शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माणिकगड पहाडावर खाकी वर्दीचा धाक

By admin | Updated: August 26, 2015 00:50 IST

ग्रामीण भागात वास्तव्यास राहून हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना आनंदाने जगता यावे, पोलिसांविषयी नागरिकांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी, ...

पैसे द्या, तक्रार मिटवा : पोलिसांकडून नागरिकांना अपमानास्पद वागणूकशंकर चव्हाण जिवतीग्रामीण भागात वास्तव्यास राहून हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना आनंदाने जगता यावे, पोलिसांविषयी नागरिकांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलीस विभागाने गावखेड्यात जनजागृती करण्याची गरज आहे. मात्र असे असताना जिवती तालुक्यातील पोलीस मात्र आपली दबंगगिरी दाखवत पहाडावर सर्वसामान्य नागरिकांमध्ये खाकी वर्दीची दहशतच निर्माण करीत चित्र आहे.तालुक्यात ८४ खेडी गावे आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीची कामे संपली की, मोलमजुरी करुन आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करतात. हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल, गावात कुठलेही अनुसूचित प्रकार घडणार नाही. यासाठी शासनाने पोलीस खात्याची निर्मिती केली. मात्र पहाडावर उलट घडत आहे. एखाद्या कामासाठी ठाण्यात गेलेल्या नागरिकांना पोलिसांकडून असभ्य वर्तणुक दिली जाते. एखाद्या गावात क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्या तक्रारीला वेगळे वळण देऊन पैसे लुटण्याचा गंभीर प्रकार पोलिसांकडून घडत आहे. तंटामुक्त समितीलाही महत्त्व दिला जात नसल्याची ओरड नागरिकांकडून आहे. पोलिसांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले आहे. तालुक्यात अवैध धंद्याना पोलिसांकडूनच प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य नागरिकांची साधी तक्रार असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दोन गटात झालेला वाद जर तंटामुक्त समितीच्या मदतीने समजोता होत असेल तर गुन्हा नोंद करण्याची धमकी दाखवून पोलीस चिरीमिरी वसुल करण्याचा प्रयत्न करतात. असा गोरखधंदाच सर्रास सुरू असल्याने पोलिसांविषयी सामान्य जनतेमध्ये असलेली आपुलकीची भावना दुरावत चालली आहे.तंटामुक्त समित्या कशासाठी?गावातील तंटे गावातच निपटावे, गावात शांतता नांदावी, गाव स्वर्गापरी व्हावे आणि सुरक्षितेची भावना लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या तयार केल्या. मात्र तंटामुक्त समितीला पोलिसांकडून महत्त्व मिळत नसल्याने आणि पोलिसांच्या दंबगिरीला वैतागून समिती अध्यक्षाचा राजीनामा देण्याचे प्रयत्नही झाले आहेत. शासनाने तंटामुक्त समित्या स्थापन केल्या कशासाठी, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारु लागले आहेत.