प्रवाशांकडून आरक्षणाला तिलाजंली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 05:00 AM2021-03-28T05:00:00+5:302021-03-28T05:00:36+5:30

राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्यामध्ये सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र याबाबत पाहीजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. परंतु, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी काही प्रमाणात प्रवासी सीट आरक्षित करतात. परंतु, जवळच्या पल्ल्यामध्ये आरक्षित करीत नाही. बहुतांश चंद्रपूर येथून हैदराबाद, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे जाण्यासाठी आरक्षण करीत असल्याचे दिसून येते.

Tilajanli to reservation from passengers | प्रवाशांकडून आरक्षणाला तिलाजंली

प्रवाशांकडून आरक्षणाला तिलाजंली

Next
ठळक मुद्देलांबच्या पल्ल्यात सहज उपलब्ध होते जागा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खासगी बसच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेसुद्धा बसप्रवासासाठी आरक्षण सुरु केले. मात्र कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली असल्याने हमखास सीट मिळते. त्यामुळे प्रवाशांकडून बस आरक्षित करण्याला तिलाजंली देण्यात येत आहे.
राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्यामध्ये सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र याबाबत पाहीजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. परंतु, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी काही प्रमाणात प्रवासी सीट आरक्षित करतात. परंतु, जवळच्या पल्ल्यामध्ये आरक्षित करीत नाही. बहुतांश चंद्रपूर येथून हैदराबाद, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे जाण्यासाठी आरक्षण करीत असल्याचे दिसून येते. मात्र मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केल्याने बसफेऱ्या बंद होत्या. त्यानंतर ५० टक्के तत्वावर बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या. रेल्वे बंद असल्याने लांबच्या पल्ल्यासाठी काही प्रमाणात सीट आरक्षित करण्यात येत होत्या. परिस्थीतीप पूर्वपदावर येत असतानाच जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली. त्यामुळे आपोआपच प्रवाशांची संख्या घटली. त्यामुळे सीट आरक्षित करणाऱ्यांची संख्या घटली आहे. चंद्रपूर आगारातून हैदराबादसाठी काही प्रमाणात आरक्षण करण्यात येत असल्याचे दिसून येते.

नो वेटिंग
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रवाशांची संख्या घटत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पूर्वी आरक्षण बुकिंग होत होती. आता जाणारे प्रवासीच घटल्याने हमखास सीट मिळते या भावनेने प्रवशांतर्फे आरक्षण करताना दिसून येत नाही. तसेच बसमध्ये ट्रेनसारखा वेटिंगचा प्रकार बघावयास मिळत नाही.
 

जिल्हाबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. परिस्थिती चांगली होईपर्यंत प्रवासी संख्या वाढण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या आहेत. 

बसेस रोज
जिल्हा मुख्यालयातून विविध मार्गावर ८५ बसेसच्या माध्यमातून सुमारे ५०० फेऱ्याचे शेड्यूल सध्या सुरु आहे. यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागाचाही समावेश आहे.
लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यासाठी प्रवासी संख्या घटल्याने गाड्याही काही प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात ग्रामीण भागात बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या अद्यापही सुरु करण्यात आल्या नाही.

 

Web Title: Tilajanli to reservation from passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन