शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

किटाळी-खरकाडा परिसरात अस्वलाची दहशत कायम

By admin | Updated: May 18, 2017 01:28 IST

शनिवारी एका अस्वलाच्या हल्यात तीन तेंदूपत्ता मजूर ठार झाल्यानंतर किटाळी- खरकाडा परिसरात दहशतीचे जे ढग निर्माण झाले,

रोजगारावर कुऱ्हाड : तेंदूपत्ता संकलनाकडे मजुरांची पाठ घनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : शनिवारी एका अस्वलाच्या हल्यात तीन तेंदूपत्ता मजूर ठार झाल्यानंतर किटाळी- खरकाडा परिसरात दहशतीचे जे ढग निर्माण झाले, ते अद्यापही कायम आहेत. शनिवारनंतर दहशतीमुळे किटाळी व खरकाडा परिसरातील एकही मजूर तेंदूपत्ता संकलनाच्या कामावर गेला नसल्याची माहिती आहे. मोहफुले वेचणे, तेंदूपत्ता संकलन करणे व यातून आलेल्या रकमेवर आपली उपजिवीका करणे, हे जंगल परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे प्रमुख काम आहे. शनिवारी हेच काम करीत असताना किटाळी येथील रंजना अंबादास राऊत, बीसन सोमा कुळमेथे आणि खरकाडा येथील फारुक युसूफ शेख या मजुरांचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर तिघे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर त्या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ती दहशत आजही कायम आहे. किटाळी, खरकाडा, आलेवाही आणि गंगासागर हेटी हा परिसर घनदाट जंगलाने व्याप्त आहे. या जंगलात वाघ आणि बिबट्यांचाही अधिवास आहे. आतापर्यंत या पशुंबाबत हल्ला करुन ठार, जखमी केल्याच्या छोट्या घटना अनेक घडल्या. पण या घटना मनावर न घेता या परिसरात राहणाऱ्या लोकांनी आपली दिनचर्या कायम ठेवली होती. मात्र शनिवारी जी घटना घटली ती घटना या परिसरातील लोकांच्या मनावर आघात करुन गेली आहे. या आघातामधून तो परीसर अद्यापही सावरला नसल्याचे दिसून येत आहे आणि म्हणूनच वर्षातून एकदा येणाऱ्या तेंदूपत्ता सिझनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या किटाळी, खरकाडा, आलेवाही, गंगासागर हेटी या भागातील मजुरांनी शनिवारच्या घटनेनंतर केवळ दहशतीपोटी तेंदूपत्ता संकलनाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. मोहफूल आणि तेंदूपत्ता संकलन हे दोन्ही काम या भागातील लोकांना आर्थिक बळ देण्याचे काम करीत असतात. पण शनिवारच्या घटनेचा धसका नागरिकांनी घेतला आहे. या भीतीमुळे तेंदूपत्ता संकलनाचे काम करणाऱ्या मजुरांनी हे काम बंद केले आहे. त्यामुळे आलेवाही, खरकाडा, गंगासागर हेटी व किटाळी येथील पान फळ्या बंद आहेत. - हितेश मडावी, उपसरपंच आलेवाही