शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

सभापती व उपसभापती पदाची आज निवडणूक

By admin | Updated: September 13, 2014 23:47 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशातच जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपत असल्याने निवडणूक होऊ घातली आहे.

बल्लारपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशातच जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपत असल्याने निवडणूक होऊ घातली आहे. त्यानुसार पंचायत समिती स्तरावर रविवारी १४ सप्टेंबरला सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी सभा आयोजित केली आहे. आपल्याच पक्षाला सभापती व उपसभापतीपद मिळावे म्हणून राजकीय पक्षांकडून सदस्यांची पळवापळवी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार सभापती व उपसभापती पदासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देण्यात आली आहे. तद्नंतर दुपारी ३ वाजता विशेष सभेला सुरुवात होणार असून आवश्यक असल्यास मतदान प्रक्रियेने सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.जिल्ह्यात एकूण १५ पंचायत समिती असून यातील तब्बल आठ पंचायत समित्यांवर महिलांना सभापती पदाची संधी उपलब्ध होत असल्याने महिलाराज येणार आहे. बल्लारपूर, राजुरा, गोंडपिंपरी, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड, वरोरा व चिमूर पंचायत समितीचे सभापती पद महिला वर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.यामध्ये अनुसूचित जातीसाठी चिमूर, अनुसूचित जमातीसाठी गोंडपिंपरी व राजुरा, नागरिकांचा मागासप्रवर्ग वरोरा व बल्लारपूर, सर्वसाधारण महिला गटासाठी भद्रावती, सिंदेवाही व नागभीड पंचायत समिती असे महिलांना आरक्षण आहे.ब्रह्मपुरी अनुसूचित जाती, मूल अनुसूचित जमाती, जिवती व पोंभूर्णा नागरिकांचा मागासप्रवर्ग तर सावली कोरपना व चंद्रपूर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. चंद्रपूर पंचायत समितीमध्ये १२, भद्रावती ८, चिमूर १२, वरोरा ८, ब्रह्मपुरी ८, नागभीड १०, सिंदेवाही ८, मूल ६, सावली ८, पोंभूर्णा ४, गोंडपिंपरी ६, राजुरा ८, जिवती ४ व बल्लारपूर पंंचायत समितीमध्ये ४ असे एकूण ११४ जिल्ह्यात पंचायत समितीचे सदस्य आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजपने ग्रामीण भागाच्या राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सदस्यांची पळवापळवी सुरू केली आहे. काहींना यात यश आले आहे. पंचायत समितीवर सत्ता प्राप्तीसाठी सदस्यांना प्रलोभन देण्याचा प्रकारही घडत आहे. यामुळे ग्रामीण भागाचे राजकारण ढवळून निघाले आहे. (शहर प्रतिनिधी)