शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

बा शासना काय करू, एकीकडे पावसाची पाठ, तर दुसरीकडे वाघाची डरकाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 18:14 IST

मूल तालुक्यात पाऊस समाधानकारक नाही. त्यामुळे शेती कसण्यात अडचण येत आहे. असे असताना मात्र वाघाची डरकाळीदेखील शेतकऱ्यांना भयभीत करून सोडत आहे.

ठळक मुद्देमूल तालुक्यात १४ जणांना वाघाने केले शिकार

राजू गेडाम

मूल (चंद्रपूर) : शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्याची लगबग बघायला मिळत आहे. असे असताना वाघाची डरकाळी शेतकऱ्यांना भयभीत करताना दिसत आहे. असे असताना पावसानेदेखील पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी विवंचनेत दिसत आहेत. शेतात पाणी नाही आणि त्यातच वाघाचे शेतात बस्तान, त्यामुळे शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे.

सध्या मूल तालुक्यातील बफर व नॉन बफर वनपरिक्षेत्रात १४ जणांचा वाघाने बळी घेतल्याने वाघाची दहशत आजही कायम असल्याची चर्चा गावात होताना दिसत आहे. त्यामुळे शेतीची रोवणी करण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्याच्या शेतातील कामे झाली पाहिजेत. त्याचबरोबर शेतकरीदेखील सुरक्षित राहिला पाहिजे, यासाठी शासनाने नवीन मार्ग निवडणे गरजेचे झाले आहे.

वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग प्रयत्नरत असल्याने दिवसेंदिवस वाघाबरोबरच इतर वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. त्यामुळे वाघाला भ्रमण करण्यासाठी त्याचे क्षेत्र कमी पडायला लागले आहे. त्यामुळे आपले भक्ष्य शोधण्यासाठी तो गावाकडे आगेकूच करीत असल्याचे दिसून येते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावात जवळच जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा वावर दिसून येतो. मूल तालुक्यात पाऊस समाधानकारक नाही. त्यामुळे शेती कसण्यात अडचण येत आहे. असे असताना मात्र वाघाची डरकाळीदेखील शेतकऱ्यांना भयभीत करून सोडत आहे. शेतीदेखील जंगलालगत असल्याने मानव प्राणी संघर्षाच्या घटना सात्यत्याने घडून १४ जणांचा बळी गेला आहे.

हंगाम कसा करावा?

सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतकरी शेतात जात आहे. या हंगामात शेती पिकविणे आवश्यकच आहे. वर्षभरातील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात उत्पादन करणे गरजेचे आहे. मात्र, वाघाची दहशत शेतात निर्माण झाल्याने शेतीचा हंगाम कसा करावा, या विवंचनेत शेतकरी दिसत आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चिंचाळा, दहेगाव, मानकापूर व कवळपेठ परिसरातील गावात आजही वाघाचा वावर असून अनेकांना शिकारदेखील बनविण्यात आले आहे. तसेच बफर वनपरिक्षेत्रातील मारोडा, सोमनाथ ,डोनी, फुलझरी, करवन, काटवन, कोसंबी, रामपूर आदी गावांतील परिसरात वाघाबरोबरच इतर हिंस्र पशूची दहशत कायम आहे.

फिनिशिंग जाळीने जंगल प्रतिबंधित करावे

यावर उपाययोजना म्हणून मागील शेतीच्या हंगामात वनविभागाने नॉन बफरपरिक्षेत्रात जंगलक्षेत्र फिनिशिंग जाळीने प्रतिबंधित केले होते. वनविभागाचे कर्मचारी शेतात तैनात केले होते. हाच प्रयोग ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावात राबविण्याची मागणी केली जात आहे. असे असले तरी आजच्या स्थितीत शेतात येत असलेली वाघाची डरकाळी शेतकऱ्यांना भयभीत करून सोडत आहे. यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसTigerवाघ