शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वाघाच्या घटनांनी ग्रामीण जीवन प्रभावित

By admin | Updated: February 3, 2016 00:56 IST

नागभीड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात वाघांनी दोघांचे बळी घेतले आहेत. सोबतच जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

ग्रामस्थांना चिंता : येणारा मोहफूल व तेंदू हंगाम कसा जाणार ?घनश्याम नवघडे नागभीडनागभीड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात वाघांनी दोघांचे बळी घेतले आहेत. सोबतच जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. वाघांच्या या कारवायांनी या तालुक्यातील ग्रामीण जीवन चांगलेच प्रभावित झाले आहे. लवकरच येणारा मोह फूल आणि तेंदूचा हंगाम कसा करायचा, असा प्रश्न या ग्रामीण जीवनासमोर निर्माण झाला आहे.नागभीड तालुका हा जंगलव्याप्त तालुका आहे. तालुक्याच्या कोणत्याही भूभागावर कटाक्ष टाकला तर जंगलच जंगल दिसेल. या जंगलात वाघ आणि बिबट या हिंस्त्र पशुंचे वास्तव्य आहे, हे लपून राहिले नसले तरी परिस्थितीशी सामना करुन या जंगल व्याप्त गावातील लोक आपली दिनचर्चा निभावत आहेत. पण तेंदू आणि मोह हा हंगाम प्रत्यक्ष जंगलाशी निगडीत असल्याने आणि काही काही कुटुंबांची त्याच्यावरच उपजिविका असल्याने आणि त्यातच वाघांच्या कारवाया वाढल्याने या हंगामापासून वंचित तर राहणार नाही ना, अशी भीती या जंगलव्याप्त गावात निर्माण झाली आहे.या तालुक्यातील गोविंदपूर परिसर, मौशी ढोरपा परिसर, बोंड, बाळापूर परिसर, कोसंबी गवळी परिसर, डोंगरगाव परिसर या परिसरातील अनेक गावे जंगलाने वेढलेली आहेत. या भागाचा कानोसा घेतला तर वाघ किंवा बिबट यांचे दर्शन अनेकांना झाले आहे. या पशुंनी पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन त्यांना ठार केल्याच्यासुद्धा घटना घडल्या आहेत. या घटना ग्रामीण जीवनाने पाहिजे त्या प्रमाणावर मनावर घेतल्या नव्हत्या, पण दीड-दोन महिन्याअगोदर नवेगाव हुडेश्वरी आणि याच आठवड्यात नवखळा येथे घडलेल्या वाघाच्या हल्याच्या दोन घटनांनी मात्र ग्रामीण जीवन हादरुन गेले आहे.खरे तर या दोन्ही घटनांचा विचार केला तर वाघाने गावात येऊन हल्ला केला नाही. पण या घटनांचे समर्थन कोणीही करणार नाही. घटना निश्चितच दुदैवी आहेत. कारण सदर घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेले कोणाचे कोणीतरी होते. नवेगाव हुडेश्वरी जंगलात मृत्यूमुखी पडलेली ती बाई कोणाची तरी आई होती तर नवखळा येथील घटनेत मृत्यूमुखी पडलेला तो माणूस कोणाचा तरी बाप होता. या घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना वनविभाग आर्थिक भरपाई देईलही. पण त्यांच्या कुटुंबियांनी गमावलेले नाते परत येणार नाहीत.घटना घडल्या म्हणून लोक जंगलात जाणे सोडणार नाहीत पण घटना घडू नये याची खबरदारी वनविभागाने घेणे जरुजीचे आहे. यासाठी वनविभागाने लोकजागरण केले पाहिजे. अन्यथा अनुचित घटना घडण्याची शक्यता आहेच.