शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

वाघ चवताळले; सात महिन्यांत घेतला २४ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:09 IST

Nagpur News चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी वनविभाग आघाडीवरपुन्हा मानव वन्यजीव संघर्षाची चिन्हे

 

राजेश भोजेकर

 लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे. या घटनांनी त्या त्या भागात वाघांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला वेग आला आहे. वाघांचे हल्ले असेच सुरू राहिले तर मानव-वन्यजीव संघर्ष उफाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असला तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कुठे ना कुठे वाघांचे दर्शन होते. जिल्ह्यातील बहुतांश गावांचा जंगलाशी अगदी जवळचा संबंध आहे. काही गावांतील नागरिकांची उपजीविकाच जंगलावर आहे. तेंदुपत्ता हंगाम आला तर जंगलात जाणे आलेच. अशातही अनेकदा वाघांचे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जंगलालगतच्या गावातील नागरिकांनी सरपणासाठी जंगलात जाण्याची गरज भासू नये म्हणून शासनाने मोफत गॅस सिलिंडर दिले़,मात्र गॅस सिलिंडरच्या किमती गरिबांच्या आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे खरेदी करू शकत नाही. शेवटी जंगलात जाणे आलेच. गावातील गुरे चारण्यासाठी काहीजण शिवारात जातात. अनेक गावांचा शिवारही जंगलाला लागून आहे. काही गावांना गुरे चारण्यासाठी जंगलाशिवाय पर्याय नाही. अशावेळी वाघांचे हल्ले होऊन गेल्या सात महिन्यांत तब्बल २४ जणांना वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सर्वाधिक दहा हल्ले ब्रह्मपुरी वनविभागात झालेले आहेत. या पाठोपाठ सात हल्ले चंद्रपूर वनविभागातील आहेत. चंद्रपूर बफरमध्ये तीन, चांदा वनविभागात दोन, चंद्रपूर चांदा व वेस्ट चांदा वनविभागात प्रत्येक एक हल्ला वाघाने केला आहे. वाघांच्या या हल्ल्यामुळे त्या परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम असतानाही शेतावर जाता येत नाही. चिमूर तालुक्यातील पळसगाव परिसरात आठवडाभर वाघीण दोन बछड्यांसह फिरत होती. आता ती परिसरातील पिपर्डा गावाकडे गेली आहे. दहशत मात्र संपलेली नाही. यावर उपाययोजना करण्यात वनविभाग कमी पडत असल्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष होत असल्याचा चंद्रपूर जिल्ह्याचा अनुभव नवीन नाही. यावर कायम तोडगा काढण्यात अद्यापही यश आल्याचे या घटनांवरून दिसत नाही.

 

टॅग्स :Tigerवाघ