शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी तीन अक्षरी नावांवर बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:42 IST

निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कोणाचा ना कोणाचा वरचष्मा असतो. परंतु भद्रावती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा तीन अक्षरी नावांचा नगराध्यक्षपदासाठी वरचष्मा असल्याचे पुढे येत आहे. नगराध्यक्षपदासाठी उभे असणाऱ्या आठ उमेदवारांपैकी प्रत्येक उमेदवाराचे नाव तीन अक्षरी आहे. यातील दोन उमेदवार अपक्ष आहेत.

ठळक मुद्देनगर परिषद निवडणूक : विजयासाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कोणाचा ना कोणाचा वरचष्मा असतो. परंतु भद्रावती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा तीन अक्षरी नावांचा नगराध्यक्षपदासाठी वरचष्मा असल्याचे पुढे येत आहे. नगराध्यक्षपदासाठी उभे असणाऱ्या आठ उमेदवारांपैकी प्रत्येक उमेदवाराचे नाव तीन अक्षरी आहे. यातील दोन उमेदवार अपक्ष आहेत.नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणाऱ्या तीन अक्षरी नावांमध्ये अनिल सुनील, विशाल, कुशल, लक्ष्मण, भूपेंद्र, संजय, प्रशांत या नावांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे अनिल धानोरकर, भाजपातर्फे सुनील नामोजवार, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लक्ष्मण बोढाले, बीआरएसपीकडून अ‍ॅड. भूपेंद्र रायपुरे, बहुजन समाज पार्टीतर्फे विशाल बोरकर, भारिप बहुजन महासंघाकडून कुशल मेश्राम आणि अपक्ष म्हणून प्रशांत कारेकर व संजय आसेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे यातील विविध राजकीय पक्षांचे उमेदवार हेच आपआपल्या पक्षातील दिग्गज नेते मानले जातात. अपक्ष उमेदवारांचेही सामाजिक कार्यात योगदान आहे. सर्वच उमेदवार विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. चिन्ह वाटप झाल्याने निवडणूक प्रचाराला सगळेच उमेदवार सज्ज झाले. रिक्षा, आॅटो व चारचाकी वाहनांवर लाऊडस्पीकर बांधून शहरातील प्रत्येक वॉर्ड पिंजून काढत आहेत. त्यामुळे अनेकांना हंगामी रोजगार मिळाला. शहरातील मंगल कार्यालय, डेकोरेशन व कॅटरर्स व्यवसायातील आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवारही यंदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.कार्यकर्त्यांसाठी जेवणावळींवर जोरआयुधनिर्माणी (भद्रावती) : पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर अनेकांना आता नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे डोहाळे लागले. यावेळी आपणच सत्ता काबीज केली पाहिजे, या भावनेतून काही कार्यकर्ते व मतदार जेवणावळींचे आयोजन करण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक स्वयंघोषित नगरसेवक उमेदवारीच्या कामी लागले होते. आपल्यालाच यावेळी उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी पक्षनेतृत्वाकडे अनेकांनी फिल्डिंगही लावली होती.