शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

सभापती व उपसभापती पदाची आज निवडणूक

By admin | Updated: September 13, 2014 23:47 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशातच जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपत असल्याने निवडणूक होऊ घातली आहे.

बल्लारपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशातच जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपत असल्याने निवडणूक होऊ घातली आहे. त्यानुसार पंचायत समिती स्तरावर रविवारी १४ सप्टेंबरला सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी सभा आयोजित केली आहे. आपल्याच पक्षाला सभापती व उपसभापतीपद मिळावे म्हणून राजकीय पक्षांकडून सदस्यांची पळवापळवी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार सभापती व उपसभापती पदासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देण्यात आली आहे. तद्नंतर दुपारी ३ वाजता विशेष सभेला सुरुवात होणार असून आवश्यक असल्यास मतदान प्रक्रियेने सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.जिल्ह्यात एकूण १५ पंचायत समिती असून यातील तब्बल आठ पंचायत समित्यांवर महिलांना सभापती पदाची संधी उपलब्ध होत असल्याने महिलाराज येणार आहे. बल्लारपूर, राजुरा, गोंडपिंपरी, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड, वरोरा व चिमूर पंचायत समितीचे सभापती पद महिला वर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.यामध्ये अनुसूचित जातीसाठी चिमूर, अनुसूचित जमातीसाठी गोंडपिंपरी व राजुरा, नागरिकांचा मागासप्रवर्ग वरोरा व बल्लारपूर, सर्वसाधारण महिला गटासाठी भद्रावती, सिंदेवाही व नागभीड पंचायत समिती असे महिलांना आरक्षण आहे.ब्रह्मपुरी अनुसूचित जाती, मूल अनुसूचित जमाती, जिवती व पोंभूर्णा नागरिकांचा मागासप्रवर्ग तर सावली कोरपना व चंद्रपूर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. चंद्रपूर पंचायत समितीमध्ये १२, भद्रावती ८, चिमूर १२, वरोरा ८, ब्रह्मपुरी ८, नागभीड १०, सिंदेवाही ८, मूल ६, सावली ८, पोंभूर्णा ४, गोंडपिंपरी ६, राजुरा ८, जिवती ४ व बल्लारपूर पंंचायत समितीमध्ये ४ असे एकूण ११४ जिल्ह्यात पंचायत समितीचे सदस्य आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजपने ग्रामीण भागाच्या राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सदस्यांची पळवापळवी सुरू केली आहे. काहींना यात यश आले आहे. पंचायत समितीवर सत्ता प्राप्तीसाठी सदस्यांना प्रलोभन देण्याचा प्रकारही घडत आहे. यामुळे ग्रामीण भागाचे राजकारण ढवळून निघाले आहे. (शहर प्रतिनिधी)