शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

टाळेबंदीचा काळ ठरला गरिबांसाठी नरक यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:01 IST

कोरोनाच्या महामारी संकटाने संपूर्ण विश्वाला हैराण करून सोडत जवळपास सर्व देशांवर टाळेबंदीची पाळी आणली. अशातच भारतात घोषित केलेल्या टाळी बंदीचा सर्वाधिक फटका हा मजूरवर्गाला बसल्याचे दिसून येते. आपल्या राज्यात हाताला काम मिळत नसल्याने अनेक मजूर रोजगारासाठी विविध राज्यात जाऊन मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह करतात.

ठळक मुद्देनशिबी पायी प्रवास : उपाशी पोट आणि शेकडो किमीची पायपीट

वेदांत मेहरकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : कोरोना या माहामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे परराज्यात रोजगाराच्या शोधात गेलेले लाखो मजूर अडकून बसले आहेत. अशातच अडकलेल्या मजुरांना तेथील प्रशासन अन्नधान्य व इतर जीवनावश्यक साहित्य पुरवठा करीत नसल्याने तसेच हाती कामही नसल्याने उदभवलेल्या उपासमारीच्या संकटाला तोंड देत अखेर मजुरांनी पायदळ चालून शेकडो किलोमीटरच्या प्रवासातून स्वगृही परतण्याची वाट धरली आहे. सर्वत्र नाकाबंदी असल्याने वाहने त्यांना मिळत नाही. एकूणच टाळेबंदीचा हा काळ गरीब मजूरवर्गासाठी नरक यातनेचा काळ ठरत आहे.कोरोनाच्या महामारी संकटाने संपूर्ण विश्वाला हैराण करून सोडत जवळपास सर्व देशांवर टाळेबंदीची पाळी आणली. अशातच भारतात घोषित केलेल्या टाळी बंदीचा सर्वाधिक फटका हा मजूरवर्गाला बसल्याचे दिसून येते. आपल्या राज्यात हाताला काम मिळत नसल्याने अनेक मजूर रोजगारासाठी विविध राज्यात जाऊन मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह करतात. यंदाचे महाराष्ट्र राज्यातील बहुतांश मजूर हे मिरची तोडण्यासाठी लगतच्या तेलंगणा राज्यात गेले. मिरची तोडीचा हंगाम पूर्ण होण्याअगोदरच कोरोना संकटामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनमध्ये ते मजूर अडकलेत. अशा आपत्तीजनक परिस्थितीत हाताला काम नाही, जवळ दमडी नाही. तेथील प्रशासनाकडून मिळणारी तोकडी मदत यावर जीवन जगायचे कसे, असा दुहेरी पेचात टाकणारा सवाल अडकलेल्या मजुरांसमोर उभा ठाकला आहे. अशातच तब्बल महिनाभरा चा कालावधी लोटून गेल्यानंतरही ही टाळेबंदी वाढतच असल्याने हताश होऊन बसण्यापलिकडे पर्याय न उरलेल्या मजुरांनी अखेर स्वगृही परतण्यासाठी पायदळी प्रवासाची सुरुवात केली. पोटात अन्न नाही, जवळ पैसे नाही, अशाही बिकट परिस्थितीमध्ये मजुरांनी स्वगृही परतण्याचा चालविलेला लढा आजही कायम ठेवल्याचे मजुरांच्या मार्गक्रमणातून दिसून येते. मजुरांच्या या धाडसी पायदळी प्रवासादरम्यान माणुसकीच्या नात्याने अनेक मदतीरुपी हात सरसावत पुढे आल्याने माणुसकीचे दर्शन घडत आहे.डोक्यावर ओझे, कडेवर मुलेडोक्यावर ओझाचे गाठोडे, कडेवर लहान मुले, हातात स्वयंपाकाचे साहित्य तर दुसरीकडे आग ओकणारा सूर्य अशाही कठीण परिस्थितीत जीवाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचे अंतर गाठण्याचे ध्येय जराही डगमगलेले दिसत नाही. एकीकडे शासन धनाढय लोकांच्या मुलांकरिता शासन स्तरावरून तातडीने निर्णय घेत चक्क शेकडो किमी अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष गाड्या सोडून मदतीचा हात देत आहे. तर दुसरीकडे मात्र लाखोंच्या संख्येने परराज्यात अडकलेल्या मजुरांप्रती उदासीनता दिसत आहे.राज्यात काम नसल्यानेच परराज्यात स्थलांतरस्वराज्यात काम मिळत नसल्याने परराज्यात लाखोंच्या संख्येने मजुरांचे जाणे हे राज्यासाठी नामुष्कीचे कारण असून कमीतकमी अशा आपत्ती काळात तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना योग्य न्याय मिळेल काय, असा प्रश्न पायदळ प्रवासातून स्वगृही परतण्याच्या वाटेवर असलेल्या मजुरांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस