शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीचा काळ ठरला गरिबांसाठी नरक यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:01 IST

कोरोनाच्या महामारी संकटाने संपूर्ण विश्वाला हैराण करून सोडत जवळपास सर्व देशांवर टाळेबंदीची पाळी आणली. अशातच भारतात घोषित केलेल्या टाळी बंदीचा सर्वाधिक फटका हा मजूरवर्गाला बसल्याचे दिसून येते. आपल्या राज्यात हाताला काम मिळत नसल्याने अनेक मजूर रोजगारासाठी विविध राज्यात जाऊन मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह करतात.

ठळक मुद्देनशिबी पायी प्रवास : उपाशी पोट आणि शेकडो किमीची पायपीट

वेदांत मेहरकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : कोरोना या माहामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे परराज्यात रोजगाराच्या शोधात गेलेले लाखो मजूर अडकून बसले आहेत. अशातच अडकलेल्या मजुरांना तेथील प्रशासन अन्नधान्य व इतर जीवनावश्यक साहित्य पुरवठा करीत नसल्याने तसेच हाती कामही नसल्याने उदभवलेल्या उपासमारीच्या संकटाला तोंड देत अखेर मजुरांनी पायदळ चालून शेकडो किलोमीटरच्या प्रवासातून स्वगृही परतण्याची वाट धरली आहे. सर्वत्र नाकाबंदी असल्याने वाहने त्यांना मिळत नाही. एकूणच टाळेबंदीचा हा काळ गरीब मजूरवर्गासाठी नरक यातनेचा काळ ठरत आहे.कोरोनाच्या महामारी संकटाने संपूर्ण विश्वाला हैराण करून सोडत जवळपास सर्व देशांवर टाळेबंदीची पाळी आणली. अशातच भारतात घोषित केलेल्या टाळी बंदीचा सर्वाधिक फटका हा मजूरवर्गाला बसल्याचे दिसून येते. आपल्या राज्यात हाताला काम मिळत नसल्याने अनेक मजूर रोजगारासाठी विविध राज्यात जाऊन मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह करतात. यंदाचे महाराष्ट्र राज्यातील बहुतांश मजूर हे मिरची तोडण्यासाठी लगतच्या तेलंगणा राज्यात गेले. मिरची तोडीचा हंगाम पूर्ण होण्याअगोदरच कोरोना संकटामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनमध्ये ते मजूर अडकलेत. अशा आपत्तीजनक परिस्थितीत हाताला काम नाही, जवळ दमडी नाही. तेथील प्रशासनाकडून मिळणारी तोकडी मदत यावर जीवन जगायचे कसे, असा दुहेरी पेचात टाकणारा सवाल अडकलेल्या मजुरांसमोर उभा ठाकला आहे. अशातच तब्बल महिनाभरा चा कालावधी लोटून गेल्यानंतरही ही टाळेबंदी वाढतच असल्याने हताश होऊन बसण्यापलिकडे पर्याय न उरलेल्या मजुरांनी अखेर स्वगृही परतण्यासाठी पायदळी प्रवासाची सुरुवात केली. पोटात अन्न नाही, जवळ पैसे नाही, अशाही बिकट परिस्थितीमध्ये मजुरांनी स्वगृही परतण्याचा चालविलेला लढा आजही कायम ठेवल्याचे मजुरांच्या मार्गक्रमणातून दिसून येते. मजुरांच्या या धाडसी पायदळी प्रवासादरम्यान माणुसकीच्या नात्याने अनेक मदतीरुपी हात सरसावत पुढे आल्याने माणुसकीचे दर्शन घडत आहे.डोक्यावर ओझे, कडेवर मुलेडोक्यावर ओझाचे गाठोडे, कडेवर लहान मुले, हातात स्वयंपाकाचे साहित्य तर दुसरीकडे आग ओकणारा सूर्य अशाही कठीण परिस्थितीत जीवाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचे अंतर गाठण्याचे ध्येय जराही डगमगलेले दिसत नाही. एकीकडे शासन धनाढय लोकांच्या मुलांकरिता शासन स्तरावरून तातडीने निर्णय घेत चक्क शेकडो किमी अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष गाड्या सोडून मदतीचा हात देत आहे. तर दुसरीकडे मात्र लाखोंच्या संख्येने परराज्यात अडकलेल्या मजुरांप्रती उदासीनता दिसत आहे.राज्यात काम नसल्यानेच परराज्यात स्थलांतरस्वराज्यात काम मिळत नसल्याने परराज्यात लाखोंच्या संख्येने मजुरांचे जाणे हे राज्यासाठी नामुष्कीचे कारण असून कमीतकमी अशा आपत्ती काळात तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना योग्य न्याय मिळेल काय, असा प्रश्न पायदळ प्रवासातून स्वगृही परतण्याच्या वाटेवर असलेल्या मजुरांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस