शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

चिचोली गावात तापाचे थैमान

By admin | Updated: September 15, 2014 00:01 IST

तालुक्यातील चिचोली येथे डेंग्यूसदृश तापाची साथ पसरली आहे. ताप गावकऱ्यांत फणफणत असून येथील आरोग्य केंद्राचे कर्मचारी मात्र, कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे पंधरवड्यात गावातील पाच जणांचा

राजुरा : तालुक्यातील चिचोली येथे डेंग्यूसदृश तापाची साथ पसरली आहे. ताप गावकऱ्यांत फणफणत असून येथील आरोग्य केंद्राचे कर्मचारी मात्र, कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे पंधरवड्यात गावातील पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरु आहे.चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ गावांचा समावेश आहे. मात्र, या आरोग्य केंद्राचे कर्मचारी रुग्णांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. चिंचोली, सातरी, चुनाळा, सुबई आदी गावांत तापाची साथ पसरली आहे. प्रत्येक कुटुंबात तापाग्रस्त एक व्यक्ती आढळून येते. चिंचोली येथील कमलेश दुर्योधन, प्रभाकर हेळे, नेवारे, हबीब पठान, खोब्रागडे या रुग्णांचा तापाने पंधरवड्यात मृत्यू झाला. तर उज्वला सोमलकर, नानजी बोरकुटे या रुग्णांवर चंद्रपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सातरी या गावातीलही दोघांचा मृत्यू झाला. या गावातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाकडे मनुष्यबळ आहे. मात्र, अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. रात्रीच्या सुमारास प्रकृती बिघडल्यास त्यांना इतरत्र हलवावे लागत असते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे आपल्या सोयीनुसार येथे राहत असतात. त्यामुळे त्यांचे महिन्यातून पंधरा दिवस दर्शन होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. औषधी संयोजक व रक्त तपासणी कर्मचारी काही महिन्यांपासून कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे रुग्णालयात गेलेल्या रूग्णांना वेळेवर औषधे मिळत नाही. तर तपासणीही होत नाही. या प्राथमिक आरोग्य कें द्रात रुग्णांची दररोज गर्दी वाढत आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने आरोग्य सेवेपासून मुकावे लागत आहे. गावात तापाची साथ असताना कार्यरत कर्मचारी गोळ्या वाटप करू न तात्पुरता उपचार करीत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही रुग्णाची तपासणी करण्यात आलेली नाही. गावात आरोग्य विभागाची चमू पाठविण्यास सुध्दा दखल घेतली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी याची दखल घेऊन गावात आजारावर उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)