शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

चिचोली गावात तापाचे थैमान

By admin | Updated: September 15, 2014 00:01 IST

तालुक्यातील चिचोली येथे डेंग्यूसदृश तापाची साथ पसरली आहे. ताप गावकऱ्यांत फणफणत असून येथील आरोग्य केंद्राचे कर्मचारी मात्र, कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे पंधरवड्यात गावातील पाच जणांचा

राजुरा : तालुक्यातील चिचोली येथे डेंग्यूसदृश तापाची साथ पसरली आहे. ताप गावकऱ्यांत फणफणत असून येथील आरोग्य केंद्राचे कर्मचारी मात्र, कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे पंधरवड्यात गावातील पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरु आहे.चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ गावांचा समावेश आहे. मात्र, या आरोग्य केंद्राचे कर्मचारी रुग्णांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. चिंचोली, सातरी, चुनाळा, सुबई आदी गावांत तापाची साथ पसरली आहे. प्रत्येक कुटुंबात तापाग्रस्त एक व्यक्ती आढळून येते. चिंचोली येथील कमलेश दुर्योधन, प्रभाकर हेळे, नेवारे, हबीब पठान, खोब्रागडे या रुग्णांचा तापाने पंधरवड्यात मृत्यू झाला. तर उज्वला सोमलकर, नानजी बोरकुटे या रुग्णांवर चंद्रपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सातरी या गावातीलही दोघांचा मृत्यू झाला. या गावातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाकडे मनुष्यबळ आहे. मात्र, अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. रात्रीच्या सुमारास प्रकृती बिघडल्यास त्यांना इतरत्र हलवावे लागत असते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे आपल्या सोयीनुसार येथे राहत असतात. त्यामुळे त्यांचे महिन्यातून पंधरा दिवस दर्शन होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. औषधी संयोजक व रक्त तपासणी कर्मचारी काही महिन्यांपासून कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे रुग्णालयात गेलेल्या रूग्णांना वेळेवर औषधे मिळत नाही. तर तपासणीही होत नाही. या प्राथमिक आरोग्य कें द्रात रुग्णांची दररोज गर्दी वाढत आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने आरोग्य सेवेपासून मुकावे लागत आहे. गावात तापाची साथ असताना कार्यरत कर्मचारी गोळ्या वाटप करू न तात्पुरता उपचार करीत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही रुग्णाची तपासणी करण्यात आलेली नाही. गावात आरोग्य विभागाची चमू पाठविण्यास सुध्दा दखल घेतली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी याची दखल घेऊन गावात आजारावर उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)