शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या घटनांनी ग्रामीण जीवन प्रभावित

By admin | Updated: February 3, 2016 00:56 IST

नागभीड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात वाघांनी दोघांचे बळी घेतले आहेत. सोबतच जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

ग्रामस्थांना चिंता : येणारा मोहफूल व तेंदू हंगाम कसा जाणार ?घनश्याम नवघडे नागभीडनागभीड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात वाघांनी दोघांचे बळी घेतले आहेत. सोबतच जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. वाघांच्या या कारवायांनी या तालुक्यातील ग्रामीण जीवन चांगलेच प्रभावित झाले आहे. लवकरच येणारा मोह फूल आणि तेंदूचा हंगाम कसा करायचा, असा प्रश्न या ग्रामीण जीवनासमोर निर्माण झाला आहे.नागभीड तालुका हा जंगलव्याप्त तालुका आहे. तालुक्याच्या कोणत्याही भूभागावर कटाक्ष टाकला तर जंगलच जंगल दिसेल. या जंगलात वाघ आणि बिबट या हिंस्त्र पशुंचे वास्तव्य आहे, हे लपून राहिले नसले तरी परिस्थितीशी सामना करुन या जंगल व्याप्त गावातील लोक आपली दिनचर्चा निभावत आहेत. पण तेंदू आणि मोह हा हंगाम प्रत्यक्ष जंगलाशी निगडीत असल्याने आणि काही काही कुटुंबांची त्याच्यावरच उपजिविका असल्याने आणि त्यातच वाघांच्या कारवाया वाढल्याने या हंगामापासून वंचित तर राहणार नाही ना, अशी भीती या जंगलव्याप्त गावात निर्माण झाली आहे.या तालुक्यातील गोविंदपूर परिसर, मौशी ढोरपा परिसर, बोंड, बाळापूर परिसर, कोसंबी गवळी परिसर, डोंगरगाव परिसर या परिसरातील अनेक गावे जंगलाने वेढलेली आहेत. या भागाचा कानोसा घेतला तर वाघ किंवा बिबट यांचे दर्शन अनेकांना झाले आहे. या पशुंनी पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन त्यांना ठार केल्याच्यासुद्धा घटना घडल्या आहेत. या घटना ग्रामीण जीवनाने पाहिजे त्या प्रमाणावर मनावर घेतल्या नव्हत्या, पण दीड-दोन महिन्याअगोदर नवेगाव हुडेश्वरी आणि याच आठवड्यात नवखळा येथे घडलेल्या वाघाच्या हल्याच्या दोन घटनांनी मात्र ग्रामीण जीवन हादरुन गेले आहे.खरे तर या दोन्ही घटनांचा विचार केला तर वाघाने गावात येऊन हल्ला केला नाही. पण या घटनांचे समर्थन कोणीही करणार नाही. घटना निश्चितच दुदैवी आहेत. कारण सदर घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेले कोणाचे कोणीतरी होते. नवेगाव हुडेश्वरी जंगलात मृत्यूमुखी पडलेली ती बाई कोणाची तरी आई होती तर नवखळा येथील घटनेत मृत्यूमुखी पडलेला तो माणूस कोणाचा तरी बाप होता. या घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना वनविभाग आर्थिक भरपाई देईलही. पण त्यांच्या कुटुंबियांनी गमावलेले नाते परत येणार नाहीत.घटना घडल्या म्हणून लोक जंगलात जाणे सोडणार नाहीत पण घटना घडू नये याची खबरदारी वनविभागाने घेणे जरुजीचे आहे. यासाठी वनविभागाने लोकजागरण केले पाहिजे. अन्यथा अनुचित घटना घडण्याची शक्यता आहेच.