शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जन्म-मृत्युचा रेकार्ड नसल्याने प्रमाणपत्रासाठी न्यायालयात धाव

By admin | Updated: June 12, 2015 01:53 IST

अनेक ग्रामपंचायतीचे जन्म, मृत्यूचे रेकॉर्ड जीर्ण झाले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना दाखला मिळविण्यात

चार ते पाच हजार रुपये खर्च : आर्थिक खर्चानंतरही प्रमाणपत्रासाठी चार महिन्यांची प्रतीक्षानागरी (रेल्वे) : अनेक ग्रामपंचायतीचे जन्म, मृत्यूचे रेकॉर्ड जीर्ण झाले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना दाखला मिळविण्यात अडचणी येत असून दाखल्यासाठी चक्क न्यायालयात धाव घेण्याची पाळी अनेकांवर येत आहे.शासनाच्या निकषानुसार रहिवाशी असल्याचा पुरावा सादर करण्याकरिता जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र तर बाहेर देशात जायचे असल्यास पासपोर्टसाठी जन्म प्रमाणपत्राची अट बंधनकारक आहे. तसेच वारसान चढविण्यासाठी मृत्यूचे प्रमाणपत्र असणे तेवढेच आवश्यक आहे. हे दाखले मिळवण्यासाठी नागरिक ग्रामपंचायतमध्ये जातात. पण ग्रामपंचायतीमध्ये रेकार्ड उपलब्ध नसल्यामुळे ग्रामविकास अधिकारी हे प्रमाणपत्र देऊ शकत नाही. त्यासाठी त्या कार्यालयातून अनुउपलब्ध प्रमाणपत्र घेऊन त्यासाठी वकील करणे. तो वकील बाजु मांडून न्यायालयाचा आदेश करतो. त्या आदेशाने स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र दिल्या जाते. यासाठी त्याला चार ते पाच हजार रुपये खर्च करूनही प्रमाणपत्रासाठी तब्बल चार महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. ही वस्तुस्थिती वरोरा तालुक्यातील ग्रामीण नागरिक अनुभवत आहेत.वरोरा पंचायत समिती अंतर्गत सन १९६८ पासून १९८६ पर्यंत रेकार्ड उपलब्ध नाही. त्यात १९८७, १९८९, १९९१ रेकार्ड उपलब्ध आहे. हे तीन वर्ष अपवाद वगळता १९६८ पासून १९९६ पर्यंत रेकार्ड उपलब्ध नाही. यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.नवीन रेकॉर्ड मध्ये सन २००० मध्ये झालेल्या मृत्यूचा रेकार्ड नाही, २००८ मध्ये जन्माचा रेकार्ड उपलब्ध नाही. यात काही वर्षाचा रेकार्ड उपलब्ध आहे तर काही वर्षाचा रेकार्ड नाही. याला दोषी कोण, या दोघाचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. वास्तविक स्थानिक गावात जन्म झाला किंवा मृत्यू पावला तर ग्रामपंचायत कार्यालयात त्याची नोंद केल्या जाते आणि तो रेकार्ड दर तीन वर्षानी पंचायत समिती कार्यालयात पाठविला जातो. यामुळे रेकार्ड उपलब्ध नाही म्हणून पंचायत समितीस्तरावर पत्र दिल्या जाते. मात्र प्रमाणपत्र मिळत नसल्याने दर तीन वर्षांनी ग्रामपंचायतीने दिलेला रेकार्ड गेला कुठे, याचे सोयरसुतक पंचायत समितीला नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात शेतकरी संख्या अधिक असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर असतो. त्यात कसाबसा तो आपल्या पाल्याला शहरात उच्च शिक्षणासाठी पाठवितो. ते शिक्षण देत असताना त्याला निकषाप्रमाणे प्रमाणपत्र द्यावे लागते. त्यासाठी दुष्काळाच्या काळात त्याला जन्म, मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी आर्थिक, शारीरिक, मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)