शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

किटाळी-खरकाडा परिसरात अस्वलाची दहशत कायम

By admin | Updated: May 18, 2017 01:28 IST

शनिवारी एका अस्वलाच्या हल्यात तीन तेंदूपत्ता मजूर ठार झाल्यानंतर किटाळी- खरकाडा परिसरात दहशतीचे जे ढग निर्माण झाले,

रोजगारावर कुऱ्हाड : तेंदूपत्ता संकलनाकडे मजुरांची पाठ घनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : शनिवारी एका अस्वलाच्या हल्यात तीन तेंदूपत्ता मजूर ठार झाल्यानंतर किटाळी- खरकाडा परिसरात दहशतीचे जे ढग निर्माण झाले, ते अद्यापही कायम आहेत. शनिवारनंतर दहशतीमुळे किटाळी व खरकाडा परिसरातील एकही मजूर तेंदूपत्ता संकलनाच्या कामावर गेला नसल्याची माहिती आहे. मोहफुले वेचणे, तेंदूपत्ता संकलन करणे व यातून आलेल्या रकमेवर आपली उपजिवीका करणे, हे जंगल परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे प्रमुख काम आहे. शनिवारी हेच काम करीत असताना किटाळी येथील रंजना अंबादास राऊत, बीसन सोमा कुळमेथे आणि खरकाडा येथील फारुक युसूफ शेख या मजुरांचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर तिघे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर त्या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ती दहशत आजही कायम आहे. किटाळी, खरकाडा, आलेवाही आणि गंगासागर हेटी हा परिसर घनदाट जंगलाने व्याप्त आहे. या जंगलात वाघ आणि बिबट्यांचाही अधिवास आहे. आतापर्यंत या पशुंबाबत हल्ला करुन ठार, जखमी केल्याच्या छोट्या घटना अनेक घडल्या. पण या घटना मनावर न घेता या परिसरात राहणाऱ्या लोकांनी आपली दिनचर्या कायम ठेवली होती. मात्र शनिवारी जी घटना घटली ती घटना या परिसरातील लोकांच्या मनावर आघात करुन गेली आहे. या आघातामधून तो परीसर अद्यापही सावरला नसल्याचे दिसून येत आहे आणि म्हणूनच वर्षातून एकदा येणाऱ्या तेंदूपत्ता सिझनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या किटाळी, खरकाडा, आलेवाही, गंगासागर हेटी या भागातील मजुरांनी शनिवारच्या घटनेनंतर केवळ दहशतीपोटी तेंदूपत्ता संकलनाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. मोहफूल आणि तेंदूपत्ता संकलन हे दोन्ही काम या भागातील लोकांना आर्थिक बळ देण्याचे काम करीत असतात. पण शनिवारच्या घटनेचा धसका नागरिकांनी घेतला आहे. या भीतीमुळे तेंदूपत्ता संकलनाचे काम करणाऱ्या मजुरांनी हे काम बंद केले आहे. त्यामुळे आलेवाही, खरकाडा, गंगासागर हेटी व किटाळी येथील पान फळ्या बंद आहेत. - हितेश मडावी, उपसरपंच आलेवाही