शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बा शासना काय करू, एकीकडे पावसाची पाठ, तर दुसरीकडे वाघाची डरकाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 18:14 IST

मूल तालुक्यात पाऊस समाधानकारक नाही. त्यामुळे शेती कसण्यात अडचण येत आहे. असे असताना मात्र वाघाची डरकाळीदेखील शेतकऱ्यांना भयभीत करून सोडत आहे.

ठळक मुद्देमूल तालुक्यात १४ जणांना वाघाने केले शिकार

राजू गेडाम

मूल (चंद्रपूर) : शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्याची लगबग बघायला मिळत आहे. असे असताना वाघाची डरकाळी शेतकऱ्यांना भयभीत करताना दिसत आहे. असे असताना पावसानेदेखील पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी विवंचनेत दिसत आहेत. शेतात पाणी नाही आणि त्यातच वाघाचे शेतात बस्तान, त्यामुळे शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे.

सध्या मूल तालुक्यातील बफर व नॉन बफर वनपरिक्षेत्रात १४ जणांचा वाघाने बळी घेतल्याने वाघाची दहशत आजही कायम असल्याची चर्चा गावात होताना दिसत आहे. त्यामुळे शेतीची रोवणी करण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्याच्या शेतातील कामे झाली पाहिजेत. त्याचबरोबर शेतकरीदेखील सुरक्षित राहिला पाहिजे, यासाठी शासनाने नवीन मार्ग निवडणे गरजेचे झाले आहे.

वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग प्रयत्नरत असल्याने दिवसेंदिवस वाघाबरोबरच इतर वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. त्यामुळे वाघाला भ्रमण करण्यासाठी त्याचे क्षेत्र कमी पडायला लागले आहे. त्यामुळे आपले भक्ष्य शोधण्यासाठी तो गावाकडे आगेकूच करीत असल्याचे दिसून येते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावात जवळच जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा वावर दिसून येतो. मूल तालुक्यात पाऊस समाधानकारक नाही. त्यामुळे शेती कसण्यात अडचण येत आहे. असे असताना मात्र वाघाची डरकाळीदेखील शेतकऱ्यांना भयभीत करून सोडत आहे. शेतीदेखील जंगलालगत असल्याने मानव प्राणी संघर्षाच्या घटना सात्यत्याने घडून १४ जणांचा बळी गेला आहे.

हंगाम कसा करावा?

सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतकरी शेतात जात आहे. या हंगामात शेती पिकविणे आवश्यकच आहे. वर्षभरातील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात उत्पादन करणे गरजेचे आहे. मात्र, वाघाची दहशत शेतात निर्माण झाल्याने शेतीचा हंगाम कसा करावा, या विवंचनेत शेतकरी दिसत आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चिंचाळा, दहेगाव, मानकापूर व कवळपेठ परिसरातील गावात आजही वाघाचा वावर असून अनेकांना शिकारदेखील बनविण्यात आले आहे. तसेच बफर वनपरिक्षेत्रातील मारोडा, सोमनाथ ,डोनी, फुलझरी, करवन, काटवन, कोसंबी, रामपूर आदी गावांतील परिसरात वाघाबरोबरच इतर हिंस्र पशूची दहशत कायम आहे.

फिनिशिंग जाळीने जंगल प्रतिबंधित करावे

यावर उपाययोजना म्हणून मागील शेतीच्या हंगामात वनविभागाने नॉन बफरपरिक्षेत्रात जंगलक्षेत्र फिनिशिंग जाळीने प्रतिबंधित केले होते. वनविभागाचे कर्मचारी शेतात तैनात केले होते. हाच प्रयोग ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावात राबविण्याची मागणी केली जात आहे. असे असले तरी आजच्या स्थितीत शेतात येत असलेली वाघाची डरकाळी शेतकऱ्यांना भयभीत करून सोडत आहे. यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसTigerवाघ