शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

दररोज 10 ते 15 जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रातून दररोज साधारणत: तीन हजार ७०० लोकांना जेवन दिले जाते. कोरोनाकाळात चंद्रपुरात अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईसुद्धा राहतात. त्यातील गोरगरिब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी १२ वाजेपर्यंतच असते. त्यातही थाळीची संख्या ही मोजकीच आहे.  त्यामुळे अनेकांना खाली हात परत जावे लागते.

ठळक मुद्देतीन हजार ७०० जण घेतात लाभ : २६ केंद्रावरुन सेवा सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कुणीही उपाशी राहू नये, यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली. या योजनेतंर्गत जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रसंचालकांना शासनाकडून प्रति थाळी अनुदान ठरवून देण्यात आले. विशिष्ट वेळेपर्यंतच हे केंद्र सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरुन दररोज १५ ते २० जणांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाकाळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यातील कामगार, मजूर, निराधारांना फायदा होत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रातून दररोज साधारणत: तीन हजार ७०० लोकांना जेवन दिले जाते. कोरोनाकाळात चंद्रपुरात अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईसुद्धा राहतात. त्यातील गोरगरिब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी १२ वाजेपर्यंतच असते. त्यातही थाळीची संख्या ही मोजकीच आहे.  त्यामुळे अनेकांना खाली हात परत जावे लागते. त्यामुळे थाळीची संख्या तसेच वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे.

रोज तीन हजार ७०० जणांचे पोट भरते, बाकीच्याचे काय?

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. त्या केंद्राचा लाभ साधारणत: तीन हजार ७०० जण घेत असतात. परंतु, अनेकजणांना थाळी भेटत नसल्याने गेल्यापावली परत यावे लागते. एका केंद्रावरुन किमान १० ते १५ जण परत जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्राची संख्या तसेच थाळी संख्या वाढवावी, त्यासोबतच जेवन वितरीत करण्याची वेळ वाढविण्याची गरज आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील नागरिक येत असतात. यातील बहुतेकजण शिवभोजन थाळी घेत असतात. त्यामुळे येथील केंद्रावरील थाळी लवकरच संपत असते. या केंद्रावर साधारणत: १५ ते २० जण परत जात असतात. 

बसस्थानक केंद्र शहरात कामानिमित्त अनेकजण येत असतात. बसस्थानकाशेजारी केंद्र असल्याने अनेकजण या केंद्रावर जात असतात. त्यामुळे या केंद्रावर नेहमीच रांग दिसून येते. परिणामी येथील थाळी लवकरच संपत असते. त्यामुळे साधारणत: दहा ते बाराजण परत गेले.

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय