शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

'ती' दहा गावे अजूनही सिंचनापासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 12:02 IST

Chandrapur : पकडीगुड्डूम प्रकल्पात भरपूर पाणी असूनही शेतकऱ्यांना लाभ नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्पांतर्गत नाबार्ड साहाय्यातून राज्यातील ६० प्रकल्पांमध्ये पकडीगड्डूम मध्यम सिंचन प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ८८ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, प्रकल्पातील १७ ते १८ गावांपैकी दहा गावे तीन दशकांपासून सिंचन सुविधांपासून वंचित आहेत.

पकडीगड्डूम जलाशय ते इंजापूरपर्यंत मुख्य कालवा आहे. डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपून वाया जात आहे. या प्रकल्पांतर्गत ३२०० हेक्टर सिंचन क्षमता प्रस्तावित असली तरी प्रत्यक्षात गेल्या ३० वर्षांत फक्त १००० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरच सिंचन करता आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचलेलेच नाही. 

गेल्या ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या कालव्यांमधील अनेक लघु कालवे आणि नाल्याजवळील शेतकऱ्यांनी शेतात लागवड केल्यामुळे ते नासधूस झाले आहेत. डोंगरी आणि चढ-उतार असलेल्या भागांमध्ये पाणी पोहोचविणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. अंबुजा सिमेंट प्रकल्पाला पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, कंपनीच्या खदानीमध्ये पर्यायी पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे कंपनीला पाणी न देता शेतकऱ्यांच्या बांधावर पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचविण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. 

मार्च २०२४ मध्ये सिंचन क्षमतेसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा सदुपयोग करून शेतकऱ्यांना बांधावर पाणी पोहोचवण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित करून प्रकल्प आराखडा तयार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी केली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पfarmingशेती