शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसांपासून जखमी असलेल्या ढाण्या वाघाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:19 IST

दोन वाघाच्या झुंजीत जखमी झालेल्या ढाण्या वाघाचा अखेरीस मृत्यू झाला. मागील पाच दिवसांपासून त्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता.

ठळक मुद्देउपचारापूर्वीच गेला बळीपरवानगीच्या प्रतीक्षेत आला मृत्यू

राजकुमार चुनारकरचंद्रपूर : दोन वाघाच्या झुंजीत जखमी झालेल्या ढाण्या वाघाचा अखेरीस मृत्यू झाला. मागील पाच दिवसांपासून त्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता. चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली जंगलातील कक्ष क्रमांक ५ मध्ये एका तलावाच्या शेजारी त्याने नाईलाजाने ठाण मांडले होते. हा प्रकार वनविभाग डोळे उघडून बघतही होता. मात्र वाघावर तत्काळ उपचार करण्याची तसदी या विभागाने घेतली नाही. त्यामुळे उपचारापूर्वीच त्या वाघाला अन्न, पाण्याविना प्राण सोडावा लागला. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ आणि संतापही व्यक्त केला जात आहे.दोन वाघांच्या झुंजीत जखमी झालेला पट्टेदार वाघ पाच दिवसांपूर्वी चिमूर वनपरिक्षेत्रातील भात्सुली जंगलातील कक्ष क्रमांक ५ मध्ये आला. गाव तलावाजवळ त्याने आश्रय घेतला. हा जखमी वाघ बुधवारी गावकरी व वनरक्षक एस. एन. पाटील यांना दिसला. त्यांनी याची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली. वनविभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. हा वाघ जखमी असल्याने शिकार करू शकत नव्हता. अशक्तपणामुळे पाणी प्यायला तलावातही जाऊ शकत नव्हता. त्याला बेशुध्द करून उपचार करण्यासाठी पीसीसीएफची परवानगी आवश्यक असते. येथील वनाधिकाऱ्यांनी वाघावर उपचार करण्यासाठी पीसीसीएफ नागपूर यांना परवानगी मागितली. मात्र मागील पाच दिवसात पीसीसीएफकडून अशी कुठलीही परवानगी आली नाही.दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर पाच दिवसानंतर रविवारी वाघाला बेशुध्द करण्यासाठी नऊ जणांचे पथक भान्सुली जंगलात दाखल झाले. हे पथक जखमी वाघाला सुन्न करून तेथेच प्राथमिक उपचार करणार होते. मात्र ट्रॅक्यूलायझेशनची परवानगी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पथक वाघाजवळ गेले. मात्र वाघाचा मृत्यू झाला होता. खडसंगी येथील विश्रामगृह परिसरात उपवनसंरक्षक गजेद्र हिरे, सहायक उपवनसंरक्षक आर. एम. वाकडे, दक्षता उपवनसंरक्षक ब्राम्हणे, आर.एफ.ओ. भाविक चिवंडे, डॉ. हिमांशु जोशी, डॉ. रवी खोब्रागडे, उदय पटेल, मानद सचिव बंडु धोत्रे, वन्यजीव प्रतिनिधी अमोद गौरकर यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वाघावर अग्निसंस्कारही करण्यात आले.मृत्यूला जबाबदार कोण ?पाच दिवसांपासून जखमी वाघ भान्सुली जंगलात वेदनेने विव्हळत होता. वनाधिकाऱ्यांनी त्या वाघाचे छायाचित्रही काढले. त्यात त्याच्या पायावर व डोक्यावर जखमाही दिसून आल्या. वनजीव कायद्यानुसार एखादा वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळला तर त्याच्यावर ४८ तासात उपचार होणे आवश्यक आहे. मात्र येथे संपूर्ण वनविभाग जखमी वाघाच्या वेदना न्याहाळत बसला. वाघावर तत्काळ उपचार झाला असता तर तो निश्चित वाचला असता, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. मात्र असे झाले नाही. अखेर उपचाराविनाच वाघाचा मृत्यू झाला. या घटनेला वनविभाग आणि वनाधिकाºयांचा हलगर्जीपणाच जबाबदार असेल तर दोषींवर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे.परवानगी मागायला की द्यायला विलंब ?जखमी वाघावर उपचार करायचा असेल तर त्याला बेशुध्द करण्यासाठी नागपूर येथील पीसीसीएफकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र भान्सुली येथील प्रकरणात ही परवानगी प्राप्त व्हायला तब्बल पाच दिवस लागले. त्यामुळे जिल्ह्यातील वनाधिकाऱ्यांनी पीसीसीएफला परवानगी मागण्यासाठी विलंब केला की सर्व ठाऊक असतानाही पीसीसीएफने परवानगी द्यायला उशिर केला, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Tigerवाघ