शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

वाघ चवताळले; सात महिन्यांत घेतला २४ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:09 IST

Nagpur News चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी वनविभाग आघाडीवरपुन्हा मानव वन्यजीव संघर्षाची चिन्हे

 

राजेश भोजेकर

 लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे. या घटनांनी त्या त्या भागात वाघांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला वेग आला आहे. वाघांचे हल्ले असेच सुरू राहिले तर मानव-वन्यजीव संघर्ष उफाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असला तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कुठे ना कुठे वाघांचे दर्शन होते. जिल्ह्यातील बहुतांश गावांचा जंगलाशी अगदी जवळचा संबंध आहे. काही गावांतील नागरिकांची उपजीविकाच जंगलावर आहे. तेंदुपत्ता हंगाम आला तर जंगलात जाणे आलेच. अशातही अनेकदा वाघांचे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जंगलालगतच्या गावातील नागरिकांनी सरपणासाठी जंगलात जाण्याची गरज भासू नये म्हणून शासनाने मोफत गॅस सिलिंडर दिले़,मात्र गॅस सिलिंडरच्या किमती गरिबांच्या आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे खरेदी करू शकत नाही. शेवटी जंगलात जाणे आलेच. गावातील गुरे चारण्यासाठी काहीजण शिवारात जातात. अनेक गावांचा शिवारही जंगलाला लागून आहे. काही गावांना गुरे चारण्यासाठी जंगलाशिवाय पर्याय नाही. अशावेळी वाघांचे हल्ले होऊन गेल्या सात महिन्यांत तब्बल २४ जणांना वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सर्वाधिक दहा हल्ले ब्रह्मपुरी वनविभागात झालेले आहेत. या पाठोपाठ सात हल्ले चंद्रपूर वनविभागातील आहेत. चंद्रपूर बफरमध्ये तीन, चांदा वनविभागात दोन, चंद्रपूर चांदा व वेस्ट चांदा वनविभागात प्रत्येक एक हल्ला वाघाने केला आहे. वाघांच्या या हल्ल्यामुळे त्या परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम असतानाही शेतावर जाता येत नाही. चिमूर तालुक्यातील पळसगाव परिसरात आठवडाभर वाघीण दोन बछड्यांसह फिरत होती. आता ती परिसरातील पिपर्डा गावाकडे गेली आहे. दहशत मात्र संपलेली नाही. यावर उपाययोजना करण्यात वनविभाग कमी पडत असल्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष होत असल्याचा चंद्रपूर जिल्ह्याचा अनुभव नवीन नाही. यावर कायम तोडगा काढण्यात अद्यापही यश आल्याचे या घटनांवरून दिसत नाही.

 

टॅग्स :Tigerवाघ