शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

राज्यात मंत्री आहे, पण सरकारच नसल्यागत स्थिती; विजय वडेट्टीवार यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 12:40 IST

ना मंत्रिमंडळाचा विस्तार ना पालकमंत्री नियुक्त, विकासकामे रखडली

चंद्रपूर : राज्यात तीन महिन्यांपूर्वी नवे सरकार स्थापन झाले असले तरी राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यासारखे आहे. ना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ना पालकमंत्र्यांची नियुक्ती. प्रशासन ठप्प आहे. शासनाने विकासकामे सुरू करण्याऐवजी अंदाजपत्रकात मंजूर केलेली कामे व सुरू झालेली विकासकामे रखडली आहेत. राज्यात विकास ठप्प झाला आहे. सरकारला राज्यातील जनतेची पर्वा नाही, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना केला.

खनिज विकास निधीचेही काम रखडले असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. डीपीडीसीचा निधी दोन वर्षांत खर्च झाला नाही तर तो परत जातो. असे सुमारे २६८ कोटी रुपये खर्च झाले नाहीत. परत जाण्याचा धोका आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भाजपला विकासविरोधी ठरवून ते म्हणाले की, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा विकास निधीचे काम बंद पाडले आहे. रुग्णालय, पंचायत समिती अगदी रस्त्याचे कामही ठप्प झाले आहे. अंदाजपत्रकात मंजूर झालेले काम रखडले आहे. हे काम थांबवण्यासाठी या सरकारचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवावे. लम्पीचा रोगाचा गुरांना धोका निर्माण झाला आहे; मात्र सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहेे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ३०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप त्याचे वितरण सुरू केलेले नाही. त्यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. राज्यात २४ तासांत ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र हे सरकार उत्सव साजरे करण्यात मग्न आहे. शेतकऱ्यांना मदत करणारे हे सरकार नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, संचालक शेखर धोटे, चंद्रपूर शहर यु.सी.चे अध्यक्ष राजेश अडूर, माजी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारState Governmentराज्य सरकारcongressकाँग्रेस