शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

...तर ताडोबातील वाघाचा गुदमरेल श्वास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST

सरकारने ज्या ४१ कोळसा ब्लॉकला लिलावासाठी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉकचा समावेश आहे. हा परिसर वन्यजीवांसाठी संवेदनशील समजला जातो. कारण याच मार्गाने वर्धा येथील बोर व्याघ्र प्रकल्प आणि अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प लागतो. त्यामुळे वाघांचे स्थलांतर होऊ शकते. याला कॉरिडॉर म्हटले जाते. वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असतो.

ठळक मुद्देप्रजननावर येईल मर्यादा : वाघांचा भ्रमण मार्ग होणार उद्ध्वस्त

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : जग विख्यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पापासून हाकेवर असलेल्या बंदर (शिवापूर) गावात बंदर कोल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कोळसा ब्लॉकला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचा लिलाव करण्याच्या हालचाली केंद्र स्तरावर सुरू झाल्या आहेत. जर येथे कोळसा खाण सुरू झाली, तर ताडोबातील वाघांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. बंदर ते शेडेगाव, अमरपुरी, मजरा हा परिसर कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. या मार्गानेच वाघ इतर व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर करू शकतात. जर कोळसा खाण सुरू झाली तर वाघांचा भ्रमंती मार्ग उद्ध्वस्त होऊन वाघांच्या भ्रमंतीवर पायबंद बसून वाघाचा श्वास गुदमरेल व वन्यजीव मानव संघर्ष वाढण्याचा धोका वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.सरकारने ज्या ४१ कोळसा ब्लॉकला लिलावासाठी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉकचा समावेश आहे. हा परिसर वन्यजीवांसाठी संवेदनशील समजला जातो. कारण याच मार्गाने वर्धा येथील बोर व्याघ्र प्रकल्प आणि अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प लागतो. त्यामुळे वाघांचे स्थलांतर होऊ शकते. याला कॉरिडॉर म्हटले जाते. वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असतो.ताडोबातील उत्तर दिशेला असलेला हा परिसर अरुंद आहे. त्यातही कोळसा खाणीला मंजुरी दिली तर उत्तरेकडील ताडोबा क्षेत्रातील वन्यजीवांचे स्थलांतर पूर्णपणे थांबून जाणार आहे. अशावेळी मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचणार आहे.आधीच ताडोबात वाघांच्या वाढत्या संख्येने ही परिस्थिती ओढविली आहे. जिल्यात एका वर्षात २४ जणांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे त्यात चिमूर तालुक्यातीलच पाच महिन्यात पाच जणांचा समावेश आहे. पुढे ही परिस्थिती आणखी स्फोटक होणार आहे.त्यामुळे आता केंद्राने जाहीर केलेल्या बंदर कोळसा ब्लॉकला जर कोळसा उत्खननासाठी मंजुरी दिली, तर संख्येत वाढ झालेल्या वाघात अधिवासासाठी आपसात संघर्ष निर्माण होईल. त्यात अनेक वाघांचा जीव जाईल. मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचेल, प्रजननावर मर्यादा येईल. त्यामुळे त्यांच्यात अनेक विकार निर्माण होतील. जर असे झाले, तर ही अत्यंत धोकादायक स्थिती असेल. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च प्राणी आहे. जंगलाचा तो केंद्रबिंदू आहे. जर वाघ संपला तर पर्यावरणाच्या असंतुलनाची फळे मानवाला भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आताच यावर गांभीर्याने विचार करून शासनाला त्या दृष्टीने पावले उचलावी लागणार आहे.या गावांचे हरवेल गावपणचिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ५ ते १० किमी अंतरावरील बंदर (शिवापूर), शेडेगाव, मजरा (बेगडे), अमरपुरी व गदगाव या पाच गावांत बंदर कोल कंपनी प्रा, लिमिटेडची कोळसा खाण सुरू करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या खणीमुळे गावाच्या शेजारी कोळसा काढल्यानंतर मातीचे मोठमोठे ढिगारे तयार होऊन या पाच गावांचे गावपण हरपणार आहे. मात्र स्थानिकांना रोजगार मिळण्याची शक्यता कमीच आहे.ताडोबातील येडाअण्णा व करांडलातील ‘जय’ चे स्थलांतरएकेकाळी मोहर्ली परिसरात अधिराज्य गाजवणारा येडाअण्णा आपल्या उतरत्या वयात आपले एकेकाळचे क्षेत्र बदलवून चिमूर तालुक्यातील अमरपुरी (भांसुली) या जंगलात येऊन तळ्याच्या पाळीवर मृत झाला तर करांडला येथील जय नावाचा वाघ स्थलांतर करून कुठे गेला हे अजूनही कळले नाही. त्यामुळे वाघांची व इतरही प्राण्यांची भ्रमंती गरजेची आहे.चिमूर तालुक्यातील बंदर, खडसंगी, शेडेगाव हा सर्व ग्रीन बेल्ट आहे. यामधून वाघांचे व इतरही प्राण्यांच्या जाण्यायेण्याचा मार्ग आहे. या खणीमुळे प्राण्यांचा हा मार्ग उद्ध्वस्त होऊन परिसरात प्रदूषण वाढेल. तेव्हा ही खाण न होणेच सर्वांच्या फायद्याचे आहे.-मनीष नाईक, सचिव, ट्री फाऊंडेशन चिमूर.या ब्लॉकमध्ये बंदर व शिवापूर येथील शेतकऱ्यांच्या शेती आहेत. या शेतीमध्ये प्रदूषण होऊन शेतीचे नुकसान होईल. तसेच स्थानिक नागरिकांना काही लाभ होणार नाही. तसेच वाघासह इतर प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ही खाण मानव व प्राण्यांसाठी नुकसानकारक ठरणार.-बंडू तराळे, माजी सरपंच, ग्रामपंचायत बंदर.

टॅग्स :TigerवाघTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प