शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राज्यात मंत्री आहे, पण सरकारच नसल्यागत स्थिती; विजय वडेट्टीवार यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 12:40 IST

ना मंत्रिमंडळाचा विस्तार ना पालकमंत्री नियुक्त, विकासकामे रखडली

चंद्रपूर : राज्यात तीन महिन्यांपूर्वी नवे सरकार स्थापन झाले असले तरी राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यासारखे आहे. ना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ना पालकमंत्र्यांची नियुक्ती. प्रशासन ठप्प आहे. शासनाने विकासकामे सुरू करण्याऐवजी अंदाजपत्रकात मंजूर केलेली कामे व सुरू झालेली विकासकामे रखडली आहेत. राज्यात विकास ठप्प झाला आहे. सरकारला राज्यातील जनतेची पर्वा नाही, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना केला.

खनिज विकास निधीचेही काम रखडले असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. डीपीडीसीचा निधी दोन वर्षांत खर्च झाला नाही तर तो परत जातो. असे सुमारे २६८ कोटी रुपये खर्च झाले नाहीत. परत जाण्याचा धोका आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भाजपला विकासविरोधी ठरवून ते म्हणाले की, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा विकास निधीचे काम बंद पाडले आहे. रुग्णालय, पंचायत समिती अगदी रस्त्याचे कामही ठप्प झाले आहे. अंदाजपत्रकात मंजूर झालेले काम रखडले आहे. हे काम थांबवण्यासाठी या सरकारचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवावे. लम्पीचा रोगाचा गुरांना धोका निर्माण झाला आहे; मात्र सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहेे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ३०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप त्याचे वितरण सुरू केलेले नाही. त्यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. राज्यात २४ तासांत ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र हे सरकार उत्सव साजरे करण्यात मग्न आहे. शेतकऱ्यांना मदत करणारे हे सरकार नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, संचालक शेखर धोटे, चंद्रपूर शहर यु.सी.चे अध्यक्ष राजेश अडूर, माजी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारState Governmentराज्य सरकारcongressकाँग्रेस