शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

राज्यात मंत्री आहे, पण सरकारच नसल्यागत स्थिती; विजय वडेट्टीवार यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 12:40 IST

ना मंत्रिमंडळाचा विस्तार ना पालकमंत्री नियुक्त, विकासकामे रखडली

चंद्रपूर : राज्यात तीन महिन्यांपूर्वी नवे सरकार स्थापन झाले असले तरी राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यासारखे आहे. ना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ना पालकमंत्र्यांची नियुक्ती. प्रशासन ठप्प आहे. शासनाने विकासकामे सुरू करण्याऐवजी अंदाजपत्रकात मंजूर केलेली कामे व सुरू झालेली विकासकामे रखडली आहेत. राज्यात विकास ठप्प झाला आहे. सरकारला राज्यातील जनतेची पर्वा नाही, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना केला.

खनिज विकास निधीचेही काम रखडले असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. डीपीडीसीचा निधी दोन वर्षांत खर्च झाला नाही तर तो परत जातो. असे सुमारे २६८ कोटी रुपये खर्च झाले नाहीत. परत जाण्याचा धोका आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भाजपला विकासविरोधी ठरवून ते म्हणाले की, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा विकास निधीचे काम बंद पाडले आहे. रुग्णालय, पंचायत समिती अगदी रस्त्याचे कामही ठप्प झाले आहे. अंदाजपत्रकात मंजूर झालेले काम रखडले आहे. हे काम थांबवण्यासाठी या सरकारचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवावे. लम्पीचा रोगाचा गुरांना धोका निर्माण झाला आहे; मात्र सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहेे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ३०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप त्याचे वितरण सुरू केलेले नाही. त्यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. राज्यात २४ तासांत ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र हे सरकार उत्सव साजरे करण्यात मग्न आहे. शेतकऱ्यांना मदत करणारे हे सरकार नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, संचालक शेखर धोटे, चंद्रपूर शहर यु.सी.चे अध्यक्ष राजेश अडूर, माजी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारState Governmentराज्य सरकारcongressकाँग्रेस