शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

ही केवळ पाणपोई नव्हे.. ती आहे आंबीलपोई! चंद्रपूर जिल्ह्यातील अनोखा उपक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 19:21 IST

Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल येथे गेल्या सात वर्षांपासून आंबीलपोई सुरू करण्यात आली असून, याचा लाभ नागरिकांना मिळतो आहे.

राजू गेडाम

चंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला पोषक असणारी ज्वारीपासून बनविलेली आंबील ग्रामीण भागात प्रसिद्ध आहे. अंबील शरीराला पोषक असल्याने ग्रामीण भागात घरोघरी आंबील केली जाते. मात्र, ती शहरी भागात काही मोजक्या ठिकाणी बनविली जाते. मूल शहरातील नागरिकांनासुद्धा आंबीलचा स्वाद घेता यावा या उद्देशाने मूल येथील तांगडे कुटुंबीयांनी गेल्या सात वर्षांपासून आंबीलपोई सुरू करून नागरिकांची तृष्णा भागविण्याचे काम सुरू केले आहे. 

यावर्षीसुद्धा आंबीलपोई सुरू करून उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा देत आहेत.  उन्हाळा आला की थंड पाणी हवेहवेसे वाटते. काही वर्षांपूर्वी पाणपोई थाटून माठात थंड पाणी भरून दिले जायचे. मात्र, काळ बदलला तसा पाणपोईत बदल करीत माठाची जागा कॅनने घेतली. मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता पाणपोई आता सेल्फ सर्व्हिस झाल्या आहेत. मात्र, तांगडे कुटुंबीयांनी स्वतः पुढाकार घेत पाणीपोईत भर घालीत आंबीलपोई सुरू केली. दररोज ७०० ते ८०० व्यक्ती आंबीलचा लाभ घेत असून, सकाळी १०.३० वाजल्यापासून ही आंबीलपोई सुरू होते. कुटुंब प्रमुख रमेश तांगडे, पत्नी सुलोचना, मुले वैभव, रोहित  व कुटुंबातील सर्व सदस्य या आंबीलपोईकडे लक्ष घालून नागरिकांना सेवा देत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य