शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

वाघ चवताळले; सात महिन्यांत घेतला २४ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:09 IST

Nagpur News चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी वनविभाग आघाडीवरपुन्हा मानव वन्यजीव संघर्षाची चिन्हे

 

राजेश भोजेकर

 लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे. या घटनांनी त्या त्या भागात वाघांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला वेग आला आहे. वाघांचे हल्ले असेच सुरू राहिले तर मानव-वन्यजीव संघर्ष उफाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असला तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कुठे ना कुठे वाघांचे दर्शन होते. जिल्ह्यातील बहुतांश गावांचा जंगलाशी अगदी जवळचा संबंध आहे. काही गावांतील नागरिकांची उपजीविकाच जंगलावर आहे. तेंदुपत्ता हंगाम आला तर जंगलात जाणे आलेच. अशातही अनेकदा वाघांचे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जंगलालगतच्या गावातील नागरिकांनी सरपणासाठी जंगलात जाण्याची गरज भासू नये म्हणून शासनाने मोफत गॅस सिलिंडर दिले़,मात्र गॅस सिलिंडरच्या किमती गरिबांच्या आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे खरेदी करू शकत नाही. शेवटी जंगलात जाणे आलेच. गावातील गुरे चारण्यासाठी काहीजण शिवारात जातात. अनेक गावांचा शिवारही जंगलाला लागून आहे. काही गावांना गुरे चारण्यासाठी जंगलाशिवाय पर्याय नाही. अशावेळी वाघांचे हल्ले होऊन गेल्या सात महिन्यांत तब्बल २४ जणांना वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सर्वाधिक दहा हल्ले ब्रह्मपुरी वनविभागात झालेले आहेत. या पाठोपाठ सात हल्ले चंद्रपूर वनविभागातील आहेत. चंद्रपूर बफरमध्ये तीन, चांदा वनविभागात दोन, चंद्रपूर चांदा व वेस्ट चांदा वनविभागात प्रत्येक एक हल्ला वाघाने केला आहे. वाघांच्या या हल्ल्यामुळे त्या परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम असतानाही शेतावर जाता येत नाही. चिमूर तालुक्यातील पळसगाव परिसरात आठवडाभर वाघीण दोन बछड्यांसह फिरत होती. आता ती परिसरातील पिपर्डा गावाकडे गेली आहे. दहशत मात्र संपलेली नाही. यावर उपाययोजना करण्यात वनविभाग कमी पडत असल्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष होत असल्याचा चंद्रपूर जिल्ह्याचा अनुभव नवीन नाही. यावर कायम तोडगा काढण्यात अद्यापही यश आल्याचे या घटनांवरून दिसत नाही.

 

टॅग्स :Tigerवाघ