पर्याय नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या हंगामाकरिता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून शेतात राबावे लागते. यासाठी येथील शेतीचा हंगाम संपल्यानंतर कुटुंबाच्या भविष्यातील तरतुदीसाठी या परिसरातील शेतमजुर, शेतकरी, बेरोजगार कामाच्या शोधात स्थानांतरीत होत असतो. सध्या तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाला असून ह्यापासून कुटुंबाचे कोसळलेले आर्थिक बजेट सावरण्यास खुपच महत्व होते. यासाठी या परिसरातील गाव खेड्यातल्या मजुराचे जत्थेच्या जत्थे परप्रांतात स्थानांतरित होत आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानक, बसस्थानकावर बेरोजगारांचे जत्थे गँग गंतव्याच्या प्रतीक्षेत दिसत असून तेथे यात्रेचे रूप आले आहे. त्यामुळे गावखेडे ओस पडत आहेत. (वार्ताहर)