शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

तहानलेल्या चंद्रपूरकरांना योजनेचे ‘अमृत’

By admin | Updated: June 1, 2017 01:19 IST

मागील पाच ते सहा वर्षांपासून चंद्रपूरकर पाण्यासाठी बोंबा मारत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात आणि इतर

२३२ कोटींची योजना : प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मागील पाच ते सहा वर्षांपासून चंद्रपूरकर पाण्यासाठी बोंबा मारत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात आणि इतर ऋतूमध्येही नागरिकांना अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागते. यात मात करण्यासाठी आता मनपा अमृत योजना राबवित आहे. तहानलेल्या चंद्रपूकरांना केंद्र शासनाच्या या योजनेचे अमृत पाजण्यासाठी मनपाने कंबर कसली असून अतिशय जलदगतीने ही योजना पूर्णत्वास नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राट कंपनी मोकळी होते. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील एक-दोन वॉर्ड सोडले तर जवळजवळ सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. पाण्याची टॉकी ते फिल्टर प्लॅन्टमध्ये असणारी पाईप लाईन मोठी असते. त्यानंतर मुख्य पाईप लाईनद्वारे हे पाणी संबंधित प्रभागात पोहचते. त्यानंतर ३ ते ४ इंचांच्या पाईपमधून हे पाणी वितरित केले जाते. पूर्वी ५० कनेक्शनधारकांना ज्या पाईनलाईनवरून पाणी वितरित केले जाते, त्याच पाईनलाईनवर आता १०० ते २०० कनेक्शन आहेत. त्यामुळे पाहिजे तसा पाणी पुरवठा होत नाही. चंद्रपूरच्या पाणी पुरवठ्यावरून महापालिकेच्या अनेक आमसभा गाजल्या. यावर अनेकदा सखोल विचारमंथन करण्यात आले. मात्र नागरिकांचा तहानलेला घसा तृत्प करेल, असा तोडगा मनपाला मिळाला नाही. त्यामुळे आता वितरण व्यवस्थेतील समूळ यंत्रणाच हळूहळू बदलविण्याची तयारी मनपाने केली आहे. यासाठी केंद्र शासनाची अमृत योजना अतिशय जलदगतीने राबविण्यात येणार आहे. २३१.७७ कोटींची ही योजना असून यात केंद्र शासन ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के व मनपाकडून २५ टक्के असा खर्च करणार आहे. प्रारंभी जुन्या मशीनरीज बदलणार चंद्रपुरातील पाणी वितरण व्यवस्थेतील मोटारपंप व इतर मशनरीज जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या मशनरीज पाहिजे तशा काम करीत नसल्याचे संबंधित तंत्रज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कारणामुळेच चंद्रपूरचा पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. त्यामुळे अमृत योजनेतून सर्वप्रथम नव्या मशनरीज खरेदी करून त्याचा तत्काळ वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिकांना योजना पूर्ण होण्यापूर्वीच मुबलक पाणी मिळू शकेल. अमृत योजनेंतर्गत मशनरीज खरेदीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मशनरीज खरेदीचा प्रस्ताव आधीच शासनाकडे पाठविला आहे. आता आमसभेने अमृत योजनेच्या संपूर्ण प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रस्तावही केंद्राकडे पाठविला आहे. तेथून मंजुरी मिळताच अत्यंत जलदगतीने ही योजना पूर्णत्वास आणली जाईल. -विजय देवळीकर, उपायुक्त, मनपा चंद्रपूर. धरण व नदीतून घेणार पाणी अमृत योजनेसाठी प्रारंभी माना टेकडी परिसरातून पाणी घेण्याबाबत विचार करण्यात आला होता. मात्र यासाठी फार मोठी पाईपलाईन टाकावी लागणार आहे. त्यामुळे योजनेच्या पहिल्या टप्प्यात इरई धरण व दाताळा मार्गावरील इरई नदीच्या पात्रातून पाणी घेण्यात येणार आहे. समूळ यंत्रणाच बदलणार अमृत योजनेंतर्गत प्रारंभी मोटारपंप व इतर मशनरीज खरेदी केल्या जाणार आहे. त्यानंतर पाण्याचा टाक्या उभारण्यात येणार आहे. यासोबत शहरातील जुनी खिळखिळी झालेली संपूर्ण पाईपलाईनही नव्याने टाकण्यात येणार आहे.