शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पर्यटकांच्या एन्जॉयचा वन्यजीवांना धोका

By admin | Updated: January 6, 2015 22:56 IST

हौसमौजेसाठी जंगलात भ्रमंतीसाठी जाणाऱ्या आणि तिथे ‘एन्जॉय’ करणाऱ्या हौशी पर्यटकांच्या आनंदामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील तृणभक्षी वन्य जीवांचे आयुष्य मात्र धोक्यात आले आहे.

बफर क्षेत्रात विखुरले प्लास्टिकअजिंक्य वाघमारे - दुर्गापूरहौसमौजेसाठी जंगलात भ्रमंतीसाठी जाणाऱ्या आणि तिथे ‘एन्जॉय’ करणाऱ्या हौशी पर्यटकांच्या आनंदामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील तृणभक्षी वन्य जीवांचे आयुष्य मात्र धोक्यात आले आहे. या परिसरात विखुलेले प्लास्टिक, स्टेपलर पिना लावलेले खाद्यपदार्थांचे कागदी खोके आणि पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स, काचेच्या बाटल्यांमुळे वन्यजीवांना धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.वने व वन्यजीव अमूल्य असा ठेवा असल्याने त्याचे जतन व संरक्षण करणे वनविभागाची जबाबदारी आहे. नागरिकांचीही यात तेवढीच जबाबदारी असली तरी, मात्र ताडोबा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मोहर्ली वनपरिरक्षेत्रातील बफर झोनमध्ये दिसणारे चित्र चिंताजनक आहे. सदर प्रतिनिधीने या परिसरात झेरझटका मारला असता हे चित्र दिसून आले.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पॉलिथीन पिशव्या आणण्यास मनाई असली तरी पर्यटक अश्या पिशव्यामध्ये सर्रास अन्न पदार्थ घेऊन येतात. ते खाल्यानंतर जंगलातच भिरकवले जाते. पर्यटकांना नियमांचा विसर पडला आहे. वनाधिकारीही कारणीभूत दिसत आहेत. पद्मापूर वन उपज तपासणी नाक्यावर पर्यटकांची वाहने नोंदणीसाठी थांबतात. या प्रवेशद्वारावर जंगलात सक्तीने पाळावयाच्या नियमाची नियमावली दर्शविणारे फलक कुठेच दिसत नाही. भ्रमंतीसाठी येणारे पर्यटकही सोयरसूतक नसल्यासारखे वागत असल्याने माहितीदर्शक फलक उभारणे गरजेचे आहे. याशिवाय तसे तोंडी निर्देश देण्याचीही सोय असणे आवश्यक आहे. मात्र गेटवरील कर्मचारी याची दक्षता घेताना दिसत नाहीत. परिणामत: अलिकडे जंगलात ठिकठिकाणी शेकडो पॉलिथीनच्या पिशव्या, दारुच्या बाटला, खर्ऱ्याच्या पॉलिथीन्स विखुरल्या आहेत. पर्यटकांनी फेकून दिलेल्या पॉलिथीनमध्ये अथवा अन्नाच्या रिकाम्या खोक्यांमध्ये बरेचदा अन्न शिल्लक राहते. तृणभक्षी प्राण्यांचा वावर बफर झोनमध्येही मोठ्या प्रमाणावर असल्याने यातील अन्न अथवा खाद्यपदार्थ या प्राण्यांकडून खाल्ले जाण्याची शक्यता असते. यात त्यांच्या पोटात प्लास्टिकही जाण्याची भीती असते. अन्नाच्या रिकाम्या खोक्यांसोबत वन्यप्राण्यांच्या पोटात खोक्याला लावलेल्या स्टेपलर पिना, टाचण्या जाण्याची शक्यता अधिक आहे. याचा परिणाम त्यांच्या पचन संस्थेवर होऊ शकतो. हे प्राणी अन्य मांसाहारी प्राण्यांकडून शिकार झाल्यास त्यांच्याही पोटात टाचण्या, पिना जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका वेळीच लक्षात घेण्याची गरज आहे.वन्यजीव आपआपल्या भक्ष्याच्या शोधात सर्व जंगल पिंज़ून काढतात. मांसभक्षी प्राणी तृणभक्षींचा पाठलाग करून शिकार करतात. या पळापळीत दोन्ही वन्यजीवांना काचा रुतून दुखापत होऊन ते दगावण्याचीच शक्यता असते. या वनातील वैभवांची सर्वोतोपणी काळजी घेणे व त्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र वनविभाग आणि पर्यटकांकडूनही चुका घडत असल्याचे उघडकीस आले.