शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पदोन्नतीवरून मुख्याध्यापक प्रशासनामध्ये वाद रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2022 23:21 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत आठ ते दहा वर्षांपूर्वी पटसंख्या आणि आरक्षणानुसार शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, दिवसेंदिवस शाळांतील पटसंख्या घटल्याने मुख्याध्यापक पद अतिरिक्त झाले होते. त्यामुळे पदोन्नतीने मुख्याध्यापक झालेल्या शिक्षकांना पदावनत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परिणामी, मुख्याध्यापकांना पदावनत व्हावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची  काही वर्षांपूर्वी आरक्षणानुसार शिक्षकांची पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही शाळांतील पटसंख्या कमी झाल्याने मुख्याध्यापक पदावरून काहींना पदावनत करण्यात आले. दरम्यान, आता पुन्हा प्रशासनाने शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहे. यामुळे मात्र  पदावनत झालेले शिक्षक आणि प्रशासनामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. प्रथम आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार मुख्याध्यापकपदी पदोन्नती द्या, त्यानंतरच अन्य शिक्षकांचा विचार करा, अशी मागणी पदावनत झालेल्या शिक्षकांनी केली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत आठ ते दहा वर्षांपूर्वी पटसंख्या आणि आरक्षणानुसार शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, दिवसेंदिवस शाळांतील पटसंख्या घटल्याने मुख्याध्यापक पद अतिरिक्त झाले होते. त्यामुळे पदोन्नतीने मुख्याध्यापक झालेल्या शिक्षकांना पदावनत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परिणामी, मुख्याध्यापकांना पदावनत व्हावे लागले. दरम्यान, सेवानिवृत्त तसेच काही शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याने प्रशासनाने आता शिक्षकांना पदोन्नतीद्वारे मुख्याध्यापक पद देण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे याद्याही तयार करण्यात आल्या आहेत. याचवेळी पदावनत झालेल्या शिक्षकांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला असून जिल्हा परिषद प्रशासनाला एक निवेदनही दिले आहे.  आठ ते दहा वर्षांपूर्वी मुख्याध्यापक म्हणून कार्य केल्यानंतर पदावनत झालेल्या मुख्याध्यापकांचाही प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे.  विशेष म्हणजे, त्यांना पदोन्नती करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, पदोन्नत्ती न झाल्यास न्यायालयातून न्याय मागण्याचीही काहींनी तयारी केली आहे. त्यामुळे   पदोन्नतीची प्रक्रिया रेंगाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आर्थिक भुर्दडपदावनत झालेले शिक्षक मुख्याध्यापकांचे वेतन घेत आहे. दरम्यान, शासनाने आता दुसऱ्याच शिक्षकांना पदोन्नतीने मुख्याध्यापक पद देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या शिक्षकांना मूळ वेतनासह मुख्याध्यापकांची वेतन श्रेणी द्यावी लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात शासनाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

काम शिक्षकांचे, वेतन मुख्यापकांचे  - आठ ते दहा वर्षांपूर्वी शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. दरम्यान मागच्या तीन वर्षांमध्ये २८८ शिक्षकांना पदावनत करण्यात आले. यातील काही शिक्षक सेवानिवृत्त झाले. - पद गेले असले तरी त्यांना वेतन मात्र मुख्याध्यापकांचे मिळत आहे. 

मुख्याध्यापकांची नव्याने पदस्थापना करताना मागील तीन वर्षांपूर्वी पदावनत केलेल्या मुख्याध्यापकांना प्रथम संधी देण्यात यावी. यासंदर्भात प्रशासनाला संघटनेच्या वतीने पत्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पदावनत करताना जेव्हा केव्हा पदोन्नती  होईल तेव्हा प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, यादी तयार करताना त्या आश्वासनाला विसर पडला आहे. पदोन्नती न झाल्यास यासंदर्भात वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू.-सुधाकर पोपटे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक, उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ

 

टॅग्स :Teacherशिक्षक