शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

'ती' दहा गावे अजूनही सिंचनापासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 12:02 IST

Chandrapur : पकडीगुड्डूम प्रकल्पात भरपूर पाणी असूनही शेतकऱ्यांना लाभ नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्पांतर्गत नाबार्ड साहाय्यातून राज्यातील ६० प्रकल्पांमध्ये पकडीगड्डूम मध्यम सिंचन प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ८८ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, प्रकल्पातील १७ ते १८ गावांपैकी दहा गावे तीन दशकांपासून सिंचन सुविधांपासून वंचित आहेत.

पकडीगड्डूम जलाशय ते इंजापूरपर्यंत मुख्य कालवा आहे. डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपून वाया जात आहे. या प्रकल्पांतर्गत ३२०० हेक्टर सिंचन क्षमता प्रस्तावित असली तरी प्रत्यक्षात गेल्या ३० वर्षांत फक्त १००० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरच सिंचन करता आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचलेलेच नाही. 

गेल्या ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या कालव्यांमधील अनेक लघु कालवे आणि नाल्याजवळील शेतकऱ्यांनी शेतात लागवड केल्यामुळे ते नासधूस झाले आहेत. डोंगरी आणि चढ-उतार असलेल्या भागांमध्ये पाणी पोहोचविणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. अंबुजा सिमेंट प्रकल्पाला पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, कंपनीच्या खदानीमध्ये पर्यायी पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे कंपनीला पाणी न देता शेतकऱ्यांच्या बांधावर पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचविण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. 

मार्च २०२४ मध्ये सिंचन क्षमतेसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा सदुपयोग करून शेतकऱ्यांना बांधावर पाणी पोहोचवण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित करून प्रकल्प आराखडा तयार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी केली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पfarmingशेती